शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

नेवाळी आंदोलनाच्या मुळाशी जमिनीचा भाव

By admin | Updated: June 24, 2017 00:33 IST

नेवाळीची जागा संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे, याबद्दल दुमत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर ती जागा शेतकऱ्यांना परत करण्याच्या आश्वासनाभोवती तेथील आंदोलन फिरते आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीची जागा संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे, याबद्दल दुमत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर ती जागा शेतकऱ्यांना परत करण्याच्या आश्वासनाभोवती तेथील आंदोलन फिरते आहे. पण नेवाळीला विमानतळ करण्याची मागणी पुढे आली आणि गेल्या तीन वर्षांत त्या जागेभोवती जे भव्य प्रकल्प उभे राहिले. त्यातून जमिनीला सोन्याहून अधिक भाव आला आणि हे आंदोलन भडकत गेले. ब्रिटिशांच्या काळातील लाभार्थी आणि आता ज्यांच्या ताब्यात जमिनी आहेत त्यांना मिळणारा गडगंज पैसा यातून असंतोष खदखदत गेला. त्याला बिल्डरांनी, राजकारण्यांनी खतपाणी घातले आणि त्याची परिणती हिंसक आंदोलनात झाल्याचे गावकऱ्यांशी बोलल्यानंतर जाणवले. राज्य सरकारने २०१५ साली २७ गावांत कल्याण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. त्यासाठी एक हजार ८९ हेक्टर जागा घेतली जाणार आहे. त्यासाठी एक हजार ८९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हे ग्रोथ सेंटर भव्य गृहसंकुलांमध्ये आहे आणि आंदोलन झालेली त्याला लागून आहेत. भाल, द्वारली ही गावे कल्याण तालुक्यातील आहेत. ही गावे नेवाळी एरोड्रमच्या जागेत बाधित झालेली आहेत. नेवाळी, नेवाळी पाडा, चिंचवली, खोणी, वसार, माणेरा, तीसगाव, आडिवली, वडवली, धामटण ही अंबरनाथ तालुक्यातील गावे एरोड्रमच्या जागेने बाधित आहेत. या गावांना लागून आणखी काही बड्या बिल्डरांचे प्रकल्प सुरू आहेत. खोणी-तळोजा मार्ग हा तळोजा एमआयडीसीकडे जातो. हा मार्ग तळोजा-डोंबिवली, अंबरनाथ एमआयडीसीला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरही बिल्डरांनी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. अंबरनाथ-पाले गावातही गृहप्रकल्प सुरु आहेत. तसेच उल्हासनगर गायकवाड पाडामार्गे अंबरनाथ-शीळ रस्त्यावर काही गृहप्रकल्प सुरु आहेत. याशिवाय कल्याण चक्की नाका ते मलंगगड रोडवर नांदिवली, द्वारली, भाल या भागात रस्त्यालगत चार ते आठ मजली इमारती उभ्या आहेत. या इमारती कुणाच्या परानगीने इतक्या उंच झाल्या, हे कोणी सांगायला तयार नाही. त्या बेकायदा आहेत, का याची शहानिशा कधी महसूल खात्याने केली नाही. हे क्षेत्र एमएमआरडीएच्या अखत्यारीत येते. त्यांनीही या बांधकामांना परवानगी दिलेली नाही. त्यामुले आपल्याभोवती हा सगळा ‘विकास’ होत असताना आपल्या जमिनी गुंतून पडल्या आणि आपण कोरडेच राहिल्याची तीव्र भावना नेवाळी विमानतळासाठी जमिनी गेलेल्या ग्रामस्थांत आहे. संबंधित वृत्त/पान २