शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

नेवाळी आंदोलनाच्या मुळाशी जमिनीचा भाव

By admin | Updated: June 24, 2017 00:33 IST

नेवाळीची जागा संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे, याबद्दल दुमत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर ती जागा शेतकऱ्यांना परत करण्याच्या आश्वासनाभोवती तेथील आंदोलन फिरते आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीची जागा संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे, याबद्दल दुमत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर ती जागा शेतकऱ्यांना परत करण्याच्या आश्वासनाभोवती तेथील आंदोलन फिरते आहे. पण नेवाळीला विमानतळ करण्याची मागणी पुढे आली आणि गेल्या तीन वर्षांत त्या जागेभोवती जे भव्य प्रकल्प उभे राहिले. त्यातून जमिनीला सोन्याहून अधिक भाव आला आणि हे आंदोलन भडकत गेले. ब्रिटिशांच्या काळातील लाभार्थी आणि आता ज्यांच्या ताब्यात जमिनी आहेत त्यांना मिळणारा गडगंज पैसा यातून असंतोष खदखदत गेला. त्याला बिल्डरांनी, राजकारण्यांनी खतपाणी घातले आणि त्याची परिणती हिंसक आंदोलनात झाल्याचे गावकऱ्यांशी बोलल्यानंतर जाणवले. राज्य सरकारने २०१५ साली २७ गावांत कल्याण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. त्यासाठी एक हजार ८९ हेक्टर जागा घेतली जाणार आहे. त्यासाठी एक हजार ८९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हे ग्रोथ सेंटर भव्य गृहसंकुलांमध्ये आहे आणि आंदोलन झालेली त्याला लागून आहेत. भाल, द्वारली ही गावे कल्याण तालुक्यातील आहेत. ही गावे नेवाळी एरोड्रमच्या जागेत बाधित झालेली आहेत. नेवाळी, नेवाळी पाडा, चिंचवली, खोणी, वसार, माणेरा, तीसगाव, आडिवली, वडवली, धामटण ही अंबरनाथ तालुक्यातील गावे एरोड्रमच्या जागेने बाधित आहेत. या गावांना लागून आणखी काही बड्या बिल्डरांचे प्रकल्प सुरू आहेत. खोणी-तळोजा मार्ग हा तळोजा एमआयडीसीकडे जातो. हा मार्ग तळोजा-डोंबिवली, अंबरनाथ एमआयडीसीला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरही बिल्डरांनी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. अंबरनाथ-पाले गावातही गृहप्रकल्प सुरु आहेत. तसेच उल्हासनगर गायकवाड पाडामार्गे अंबरनाथ-शीळ रस्त्यावर काही गृहप्रकल्प सुरु आहेत. याशिवाय कल्याण चक्की नाका ते मलंगगड रोडवर नांदिवली, द्वारली, भाल या भागात रस्त्यालगत चार ते आठ मजली इमारती उभ्या आहेत. या इमारती कुणाच्या परानगीने इतक्या उंच झाल्या, हे कोणी सांगायला तयार नाही. त्या बेकायदा आहेत, का याची शहानिशा कधी महसूल खात्याने केली नाही. हे क्षेत्र एमएमआरडीएच्या अखत्यारीत येते. त्यांनीही या बांधकामांना परवानगी दिलेली नाही. त्यामुले आपल्याभोवती हा सगळा ‘विकास’ होत असताना आपल्या जमिनी गुंतून पडल्या आणि आपण कोरडेच राहिल्याची तीव्र भावना नेवाळी विमानतळासाठी जमिनी गेलेल्या ग्रामस्थांत आहे. संबंधित वृत्त/पान २