शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

बारवी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीला प्राधान्य; सुभाष देसाई यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:03 IST

धरणाचा केला पाहणी दौरा

बदलापूर : बारवी धरणाची उंची वाढवल्यावर धरणात प्रथमच पूर्णक्षमतेने पाणी भरण्यात आले आहे. या धरणासाठी ज्या गावांना विस्थापित व्हावे लागले, त्यांच्या कुटुंबाने प्रकल्पासाठी दिलेले योगदान मोलाचे होते. त्यामुळे आता धरणाचे काम झाल्याने प्रकल्पग्रस्तांचे काम पूर्ण करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला जाईल, असे स्पष्ट केले.बारवी धरण भरून वाहू लागल्याने या धरणाची पाहणी करण्यासाठी उद्योगमंत्री देसाई हे धरणावर आले होते. एमआयडीसीच्या मालकीच्या या धरणामुळे ठाणे जिल्ह्याची तहान भागणार आहे. अशा या धरणाची विधिवत पूजा करण्यासाठी देसाई आले होते. त्यांनी धरणाच्या कामाची आणि धरणाच्या दरवाजांची पाहणी केली. तसेच धरण क्षेत्रात बाधित झालेल्या गावांची माहिती घेतली. धरणातील पाणीसाठा आणि धरणातून सोडण्यात येणारे पाणी याची माहिती त्यांनी घेतली. तसेच बाधित कुटुंबीयांना करण्यात आलेली मदत आणि त्यांच्या पुनर्वसन पॅकेजची माहिती घेतली. तसेच अद्यापही ज्यांचे पुनर्वसन केलेले नाही, त्यांच्या समस्येची माहिती घेतली.घरमालकांना भरपाई दिलीदेसाई यांना धरणाविषयी माहिती देताना अधिकारी प्रकाश चव्हाण यांनी धरण पूर्णक्षमतेने भरल्यावर काय स्थिती निर्माण झाली आहे, याची माहिती दिली. जी घरे पाण्याखाली आली आहे आणि त्या घरमालकांना भरपाई दिलेली आहे, त्या घरांमधील बांधकाम साहित्यसंबंधित व्यक्तीलाच देण्याबाबत मत व्यक्त करण्यात आले.फलक लावलेपाण्याच्या प्रवाहात जाण्यासाठी असलेले रस्ते हे बंद केले आहेत. तसेच स्थानिकांना मासेमारी आणि पोहण्यासाठी न उतरण्याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच पर्यटकही काही ठिकाणी पाण्यात उतरत असल्याने त्या ठिकाणीही धोका असल्याचे फलक लावण्यात आले आहेत.