शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

‘ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास नागरिकांच्याच पैशाची बचत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:25 IST

कल्याण : शहरातील प्रत्येक सोसायटीने ओला-सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प सोसायटीतच राबविल्यास नागरिकांच्याच पैशाची ...

कल्याण : शहरातील प्रत्येक सोसायटीने ओला-सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प सोसायटीतच राबविल्यास नागरिकांच्याच पैशाची बचत होईल, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

डोंबिवली पूर्वेतील महावीरनगर सोसायटीने ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ शनिवारी शिंदे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी केडीएमसीच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, पदाधिकारी राजेश कदम, भाजप माजी नगरसेविका सुनीता पाटील, संजय चौधरी आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, ‘ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण ही काळाची गरज आहे. केडीएमसी दीड वर्षापासून शून्य कचरा मोहीम राबवत असून, आतापर्यंत साडेतीन हजार टन ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली आहे. मनपा हद्दीतील जवळपास ५० मोठ्या सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. अनेक सोसायट्यांनी आपल्या आवारातच ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केल्यास मनपावरील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा भार कमी होईल. मनपा ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करते; परंतु त्यावर खर्च होणारा पैसा हा नागरिकांकडून करातून गोळा केलेला असतो. प्रक्रियेवरील मनपाचे पैसे वाचणार म्हणजेच जनतेच्या पैशाची बचत होईल. त्यामुळे सर्व लहान-मोठ्या सोसायट्यांनी ओला-सुका कचरा वर्गीकरणास सहकार्य करून शहर कचरामुक्त करण्याच्या मोहिमेस हातभार लावावा.’

--------------------------