शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

फेरीवाल्यांची धडक, प्रशासनाचा व्यक्त केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 05:17 IST

भार्इंदर पालिका : प्रशासनाचा व्यक्त केला निषेध

भार्इंदर: मीरा-भार्इंदर महापालिकेने फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी न करता फेरीवाल्यांवर एकतर्फी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ फेरीवाल्यांनी सीटू या संघटनेच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयावर बुधवारी मोर्चा काढला.मोदी सरकारच्या कामगार व फेरीवालाविरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या सरकारने फेरीवाल्यांच्या भल्यासाठी कोणताही चांगला निर्णय घेतलेला नाही, असे मोर्चाचे नेतृत्व करणारे व जनवादी हॉकर्स सभेचे अध्यक्ष अ‍ॅड. किशोर सामंत यांनी सांगितले. हा प्रकार मीरा-भार्इंदरमध्ये सर्रास सुरू असून फेरीवाला कायद्याचे उल्लंघन केले जात आहे.

पालिका सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली फेरीवाल्यांवर एकतर्फी कारवाई करत आहे. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसून केवळ दिखाऊपणासाठी शहर फेरीवाला समिती स्थापन करून तिचे नियंत्रण मात्र सत्ताधाऱ्यांच्याच हातात दिले आहे. या समितीला कोणत्याही धोरणात्मक निर्णयासाठी विचारात न घेता एकतर्फी निर्णय घेऊन कारवाई केली जाते.फेरीवाल्यांच्या मालाची नासाडी करून त्यांचे आर्थिक नुकसान केले जाते. फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येला शहरातील राजकारणी तसेच प्रशासनातील भ्रष्ट अधिकारीच जबाबदार असून त्यांनी अधिकृत फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे, अशी मागणी सामंत यांनी केली. फेरीवाल्यांकडून कंत्राटदार अव्वाच्या सव्वा बाजार फी वसूल करतात. त्यांना रोखण्याची ताकद प्रशासनामध्ये नाही. कारण, स्वत:च भ्रष्टाचारी असल्याने कारवाई कशी व कोणावर करायची, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकल्याची टीका त्यांनी केली.उपायुक्त दीपक पुजारी यांच्यासोबत अ‍ॅड. सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची चर्चा झाली. उपायुक्तांनी लवकरच आयुक्तांसोबत चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मोर्चात प्रभाकर शेट्टी, वीरेंद्र गुप्ता, राजेंद्र जाधव, भरत वानखेडे, रामबदन गुप्ता, गणेश पवार आदींचा सहभाग होता.भूखंड ताब्यात घेतलेले नाहीबाजारासाठी आरक्षित असलेले भूखंड अद्याप पालिकेने ताब्यात घेतलेले नाहीत. या भूखंडांव्यतिरिक्त पालिकेने कमी वर्दळीच्या ठिकाणी बाजाराच्या वास्तू बांधल्या. त्यामुळे त्या वास्तूंत फेरीवाले व्यवसायासाठी जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रामदेव पार्क परिसरात नवीन बाजार सुरू केले. त्यात फेरीवाले बसतच नसून ते पुन्हा रस्त्यावर बसू लागले आहेत. त्यामुळे पालिकेने अतिघाई करून बांधलेले बाजार निरर्थक ठरल्याचा दावा त्यांनी केला.च्पारंपारिक रविवारचा आठवडा बाजार हप्ते वसुलीच्या नावाखाली बंद पाडण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला. पालिकेने फेरीवाल्यांवर एकतर्फी कारवाई न करता त्यांचे सर्वेक्षण करावे.च्या सरकारने या वर्गाच्या भल्यासाठी कोणताही चांगला निर्णय घेतला नाही. त्यांना देशोधडीला लावण्यासाठी बड्या उद्योगपतींच्या हातात देशाची अर्थव्यवस्था सोपविली आहे. 

टॅग्स :thaneठाणे