शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

प्रक्रियाच होत नसल्याने वर्गीकरण केलेल्या कच-याचे मुसळ केरात, फक्त जाहिरातबाजी सरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 03:38 IST

सध्या सर्वच शहरात स्वच्छता सर्वेक्षणाचा बोलबाला सुरु आहे. कचरा वेगळा करण्याबाबत जागृती सुरू आहे. त्यासाठी डबे खरेदी जोमात आहे. काही पालिकांनी अर्थसंकल्पात घनकचरा कर लावण्यास सुरूवात केली आहे. पण कचºयाच्या विल्हेवाटीचे प्रकल्पच न उभारल्याने सारे मुसळ केरात जाण्याची चिन्हे आहेत.

- मुरलीधर भवारकल्याण : सध्या सर्वच शहरात स्वच्छता सर्वेक्षणाचा बोलबाला सुरु आहे. कचरा वेगळा करण्याबाबत जागृती सुरू आहे. त्यासाठी डबे खरेदी जोमात आहे. काही पालिकांनी अर्थसंकल्पात घनकचरा कर लावण्यास सुरूवात केली आहे. पण कचºयाच्या विल्हेवाटीचे प्रकल्पच न उभारल्याने सारे मुसळ केरात जाण्याची चिन्हे आहेत.वर्गीकरण केलेला कचरा पुन्हा एकत्र करून डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जाणार असेल, तर वर्गीकरणाला, अ‍ॅपला आणि त्यासाठीच्या जनजागृतीला काहीही अर्थ उरणार नाही. यातून महापालिका-नगरपालिका सरकारची फसवणूक करत आहेत, याकडे कचरादूतांनी, स्वच्छतादूतांनी लक्ष वेधले आहे.कल्याण-डोंबिवलीच्या घनकचरा प्रकल्पावर हरीत लवादापुढे सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर पालिकेविरोधात दावे दाखल आहेत. भिवंडीत डम्पिंगसाठी जागा शोधण्याचे काम सुरु आहे. उल्हासनगर पालिकाही म्हारळ येथील डम्पिंग ग्राऊंड बंद करुन ते खुनी खड्डा येथे कचरा टाकत आहे. बदलापूर नगरपालिकेने बायोगॅस व खत निर्मितीचा प्रकल्प चालविल्याचे म्हटले आहे. अंबरनाथमध्येही हा प्रश्न निकाली निघालेला नाही. ही परिस्थिती असूनही नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे बंधन घालण्यात येत आहे. अन्यथा कचरा उचलणार नाही, अशी तंबी दिली जात आहे.

टॅग्स :kalyanकल्याण