शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

चतुर्वेदींचाही समावेश उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून; रिजीजू यांच्या फोननंतर अनिल देसाईंचा पत्ता कट

By संदीप प्रधान | Updated: May 23, 2025 10:41 IST

आपला पत्ता कट होणार असे दिसू लागताच हे चतुर्वेदी यांनी रिजीजू यांना ठाकरेंना फोन करायला लावला, असे सूत्रांनी सांगितले.

संदीप प्रधान, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : उद्धवसेनेच्या उपनेत्या व राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसच्या शशी थरुर यांच्या पावलावर पाऊल ठेवत पक्षाला अंधारात ठेवून विदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात आपली वर्णी लावल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे. पाकिस्तानमधील  दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याबाबत भारताची भूमिका विदेशात मांडण्याकरिता जाणाऱ्या शिष्टमंडळात खा. अनिल देसाई यांना धाडण्याचा उद्धवसेनेचा विचार सुरू होता. परंतु, चतुर्वेदी यांनी स्वत:ची वर्णी लावल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाइलाजाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, असे सूत्रांनी सांगितले.

विदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेसने सुचविलेल्या नावांना बाजूला सारत शशी थरुर यांना पाठविण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी सत्ताधाऱ्यांनी निश्चित केलेल्या युसुफ पठाण यांच्या नावाला विरोध करून अभिषेक बॅनर्जी यांच्या नावाची शिफारस केली. उद्धवसेनेतर्फे प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी निश्चित केले. आपले नाव निश्चित झाल्याचे खुद्द चतुर्वेदी यांनी पक्षप्रमुखांना सांगितले. तेव्हा उद्धवसेनेकडून कोण विदेशात जाणार हे ठरविणे हा आपला अधिकार असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. 

आपला पत्ता कट होणार असे दिसू लागताच हे चतुर्वेदी यांनी रिजीजू यांना ठाकरेंना फोन करायला लावला, असे सूत्रांनी सांगितले. मग प्रश्न उभा राहिला की, आपले खासदार विदेशात काय भूमिका मांडणार हे स्पष्ट झाल्याखेरीज त्यांना कसे पाठवायचे. मग परराष्ट्र मंत्रालयाने खासदार कोणती भूमिका मांडणार, याचा तपशील उद्धवसेनेला दिला. त्यानंतर चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

यापूर्वीही माघार

केंद्रातील २०१४ च्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये अनिल देसाई यांचा मंत्री म्हणून समावेश होण्याचे निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतल्याने देसाई यांना शपथ न घेता माघारी परतावे लागले होते. 

चतुर्वेदी यांची आता भाजपसोबत जवळीक! 

चतुर्वेदी यांच्यामुळे अनिल देसाई यांची भारतीय शिष्टमंडळात समावेशाची संधी हुकली. चतुर्वेदी यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत वर्षभरात संपुष्टात येत आहे. यापूर्वी काँग्रेसमध्ये राहिलेल्या चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविण्याइतपत संख्याबळ उद्धवसेनेकडे नाही. त्यामुळे त्या भाजपसोबत जवळीक वाढवत असल्याचे उद्धवसेनेत बोलले जाते.

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यानंतर धोरण म्हणून विदेशात खासदारांची शिष्टमंडळे पाठविण्याचे ठरवताना त्या-त्या पक्षाला किंवा त्यांच्या गटनेत्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. शशी थरूर, प्रियंका चतुर्वेदी आदी नावे केंद्र सरकारने निश्चित करून पाठवली. त्यामुळे राजकीय पक्षांना निर्णय घेण्याची संधी मिळाली नाही. - अरविंद सावंत, गटनेते उद्धवसेना, लोकसभा.

संसदीय कामकाज मंत्रालयाने अगोदर खासदारांची नावे निश्चित करून त्यांना फोन केले. तसाच मलाही फोन आला. मला वाटले माझ्या पक्ष नेत्यांची अनुमती घेऊन मग मला कळविले असावे. संसदीय कामकाज मंत्रालयाने प्रोटोकॉलचे पालन करायला हवे होते. संवादाच्या अभावातून हे घडले. - प्रियंका चतुर्वेदी, खासदार उद्धवसेना. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना