शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

वाहतूक पोलिसांवर कारवाईवेळी दबाव

By admin | Updated: March 15, 2017 02:20 IST

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना बहुतांशी वेळा पोलिसांवर लोकप्रतिनिधी व समाजातील प्रतिष्ठांचा दबाब येतो

डोंबिवली : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना बहुतांशी वेळा पोलिसांवर लोकप्रतिनिधी व समाजातील प्रतिष्ठांचा दबाब येतो. हे योग्य नाही. शहरात ठिकठिकाणी कोंडी जरी होत असली तरीही वाहतूक पोलीस सूपरमॅन नाहीत. नागरिकांनी उपोषणापेक्षा वाहतूक पोलिसांच्या समस्या विचारात घेऊन त्यांना ‘पोलीस मित्र’ म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण वाहतूक विभागाचे अधिकारी बाळासाहेब आव्हाड यांनी येथे केले. शहरातील कोडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस ठोेस उपाययोजना करत नसल्याने नगरसेवक मंदार हळबे यांनी साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर रविवारी बोडस मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत आव्हाड बोलत होते.ते म्हणाले की, नागरिकांनी वाहनांचा वापर कमीत कमी केला पाहिजे. त्याउलट चालवण्यावर भर द्यावा. आधीच या शहरातील रस्ते अरुंद आहेत. तर वाहने अधिक आहेत. इंदिरा गांधी चौकात कारवाईच्या वेळी लायसन्स तपासले, पण केवळ ५० टक्केच रिक्षाचालक दिसले. अन्य कुठे गेले, अशा वेळी नागरिकांच्या सतर्कतेची, जागृतीची अपेक्षा असते. पण तसे होत नाही. रेल्वे स्थानक परिसरातून पाच नागरिक वावरतात. कोंडीमुळे तेथे त्यांची गैरसोय होते. पण तेथील जाग वाढत नसून, लोकसंख्या व वाहनांची संख्या वाढत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. तसेच तेथील फेरीवाल्यांवरही सातत्याने कारवाई व्हायला हवी. त्यासाठी महापालिकेलाही जाब विचारायला हवा. ठाकुर्लीचा उड्डाणपूल वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही, असे ते म्हणाले.शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी गोविंद गंभीरे यांनीही त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. सध्या कागदोपत्री २३ अधिकारी-कर्मचारी आहेत. परंतु, विविध कारणांमुळे दिवसाला १२ कर्मचारी उपस्थित असतात. नागरिकांनी पोलीस मित्र म्हणून पुढे यावे. शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचा फटका वाहतुकीला बसत आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण करताना अडचणी येतात. पण तरीही कोणतीही टीका-टिपण्णी न करता, कारणे न देता माझे सर्व कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहेत. सध्या आणखी एका टोइंग व्हॅनची गरज आहे. त्यासाठी हळबे यांनी १० लाखांचा निधी देण्याचे म्हंटले तरी तसा निधी घेता येत नाही. त्यासाठी त्यांनी ठाण्यातील वरिष्ठांना साकडे घालावे, असे गंभीरे म्हणाले. या बैठकीचे अध्यक्ष पी. जी. कुलकर्णी यांनी, वाहतूक नियंत्रणाची कौशल्ये सांगितली. शहरात सिग्नलचे जाळे नाही, ही शोकांतिका आहे. रेल्वेचे सिग्नल बिघाडल्यास सर्वत्र गोंधळ उडतो. पण शहरातील ही यंत्रणा तीन वर्षे बंद असूनही काहीच हालचाल होत नाही. यावरूनच या शहरातील नागरिक व पोलीस किती सतर्क आहे, हे लक्षात येते. सिग्नलसाठी महापालिकेकडे पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)