शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांच्या नगरपालिकेसाठी ५ लाख मतदारांच्या विचारांना प्राधान्य द्यावे - प्रकाश म्हात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 14:50 IST

२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका ही मागणी करणा-यांनी या ठिकाणी राहणा-या नागरिकांचाही विचार करायला हवा. १४ वर्षांपूर्वी महापालिकेत, नंतर ग्रामपंचायत, २०१५मध्ये पुन्हा महापालिकेत आता स्वतंत्र नगरपालिका अशा सततच्या घटनांमुळे नागरिक द्विधा अवस्थेत आहेत. भविष्याचा वेध घेऊन निर्णय घ्यावा असे परखड मत शिवसेनेचे नेते प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे पाणी-रस्ते-आरोग्य या समस्या मार्गी तरी कधी लागणार?  ३० वर्षांनी केडीएमसीला अच्छे दिन येत आहेत

डोंबिवली: २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २७ गाव संघर्ष समिती, अन्य युवा नेते सगळे आग्रही आहेत, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. पण स्वतंत्र नगरपालिका झाल्यावर त्यानंतर भेडसावणा-या समस्यांबाबत काय विचार केला आहे? जो कचरा निर्माण होतो त्याची विल्हेवाट कशी, कुठे लावायची. त्यासह सर्वच समस्या तातडीने उभ्या राहणार आहेत. ही मागणी करणा-यांनी या ठिकाणी राहणा-या नागरिकांचाही विचार करायला हवा. १४ वर्षांपूर्वी महापालिकेत, नंतर ग्रामपंचायत, २०१५मध्ये पुन्हा महापालिकेत आता स्वतंत्र नगरपालिका अशा सततच्या घटनांमुळे नागरिक द्विधा अवस्थेत आहेत. भविष्याचा वेध घेऊन निर्णय घ्यावा असे परखड मत शिवसेनेचे नेते प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केले.निश्चित धोरण नसल्याने अनेकांनी या ठिकाणी रहावे की न रहावे असा पवित्रा घेतला आहे. ज्या नागरिकांमुळे नेते निवडून येतात, त्यांच्या मनस्थितीचा विचार करण्याला प्राधान्य द्यावे असेही म्हात्रे म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस हे देखिल सातत्याने सकारात्मक पवित्रा घेत उम्मीद पे आशा कायम ठेवत आहेत, ते योग्यच आहे. पण कल्याण-डोंबिवली महापालिकेला आता एवढ्या वर्षांनी ते पण पूर्णपणे अच्छेदीन आलेले नाहीत. सुमारे ३० वर्षांनी आता कुठे पाण्याचा प्रश्न काहीसा मार्गी लागला आहे. कच-याची समस्या सर्वश्रुत आहे.२७ गावांचा कचरा ही गावे वगळली होती तरीही केडीएमसी हद्दीतच आधीही आणि आताही जात आहेच. पण यापुढे जर स्वतंत्र नगरपालिका झाली तर मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात होणा-या कच-याचे काय करणार? या ठिकाणी पाणी समस्या भेडसावत आहे, ती मार्गी लावण्यासाठी केडीएमसीने काही का होईना अमृत योजना तर लागू केली, त्यासाठी कोट्यवधींची तरतूदही केली. पाणी समस्या सोडवण्यासाठी काम सुरु झाले आहे. म्हणजे आता केडीएमसीने या २७ गावांना सामावून घेतल्यानंतर या ठिकाणी हळुहळू विकासकामे सुरू झाली आहेत हे वास्तव आहे. तुप खाल्यावर रूप येते असे होत नाहीच ना? निदान थोडा कालावधी जाणारच ना? त्यामुळे कोणतेही निर्णय घेतांना सर्वसामान्य मतदारांना विचारात घेणे अपेक्षित आहे. सगळया निर्णयांमध्ये त्या नागरिकांचा विचार व्हायला हवाच. कचरा टाकण्यासाठी भविष्यात केडीएमसीने नकारात्मक पवित्रा घेतला तर पर्याय काय? आरोग्य सुविधेचा बोजवारा असातांना एवढी वर्षे केडीएमसीवरच येथील नागरिक अवलंबून आहेत ना? असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे कोणताही निर्णय होण्याआधी त्यातून निष्पन्न होणारे परिणाम,त्याची दाहकता याचाही अभ्यास करणे आवश्यक असून अंतिम निर्णयाप्रत जावे असे म्हात्रे म्हणाले.

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवलीkalyanकल्याण