शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळी आंदोलनाच्या मुळाशी जमिनीचा भाव

By admin | Updated: June 24, 2017 00:33 IST

नेवाळीची जागा संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे, याबद्दल दुमत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर ती जागा शेतकऱ्यांना परत करण्याच्या आश्वासनाभोवती तेथील आंदोलन फिरते आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीची जागा संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे, याबद्दल दुमत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर ती जागा शेतकऱ्यांना परत करण्याच्या आश्वासनाभोवती तेथील आंदोलन फिरते आहे. पण नेवाळीला विमानतळ करण्याची मागणी पुढे आली आणि गेल्या तीन वर्षांत त्या जागेभोवती जे भव्य प्रकल्प उभे राहिले. त्यातून जमिनीला सोन्याहून अधिक भाव आला आणि हे आंदोलन भडकत गेले. ब्रिटिशांच्या काळातील लाभार्थी आणि आता ज्यांच्या ताब्यात जमिनी आहेत त्यांना मिळणारा गडगंज पैसा यातून असंतोष खदखदत गेला. त्याला बिल्डरांनी, राजकारण्यांनी खतपाणी घातले आणि त्याची परिणती हिंसक आंदोलनात झाल्याचे गावकऱ्यांशी बोलल्यानंतर जाणवले. राज्य सरकारने २०१५ साली २७ गावांत कल्याण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. त्यासाठी एक हजार ८९ हेक्टर जागा घेतली जाणार आहे. त्यासाठी एक हजार ८९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हे ग्रोथ सेंटर भव्य गृहसंकुलांमध्ये आहे आणि आंदोलन झालेली त्याला लागून आहेत. भाल, द्वारली ही गावे कल्याण तालुक्यातील आहेत. ही गावे नेवाळी एरोड्रमच्या जागेत बाधित झालेली आहेत. नेवाळी, नेवाळी पाडा, चिंचवली, खोणी, वसार, माणेरा, तीसगाव, आडिवली, वडवली, धामटण ही अंबरनाथ तालुक्यातील गावे एरोड्रमच्या जागेने बाधित आहेत. या गावांना लागून आणखी काही बड्या बिल्डरांचे प्रकल्प सुरू आहेत. खोणी-तळोजा मार्ग हा तळोजा एमआयडीसीकडे जातो. हा मार्ग तळोजा-डोंबिवली, अंबरनाथ एमआयडीसीला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरही बिल्डरांनी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. अंबरनाथ-पाले गावातही गृहप्रकल्प सुरु आहेत. तसेच उल्हासनगर गायकवाड पाडामार्गे अंबरनाथ-शीळ रस्त्यावर काही गृहप्रकल्प सुरु आहेत. याशिवाय कल्याण चक्की नाका ते मलंगगड रोडवर नांदिवली, द्वारली, भाल या भागात रस्त्यालगत चार ते आठ मजली इमारती उभ्या आहेत. या इमारती कुणाच्या परानगीने इतक्या उंच झाल्या, हे कोणी सांगायला तयार नाही. त्या बेकायदा आहेत, का याची शहानिशा कधी महसूल खात्याने केली नाही. हे क्षेत्र एमएमआरडीएच्या अखत्यारीत येते. त्यांनीही या बांधकामांना परवानगी दिलेली नाही. त्यामुले आपल्याभोवती हा सगळा ‘विकास’ होत असताना आपल्या जमिनी गुंतून पडल्या आणि आपण कोरडेच राहिल्याची तीव्र भावना नेवाळी विमानतळासाठी जमिनी गेलेल्या ग्रामस्थांत आहे. संबंधित वृत्त/पान २