शहरं
Join us  
Trending Stories
1
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
2
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
3
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
4
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
5
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
6
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
7
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
8
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
9
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
10
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
11
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
12
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
13
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
14
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
15
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
16
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
17
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
18
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
19
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
20
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू

चतुर्वेदींचाही समावेश उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून; रिजीजू यांच्या फोननंतर अनिल देसाईंचा पत्ता कट

By संदीप प्रधान | Updated: May 23, 2025 10:41 IST

आपला पत्ता कट होणार असे दिसू लागताच हे चतुर्वेदी यांनी रिजीजू यांना ठाकरेंना फोन करायला लावला, असे सूत्रांनी सांगितले.

संदीप प्रधान, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : उद्धवसेनेच्या उपनेत्या व राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसच्या शशी थरुर यांच्या पावलावर पाऊल ठेवत पक्षाला अंधारात ठेवून विदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात आपली वर्णी लावल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे. पाकिस्तानमधील  दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याबाबत भारताची भूमिका विदेशात मांडण्याकरिता जाणाऱ्या शिष्टमंडळात खा. अनिल देसाई यांना धाडण्याचा उद्धवसेनेचा विचार सुरू होता. परंतु, चतुर्वेदी यांनी स्वत:ची वर्णी लावल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाइलाजाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, असे सूत्रांनी सांगितले.

विदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेसने सुचविलेल्या नावांना बाजूला सारत शशी थरुर यांना पाठविण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी सत्ताधाऱ्यांनी निश्चित केलेल्या युसुफ पठाण यांच्या नावाला विरोध करून अभिषेक बॅनर्जी यांच्या नावाची शिफारस केली. उद्धवसेनेतर्फे प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी निश्चित केले. आपले नाव निश्चित झाल्याचे खुद्द चतुर्वेदी यांनी पक्षप्रमुखांना सांगितले. तेव्हा उद्धवसेनेकडून कोण विदेशात जाणार हे ठरविणे हा आपला अधिकार असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. 

आपला पत्ता कट होणार असे दिसू लागताच हे चतुर्वेदी यांनी रिजीजू यांना ठाकरेंना फोन करायला लावला, असे सूत्रांनी सांगितले. मग प्रश्न उभा राहिला की, आपले खासदार विदेशात काय भूमिका मांडणार हे स्पष्ट झाल्याखेरीज त्यांना कसे पाठवायचे. मग परराष्ट्र मंत्रालयाने खासदार कोणती भूमिका मांडणार, याचा तपशील उद्धवसेनेला दिला. त्यानंतर चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

यापूर्वीही माघार

केंद्रातील २०१४ च्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये अनिल देसाई यांचा मंत्री म्हणून समावेश होण्याचे निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतल्याने देसाई यांना शपथ न घेता माघारी परतावे लागले होते. 

चतुर्वेदी यांची आता भाजपसोबत जवळीक! 

चतुर्वेदी यांच्यामुळे अनिल देसाई यांची भारतीय शिष्टमंडळात समावेशाची संधी हुकली. चतुर्वेदी यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत वर्षभरात संपुष्टात येत आहे. यापूर्वी काँग्रेसमध्ये राहिलेल्या चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविण्याइतपत संख्याबळ उद्धवसेनेकडे नाही. त्यामुळे त्या भाजपसोबत जवळीक वाढवत असल्याचे उद्धवसेनेत बोलले जाते.

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यानंतर धोरण म्हणून विदेशात खासदारांची शिष्टमंडळे पाठविण्याचे ठरवताना त्या-त्या पक्षाला किंवा त्यांच्या गटनेत्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. शशी थरूर, प्रियंका चतुर्वेदी आदी नावे केंद्र सरकारने निश्चित करून पाठवली. त्यामुळे राजकीय पक्षांना निर्णय घेण्याची संधी मिळाली नाही. - अरविंद सावंत, गटनेते उद्धवसेना, लोकसभा.

संसदीय कामकाज मंत्रालयाने अगोदर खासदारांची नावे निश्चित करून त्यांना फोन केले. तसाच मलाही फोन आला. मला वाटले माझ्या पक्ष नेत्यांची अनुमती घेऊन मग मला कळविले असावे. संसदीय कामकाज मंत्रालयाने प्रोटोकॉलचे पालन करायला हवे होते. संवादाच्या अभावातून हे घडले. - प्रियंका चतुर्वेदी, खासदार उद्धवसेना. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना