शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

२७ गावांच्या नगरपालिकेसाठी ५ लाख मतदारांच्या विचारांना प्राधान्य द्यावे - प्रकाश म्हात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 14:50 IST

२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका ही मागणी करणा-यांनी या ठिकाणी राहणा-या नागरिकांचाही विचार करायला हवा. १४ वर्षांपूर्वी महापालिकेत, नंतर ग्रामपंचायत, २०१५मध्ये पुन्हा महापालिकेत आता स्वतंत्र नगरपालिका अशा सततच्या घटनांमुळे नागरिक द्विधा अवस्थेत आहेत. भविष्याचा वेध घेऊन निर्णय घ्यावा असे परखड मत शिवसेनेचे नेते प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे पाणी-रस्ते-आरोग्य या समस्या मार्गी तरी कधी लागणार?  ३० वर्षांनी केडीएमसीला अच्छे दिन येत आहेत

डोंबिवली: २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २७ गाव संघर्ष समिती, अन्य युवा नेते सगळे आग्रही आहेत, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. पण स्वतंत्र नगरपालिका झाल्यावर त्यानंतर भेडसावणा-या समस्यांबाबत काय विचार केला आहे? जो कचरा निर्माण होतो त्याची विल्हेवाट कशी, कुठे लावायची. त्यासह सर्वच समस्या तातडीने उभ्या राहणार आहेत. ही मागणी करणा-यांनी या ठिकाणी राहणा-या नागरिकांचाही विचार करायला हवा. १४ वर्षांपूर्वी महापालिकेत, नंतर ग्रामपंचायत, २०१५मध्ये पुन्हा महापालिकेत आता स्वतंत्र नगरपालिका अशा सततच्या घटनांमुळे नागरिक द्विधा अवस्थेत आहेत. भविष्याचा वेध घेऊन निर्णय घ्यावा असे परखड मत शिवसेनेचे नेते प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केले.निश्चित धोरण नसल्याने अनेकांनी या ठिकाणी रहावे की न रहावे असा पवित्रा घेतला आहे. ज्या नागरिकांमुळे नेते निवडून येतात, त्यांच्या मनस्थितीचा विचार करण्याला प्राधान्य द्यावे असेही म्हात्रे म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस हे देखिल सातत्याने सकारात्मक पवित्रा घेत उम्मीद पे आशा कायम ठेवत आहेत, ते योग्यच आहे. पण कल्याण-डोंबिवली महापालिकेला आता एवढ्या वर्षांनी ते पण पूर्णपणे अच्छेदीन आलेले नाहीत. सुमारे ३० वर्षांनी आता कुठे पाण्याचा प्रश्न काहीसा मार्गी लागला आहे. कच-याची समस्या सर्वश्रुत आहे.२७ गावांचा कचरा ही गावे वगळली होती तरीही केडीएमसी हद्दीतच आधीही आणि आताही जात आहेच. पण यापुढे जर स्वतंत्र नगरपालिका झाली तर मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात होणा-या कच-याचे काय करणार? या ठिकाणी पाणी समस्या भेडसावत आहे, ती मार्गी लावण्यासाठी केडीएमसीने काही का होईना अमृत योजना तर लागू केली, त्यासाठी कोट्यवधींची तरतूदही केली. पाणी समस्या सोडवण्यासाठी काम सुरु झाले आहे. म्हणजे आता केडीएमसीने या २७ गावांना सामावून घेतल्यानंतर या ठिकाणी हळुहळू विकासकामे सुरू झाली आहेत हे वास्तव आहे. तुप खाल्यावर रूप येते असे होत नाहीच ना? निदान थोडा कालावधी जाणारच ना? त्यामुळे कोणतेही निर्णय घेतांना सर्वसामान्य मतदारांना विचारात घेणे अपेक्षित आहे. सगळया निर्णयांमध्ये त्या नागरिकांचा विचार व्हायला हवाच. कचरा टाकण्यासाठी भविष्यात केडीएमसीने नकारात्मक पवित्रा घेतला तर पर्याय काय? आरोग्य सुविधेचा बोजवारा असातांना एवढी वर्षे केडीएमसीवरच येथील नागरिक अवलंबून आहेत ना? असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे कोणताही निर्णय होण्याआधी त्यातून निष्पन्न होणारे परिणाम,त्याची दाहकता याचाही अभ्यास करणे आवश्यक असून अंतिम निर्णयाप्रत जावे असे म्हात्रे म्हणाले.

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवलीkalyanकल्याण