शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांची धडक, प्रशासनाचा व्यक्त केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 05:17 IST

भार्इंदर पालिका : प्रशासनाचा व्यक्त केला निषेध

भार्इंदर: मीरा-भार्इंदर महापालिकेने फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी न करता फेरीवाल्यांवर एकतर्फी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ फेरीवाल्यांनी सीटू या संघटनेच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयावर बुधवारी मोर्चा काढला.मोदी सरकारच्या कामगार व फेरीवालाविरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या सरकारने फेरीवाल्यांच्या भल्यासाठी कोणताही चांगला निर्णय घेतलेला नाही, असे मोर्चाचे नेतृत्व करणारे व जनवादी हॉकर्स सभेचे अध्यक्ष अ‍ॅड. किशोर सामंत यांनी सांगितले. हा प्रकार मीरा-भार्इंदरमध्ये सर्रास सुरू असून फेरीवाला कायद्याचे उल्लंघन केले जात आहे.

पालिका सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली फेरीवाल्यांवर एकतर्फी कारवाई करत आहे. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसून केवळ दिखाऊपणासाठी शहर फेरीवाला समिती स्थापन करून तिचे नियंत्रण मात्र सत्ताधाऱ्यांच्याच हातात दिले आहे. या समितीला कोणत्याही धोरणात्मक निर्णयासाठी विचारात न घेता एकतर्फी निर्णय घेऊन कारवाई केली जाते.फेरीवाल्यांच्या मालाची नासाडी करून त्यांचे आर्थिक नुकसान केले जाते. फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येला शहरातील राजकारणी तसेच प्रशासनातील भ्रष्ट अधिकारीच जबाबदार असून त्यांनी अधिकृत फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे, अशी मागणी सामंत यांनी केली. फेरीवाल्यांकडून कंत्राटदार अव्वाच्या सव्वा बाजार फी वसूल करतात. त्यांना रोखण्याची ताकद प्रशासनामध्ये नाही. कारण, स्वत:च भ्रष्टाचारी असल्याने कारवाई कशी व कोणावर करायची, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकल्याची टीका त्यांनी केली.उपायुक्त दीपक पुजारी यांच्यासोबत अ‍ॅड. सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची चर्चा झाली. उपायुक्तांनी लवकरच आयुक्तांसोबत चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मोर्चात प्रभाकर शेट्टी, वीरेंद्र गुप्ता, राजेंद्र जाधव, भरत वानखेडे, रामबदन गुप्ता, गणेश पवार आदींचा सहभाग होता.भूखंड ताब्यात घेतलेले नाहीबाजारासाठी आरक्षित असलेले भूखंड अद्याप पालिकेने ताब्यात घेतलेले नाहीत. या भूखंडांव्यतिरिक्त पालिकेने कमी वर्दळीच्या ठिकाणी बाजाराच्या वास्तू बांधल्या. त्यामुळे त्या वास्तूंत फेरीवाले व्यवसायासाठी जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रामदेव पार्क परिसरात नवीन बाजार सुरू केले. त्यात फेरीवाले बसतच नसून ते पुन्हा रस्त्यावर बसू लागले आहेत. त्यामुळे पालिकेने अतिघाई करून बांधलेले बाजार निरर्थक ठरल्याचा दावा त्यांनी केला.च्पारंपारिक रविवारचा आठवडा बाजार हप्ते वसुलीच्या नावाखाली बंद पाडण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला. पालिकेने फेरीवाल्यांवर एकतर्फी कारवाई न करता त्यांचे सर्वेक्षण करावे.च्या सरकारने या वर्गाच्या भल्यासाठी कोणताही चांगला निर्णय घेतला नाही. त्यांना देशोधडीला लावण्यासाठी बड्या उद्योगपतींच्या हातात देशाची अर्थव्यवस्था सोपविली आहे. 

टॅग्स :thaneठाणे