शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीच्या जमीनखरेदीसाठी दबाव, अधिका-यावर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:11 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा विरोध मोडून काढत वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील विशाखा धानके यांना दमबाजी करत तिचे संमतीपत्र घेतल्याचा आरोप उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यावर करण्यात आला आहे.

आसनगाव : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा विरोध मोडून काढत वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील विशाखा धानके यांना दमबाजी करत तिचे संमतीपत्र घेतल्याचा आरोप उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत धानके तक्रार करणार असल्याचे समजताच ते संमतीपत्र फाडून टाकण्यात आल्याचा आरोप गायकर यांच्यावर करण्यात आला, पण तो गायकर यांनी फेटाळून लावला.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाºयांच्या या दबंगगिरीबद्दल या विधवेच्या परदेशातील मुलींना कळताच, त्यांनी भारतीय दूतावासात तक्रार करण्याचा इशारा संबंधित अधिकारी तसेच कर्मचाºयांना दिला. त्यामुळे घाबरलेल्या अधिकाºयांनी संमतीपत्र फाडूनच टाकले. मात्र, अधिकाºयांच्या धाकदपटशाने घाबरलेल्या या महिलेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे.वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. ३८१ मधील १ हेक्टर ७४ गुंठे, गट नं. ३७४ मधील ६६ गुंठे शेतजमीन समृद्धी महामार्गाखाली जाणार आहे. या शेतजमिनी विशाखा विनायक धानके आणि त्यांच्या मुली रिमासचिन पवार आणि रश्मी राहुल म्हात्रे यांच्या नावावर आहेत. या जमिनींना आज कोणतेही कूळ नसल्याने ही जमीन आदिवासी मजुरांना लागवडीसाठी देऊन अनेक वर्षांपासून कसली जात आहेत. समृद्धीच्या जमीन खरेदीसाठी महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी आणि त्यांच्या कर्मचाºयांनी कार्यालयात बोलावून दमबाजी केली. या जमिनींवर आदिवासींनी हक्क सांगितला असून जमीनविक्रीच्या पैशांतील काही पैसे आम्हाला तसेच आदिवासींना द्यावे लागणार असल्याचे सांगत संमतीपत्रावर जबरदस्तीने सह्या घेतल्याचा आरोप धानके यांनी केला.गोंधळलेल्या धानके यांनी हा प्रकार लंडन येथे स्थायिक असलेल्या मुलींना सांगितला. त्यांनी रेवती गायकर यांच्याविरोधात भारतीय दूतावासात तक्रार करण्याचा इशारा देताच ते संमतीपत्र अधिकाºयांनी फाडून त्याचे फोटो मुलींना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले. मात्र, भेदरलेल्या धानके यांनी ठाणे पोलीस अधीक्षक, ठाणे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देत जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.