शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

पंतप्रधान आवास योजनेत बीएसयूपी होणार समाविष्ट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 03:12 IST

तब्बल नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या बीएसयूपी योजनेतील केवळ एका आठ मजली इमारतीचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले

भार्इंदर : तब्बल नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या बीएसयूपी योजनेतील केवळ एका आठ मजली इमारतीचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले. मात्र, उर्वरित सात इमारतींचे काम अद्याप सुरू असून रेंगाळलेल्या या योजनेला सरकारी निधीचा ब्रेक लागला आहे. त्यामुळे आता ही योजना नवीन पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करावी, या मागणीचा प्रस्ताव पालिकेने तयार केला असून तो मान्यतेसाठी महासभेपुढे आणण्याच्या तयारीत प्रशासन असल्याचे सूत्रांनी सांगितले.२००९ मध्ये काशिमीरा येथील जनतानगर आणि काशीचर्च परिसरात एकूण ३३० कोटींची बीएसयूपी योजना राबवण्याच्या प्रशासकीय प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली. मंजूर प्रस्ताव पालिकेने केंद्र तसेच राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला. मात्र, सरकारने पालिकेने निर्धारित केलेल्या योजनेच्या खर्चात कपात करून २७९ कोटींच्याच योजनेला मान्यता दिली. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून ५० टक्के व राज्य सरकारकडून ३० टक्के अनुदान पालिकेला देण्याचे निश्चित करण्यात आले. तर, उर्वरित २० टक्कयांपैकी ११ टक्के निधी पालिकेकडून अदा केला जाणार असून नऊ टक्के खर्च लाभार्थ्यांकडून वसूल केला जाणार आहे.या योजनेत एकूण चार हजार १३६ लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रत्येकी आठ मजल्यांच्या एकूण २३ इमारती प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी जनतानगर येथील १७९ लाभार्थ्यांना पालिकेने गतवर्षी एका आठ मजली इमारतीतील सदनिकांचा ताबा दिला आहे. सुरुवातीला या योजनेला स्थानिकांकडून तीव्र विरोध झाल्याने योजना रेंगाळली. परिणामी, तिला अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. अखेर, २०१३ मध्ये प्रत्यक्षात योजनेच्या कामाला सुरुवात झाली, तरी अनेकदा विकासकांनीही आर्थिक अडचणीमुळे योजना लटकत ठेवली.दरम्यान, वाढत्या महागाईमुळे योजनेचा खर्च वाढल्याने पालिकेने एकूण जागेपैकी २५ टक्के जागा व्यावसायिक वापरासाठी विकसित करून योजनेचा खर्च भरून काढण्याचा निर्णय घेतला. त्याचा प्रस्ताव पालिकेने राज्य सरकारकडे पाठवला होता. तो राज्य सरकारने केंद्राकडे मान्यतेसाठी पाठवला. त्यात सुरुवातीला बांधण्यात येणाऱ्या प्रत्येकी आठ मजल्यांच्या २३ इमारतींऐवजी दोन आठ मजल्यांच्या आणि प्रत्येकी १६ मजल्यांच्या सहा इमारती बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले. त्याला मान्यता देण्यात आली.या योजनेच्या सरकारी खर्चानुसार पालिकेला केंद्र व राज्य सरकारकडून सुमारे २२३ कोटींचे अनुदान मिळणे अपेक्षित असताना अद्याप जवळपास ७० कोटींचेच अनुदान प्राप्त झाले आहे. त्यातच गेल्या नऊ वर्षांपासून ही योजना सुरू असल्याने सरकारने पालिकेला निधी देण्यासच ब्रेक लावला आहे. एका आठ मजली आणि १६ मजली सहा इमारतींचे काम सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सरकारी अनुदानाखेरीज योजना पूर्ण कशी करायची, असा प्रश्न प्रशासनापुढे आहे.