शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

बारवी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीला प्राधान्य; सुभाष देसाई यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:03 IST

धरणाचा केला पाहणी दौरा

बदलापूर : बारवी धरणाची उंची वाढवल्यावर धरणात प्रथमच पूर्णक्षमतेने पाणी भरण्यात आले आहे. या धरणासाठी ज्या गावांना विस्थापित व्हावे लागले, त्यांच्या कुटुंबाने प्रकल्पासाठी दिलेले योगदान मोलाचे होते. त्यामुळे आता धरणाचे काम झाल्याने प्रकल्पग्रस्तांचे काम पूर्ण करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला जाईल, असे स्पष्ट केले.बारवी धरण भरून वाहू लागल्याने या धरणाची पाहणी करण्यासाठी उद्योगमंत्री देसाई हे धरणावर आले होते. एमआयडीसीच्या मालकीच्या या धरणामुळे ठाणे जिल्ह्याची तहान भागणार आहे. अशा या धरणाची विधिवत पूजा करण्यासाठी देसाई आले होते. त्यांनी धरणाच्या कामाची आणि धरणाच्या दरवाजांची पाहणी केली. तसेच धरण क्षेत्रात बाधित झालेल्या गावांची माहिती घेतली. धरणातील पाणीसाठा आणि धरणातून सोडण्यात येणारे पाणी याची माहिती त्यांनी घेतली. तसेच बाधित कुटुंबीयांना करण्यात आलेली मदत आणि त्यांच्या पुनर्वसन पॅकेजची माहिती घेतली. तसेच अद्यापही ज्यांचे पुनर्वसन केलेले नाही, त्यांच्या समस्येची माहिती घेतली.घरमालकांना भरपाई दिलीदेसाई यांना धरणाविषयी माहिती देताना अधिकारी प्रकाश चव्हाण यांनी धरण पूर्णक्षमतेने भरल्यावर काय स्थिती निर्माण झाली आहे, याची माहिती दिली. जी घरे पाण्याखाली आली आहे आणि त्या घरमालकांना भरपाई दिलेली आहे, त्या घरांमधील बांधकाम साहित्यसंबंधित व्यक्तीलाच देण्याबाबत मत व्यक्त करण्यात आले.फलक लावलेपाण्याच्या प्रवाहात जाण्यासाठी असलेले रस्ते हे बंद केले आहेत. तसेच स्थानिकांना मासेमारी आणि पोहण्यासाठी न उतरण्याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच पर्यटकही काही ठिकाणी पाण्यात उतरत असल्याने त्या ठिकाणीही धोका असल्याचे फलक लावण्यात आले आहेत.