शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

२७ गावांच्या नगरपालिकेसाठी ५ लाख मतदारांच्या विचारांना प्राधान्य द्यावे - प्रकाश म्हात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 14:50 IST

२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका ही मागणी करणा-यांनी या ठिकाणी राहणा-या नागरिकांचाही विचार करायला हवा. १४ वर्षांपूर्वी महापालिकेत, नंतर ग्रामपंचायत, २०१५मध्ये पुन्हा महापालिकेत आता स्वतंत्र नगरपालिका अशा सततच्या घटनांमुळे नागरिक द्विधा अवस्थेत आहेत. भविष्याचा वेध घेऊन निर्णय घ्यावा असे परखड मत शिवसेनेचे नेते प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे पाणी-रस्ते-आरोग्य या समस्या मार्गी तरी कधी लागणार?  ३० वर्षांनी केडीएमसीला अच्छे दिन येत आहेत

डोंबिवली: २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २७ गाव संघर्ष समिती, अन्य युवा नेते सगळे आग्रही आहेत, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. पण स्वतंत्र नगरपालिका झाल्यावर त्यानंतर भेडसावणा-या समस्यांबाबत काय विचार केला आहे? जो कचरा निर्माण होतो त्याची विल्हेवाट कशी, कुठे लावायची. त्यासह सर्वच समस्या तातडीने उभ्या राहणार आहेत. ही मागणी करणा-यांनी या ठिकाणी राहणा-या नागरिकांचाही विचार करायला हवा. १४ वर्षांपूर्वी महापालिकेत, नंतर ग्रामपंचायत, २०१५मध्ये पुन्हा महापालिकेत आता स्वतंत्र नगरपालिका अशा सततच्या घटनांमुळे नागरिक द्विधा अवस्थेत आहेत. भविष्याचा वेध घेऊन निर्णय घ्यावा असे परखड मत शिवसेनेचे नेते प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केले.निश्चित धोरण नसल्याने अनेकांनी या ठिकाणी रहावे की न रहावे असा पवित्रा घेतला आहे. ज्या नागरिकांमुळे नेते निवडून येतात, त्यांच्या मनस्थितीचा विचार करण्याला प्राधान्य द्यावे असेही म्हात्रे म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस हे देखिल सातत्याने सकारात्मक पवित्रा घेत उम्मीद पे आशा कायम ठेवत आहेत, ते योग्यच आहे. पण कल्याण-डोंबिवली महापालिकेला आता एवढ्या वर्षांनी ते पण पूर्णपणे अच्छेदीन आलेले नाहीत. सुमारे ३० वर्षांनी आता कुठे पाण्याचा प्रश्न काहीसा मार्गी लागला आहे. कच-याची समस्या सर्वश्रुत आहे.२७ गावांचा कचरा ही गावे वगळली होती तरीही केडीएमसी हद्दीतच आधीही आणि आताही जात आहेच. पण यापुढे जर स्वतंत्र नगरपालिका झाली तर मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात होणा-या कच-याचे काय करणार? या ठिकाणी पाणी समस्या भेडसावत आहे, ती मार्गी लावण्यासाठी केडीएमसीने काही का होईना अमृत योजना तर लागू केली, त्यासाठी कोट्यवधींची तरतूदही केली. पाणी समस्या सोडवण्यासाठी काम सुरु झाले आहे. म्हणजे आता केडीएमसीने या २७ गावांना सामावून घेतल्यानंतर या ठिकाणी हळुहळू विकासकामे सुरू झाली आहेत हे वास्तव आहे. तुप खाल्यावर रूप येते असे होत नाहीच ना? निदान थोडा कालावधी जाणारच ना? त्यामुळे कोणतेही निर्णय घेतांना सर्वसामान्य मतदारांना विचारात घेणे अपेक्षित आहे. सगळया निर्णयांमध्ये त्या नागरिकांचा विचार व्हायला हवाच. कचरा टाकण्यासाठी भविष्यात केडीएमसीने नकारात्मक पवित्रा घेतला तर पर्याय काय? आरोग्य सुविधेचा बोजवारा असातांना एवढी वर्षे केडीएमसीवरच येथील नागरिक अवलंबून आहेत ना? असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे कोणताही निर्णय होण्याआधी त्यातून निष्पन्न होणारे परिणाम,त्याची दाहकता याचाही अभ्यास करणे आवश्यक असून अंतिम निर्णयाप्रत जावे असे म्हात्रे म्हणाले.

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवलीkalyanकल्याण