शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प कागदावर, मग घनकचऱ्याचा भुर्दंड नागरिकांच्या माथी का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 01:22 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात घनकचऱ्याची विल्हेवाट हा प्रश्न गंभीर होत चालला असून न्यायालयाने फटकारूनही महापालिका प्रशासन व नागरिकांना जाग आलेली नाही.

- अनिकेत घमंडी, डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात घनकचऱ्याची विल्हेवाट हा प्रश्न गंभीर होत चालला असून न्यायालयाने फटकारूनही महापालिका प्रशासन व नागरिकांना जाग आलेली नाही. गेल्या वर्षभरात आधारवाडी डम्पिंगची समस्या जैसे थे असून उंबर्डे, बारवे येथील घनकचºयाचे प्रकल्प कागदावरुन पुढे सरकलेले नाहीत. महापालिका प्रशासन नागरिकांना भुर्दंड लावण्याच्या मानसिकतेत आहे. प्रशासनाच्या या पवित्र्यावर लोकप्रतिनिधींनी ‘आम्हाला चपलांचा मार खायला लावता का?’ असा सवाल करीत तो प्रस्ताव महासभेत स्थगित ठेवला.शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणारे जे नागरिक कचºयाचे वर्गीकरण करणार नाहीत, त्यांच्याकडून ५० रुपये आणि वाणिज्य विभागात येणाऱ्यांकडून ६० रुपये प्रतिदिन आकारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव होता. अशा पद्धतीने महापालिका हद्दीतून प्रतिमहिना सुमारे ३० कोटी निधी संकलित होऊ शकतो, असा अंदाज आहे. परंतु स्मार्ट सिटीअंतर्गत घनकचºयासाठी केंद्र शासनाने आधीच शेकडो कोटींची तरतूद केलेली असताना नागरिकांना भुर्दंड का, हा महत्त्वाचा सवाल आहे. महापालिकेने १० प्रभागांंपैकी चार प्रभागांमध्ये कचरा उचलण्याचे खासगीकरण केले आहे. त्यासाठी सुमारे १०७ कोटींची तरतूद केली आहे. तरीही नागरिकांना भुर्दंड का ? असा सवाल उपस्थित होत आहे. डोंबिवलीतील आयरेगावमधील बायोगॅस प्रकल्पाची क्षमता ही १० टन एवढी आहे. परंतु त्या ठिकाणी जेमतेम चार ते सहा टन कचरा नेला जातो. अनेकदा तर केवळ तीन टन कचरा असतो. तेथील नोंदवह्यांमधील नोंदी बोगस असल्याचा आरोप म्हात्रेनगरचे नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी केला आहे. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनीही पूर्ण क्षमतेने बायोगॅस प्लांट चालत नसल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे जे प्रकल्प आधी सुरु आहेत, ते पूर्ण क्षमतेने सुरु ठेवणे आवश्यक आहे. डोंबिवली पश्चिमेला राजूनगर परिसरात असाच बायोगॅस प्लांट उभारण्यात आला आहे, परंतु तो आता मध्यवर्ती भागात येत असल्याने व त्यापासून नागरिकांच्या जीवाला धोका असल्याने रहिवाशांनी त्यास विरोध केला आहे.वर्षभरापासून शहरात प्लास्टिकबंदीची तोंडदेखली कारवाई सुरु झाली आणि अल्पावधीत ती बंद झाली. त्यामुळे घनकचºयामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळून येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे, याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच ओल्या व सुक्या कचºयाचे वर्गीकरण कागदावरच आहे. त्यासाठी आणलेले डबे कोणाच्या खिशात गेले, हा एक संशोधनाचा भाग आहे. बंद सूतिकागृहाच्या ठिकाणी, काही नगरसेवकांच्या कार्यालयाच्या मागे ते डबे धूळखात पडल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर याबाबत टीका झाल्यानंतर प्रशासन जागे झाले, मात्र तोपर्यंत डब्यांची वासलात लागली होती. ओला, सुका कचरा वर्गीकरण न करणाºया सोसायट्यांकडून दंड आकारण्यात येणार होता. त्याची अंंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कचरा वर्गीकरण असो की प्लास्टिकबंदी, या विषयांवरील कारवाई फार्स बनली आहे.‘आधी सेवा नाही तर कर नाही’, अशी भूमिका कल्याणकरांनी मध्यंतरी घेतली होती. शहरांमध्ये खड्डे, पाण्याचे असमान वितरण, वीजपुरवठा खंडित होण्याचे वाढलेले प्रमाण, आरोग्यसेवेची दैनावस्था, अनधिकृत बांधकामे, अतिधोकादायक इमारती, बकाली, दुर्गंधी, सार्वजनिक शौचालयांचा अभाव अशा एक ना अनेक समस्या असल्याने नागरिक त्रस्त आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. काही रिक्षाचालकांची दादागिरी तर काहींचा मनमानी कारभार यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळेही वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. अशा सर्व गंभीर स्थितीतही राज्यात सर्वाधिक ७१ टक्के टॅक्स हा या महापालिकेतून वसूल केला जातो. मात्र त्या तुलनेत, सुविधा मिळत नाही. असे असूनही आता घनकचºयाच्या निमित्ताने नागरिकांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न सुरु आहे हे संतापजनक आहे. महासभेत तूर्त हा प्रस्ताव स्थगित ठेवला असला तरी निवडणुकीनंतर पुन्हा रेटण्याचा प्रयत्न प्रशासन करील. महापालिकेतील सत्ताधारी पक्षाला मते मिळाल्यानंतर कदाचित हा प्रस्ताव मंजूर करण्यात आडकाठी वाटणार नाही.एकीकडे ही खदखद जरी नागरिकांमध्ये असली तरीही कचरा कमी करणे, प्लास्टिकचा कचरा निर्माण न होण्याची काळजी करणे, कचºयाचे वर्गीकरण करुन ओला व सुका कचरा वेगळा करणे, ओल्या कचºयावर सोसायटीच्या आवारातच प्रक्रिया करुन खतनिर्मिती करणे, ही नागरिकांची जबाबदारी आहे. कल्याण-डोंबिवलीतील बहुतांश नागरिकांचा सिव्हीक सेन्स शून्य पातळीवर आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, कुठेही थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, तंबाखू-गुटखा अथवा पान खाऊन भिंती खराब करणे, असे करताना त्यांना आपण चूक करीत असल्याचे जाणवत नाही. आपल्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची भावना मनाला शिवत नाही. उलट कुणी का थुंकलास किंवा का कचरा फेकला, असे विचारल्यावर मारामारी करायला अनेकजण सरसावतात. त्यामुळे बेदरकार प्रशासन व निगरगट्ट नागरिक यांची युती स्वच्छतेला बट्टा लावण्याचे काम करीत आहे.