शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

चतुर्वेदींचाही समावेश उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून; रिजीजू यांच्या फोननंतर अनिल देसाईंचा पत्ता कट

By संदीप प्रधान | Updated: May 23, 2025 10:41 IST

आपला पत्ता कट होणार असे दिसू लागताच हे चतुर्वेदी यांनी रिजीजू यांना ठाकरेंना फोन करायला लावला, असे सूत्रांनी सांगितले.

संदीप प्रधान, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : उद्धवसेनेच्या उपनेत्या व राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसच्या शशी थरुर यांच्या पावलावर पाऊल ठेवत पक्षाला अंधारात ठेवून विदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात आपली वर्णी लावल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे. पाकिस्तानमधील  दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याबाबत भारताची भूमिका विदेशात मांडण्याकरिता जाणाऱ्या शिष्टमंडळात खा. अनिल देसाई यांना धाडण्याचा उद्धवसेनेचा विचार सुरू होता. परंतु, चतुर्वेदी यांनी स्वत:ची वर्णी लावल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाइलाजाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, असे सूत्रांनी सांगितले.

विदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेसने सुचविलेल्या नावांना बाजूला सारत शशी थरुर यांना पाठविण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी सत्ताधाऱ्यांनी निश्चित केलेल्या युसुफ पठाण यांच्या नावाला विरोध करून अभिषेक बॅनर्जी यांच्या नावाची शिफारस केली. उद्धवसेनेतर्फे प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी निश्चित केले. आपले नाव निश्चित झाल्याचे खुद्द चतुर्वेदी यांनी पक्षप्रमुखांना सांगितले. तेव्हा उद्धवसेनेकडून कोण विदेशात जाणार हे ठरविणे हा आपला अधिकार असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. 

आपला पत्ता कट होणार असे दिसू लागताच हे चतुर्वेदी यांनी रिजीजू यांना ठाकरेंना फोन करायला लावला, असे सूत्रांनी सांगितले. मग प्रश्न उभा राहिला की, आपले खासदार विदेशात काय भूमिका मांडणार हे स्पष्ट झाल्याखेरीज त्यांना कसे पाठवायचे. मग परराष्ट्र मंत्रालयाने खासदार कोणती भूमिका मांडणार, याचा तपशील उद्धवसेनेला दिला. त्यानंतर चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

यापूर्वीही माघार

केंद्रातील २०१४ च्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये अनिल देसाई यांचा मंत्री म्हणून समावेश होण्याचे निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतल्याने देसाई यांना शपथ न घेता माघारी परतावे लागले होते. 

चतुर्वेदी यांची आता भाजपसोबत जवळीक! 

चतुर्वेदी यांच्यामुळे अनिल देसाई यांची भारतीय शिष्टमंडळात समावेशाची संधी हुकली. चतुर्वेदी यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत वर्षभरात संपुष्टात येत आहे. यापूर्वी काँग्रेसमध्ये राहिलेल्या चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविण्याइतपत संख्याबळ उद्धवसेनेकडे नाही. त्यामुळे त्या भाजपसोबत जवळीक वाढवत असल्याचे उद्धवसेनेत बोलले जाते.

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यानंतर धोरण म्हणून विदेशात खासदारांची शिष्टमंडळे पाठविण्याचे ठरवताना त्या-त्या पक्षाला किंवा त्यांच्या गटनेत्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. शशी थरूर, प्रियंका चतुर्वेदी आदी नावे केंद्र सरकारने निश्चित करून पाठवली. त्यामुळे राजकीय पक्षांना निर्णय घेण्याची संधी मिळाली नाही. - अरविंद सावंत, गटनेते उद्धवसेना, लोकसभा.

संसदीय कामकाज मंत्रालयाने अगोदर खासदारांची नावे निश्चित करून त्यांना फोन केले. तसाच मलाही फोन आला. मला वाटले माझ्या पक्ष नेत्यांची अनुमती घेऊन मग मला कळविले असावे. संसदीय कामकाज मंत्रालयाने प्रोटोकॉलचे पालन करायला हवे होते. संवादाच्या अभावातून हे घडले. - प्रियंका चतुर्वेदी, खासदार उद्धवसेना. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना