शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

केडीएमसीकडून तात्पुरत्या केल्या जाणाऱ्या डागडुजीमुळे समस्या ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:08 IST

मुस्लिमबहुल प्रभागांकडे दुर्लक्ष

कल्याण : एकीकडे केडीएमसी प्रशासन स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवत जात असताना दुसरीकडे येथील पश्चिमेकडील भागात असलेल्या मुस्लिमबहुल प्रभागांकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. नागरी समस्यांवर तात्पुरत्या स्वरूपात केल्या जात असलेल्या डागडुजीमुळे समस्या ‘जैसे थे’ आहेत. यात नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

पश्चिमेतील गफूर डोन चौक, गोविंदवाडी, रोहिदास वाडा आणि बैलबाजार या चार प्रभागांमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. पायवाटा, गटारे सुस्थितीत नाहीत, ड्रेनेजची समस्या, कचराकुंड्या आणि कचºयाची समस्याही जटिल बनली आहे. या समस्यांवर वर्षानुवर्षे केवळ तात्पुरती मलमपट्टी व डागडुजी करून वेळ मारून नेली जात आहे. नवीन ठोस कामे होत नसल्याने त्याच समस्या पुन्हा उद्भवत आहेत. ड्रेनेजची सुविधा योग्य नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात चार महिने मलमूत्र असलेल्या पाण्यातून वाट काढत नागरिक आपले बाजार आणि इतर कामे पार पाडत आहेत.

धार्मिक प्रार्थनास्थळेही अशा घाणीच्या पाण्याने वेढलेली असतात. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने रोगराईचा प्रश्नही निर्माण झाला असून त्यात रस्तेही सुस्थितीत नाहीत. बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. येथील गतिरोधकांवर पांढरे पट्टे न मारल्याने त्यावर भरधाव वेगातील दुचाकी आदळून अपघात होत आहेत....तर रस्त्यावर उतरूप्रभागांकडे केडीएमसीचे झालेले दुर्लक्ष पाहता मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांना निवेदन दिले आहे. प्रभागातील समस्यांबाबत एकाही अभियंत्याला या भागात वेळ द्यावासा वाटत नाही, याचे कारण काय? असा सवाल शेख यांनी केला आहे. १५ दिवसांत या प्रभागांमध्ये ठोस कृती महापालिकेकडून झाली नाही तर मनसेला रस्त्यावर उतरून आंदोलनाद्वारे न्याय मिळवावा लागेल, असा इशारा त्यांनी आयुक्तांना दिला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका