शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

सूर्याच्या पाण्यासाठी लढा उभारण्याची सज्जता

By admin | Updated: March 17, 2017 05:49 IST

सूर्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पायदळी तुडविला जात असून त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनाचे मोठे क्षेत्र नापीक ठरण्याची व भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे

हितेन नाईक , पालघरसूर्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पायदळी तुडविला जात असून त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनाचे मोठे क्षेत्र नापीक ठरण्याची व भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागण्याची आपत्ती ओढवू शकते. हे लक्षात घेऊन सूर्याचे पाणी जिल्ह्यातच राखण्यासाठी आरपारचा लढा उभारण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. सूर्या प्रकल्प हा जिल्ह्यातील आदिवासी भागातील प्रकल्प असून पालघर, विक्रमगड, डहाणू या तीन आदिवासी तालुक्यातील सुमारे १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे व ६.७५ मेगा वॅट वीजनिर्मिती करणे हा मूळ उद्देश बाजूला सारून मतांच्या वजनाचा सोईस्कररित्या वापर करून इथले पाणी वसई-विरारला नेले. राजकीय दबावातून सरकारने मीरा-भार्इंदरला दिले. त्यानंतर उरलेले पाणी मुंबई उपप्रदेशासाठी वळविण्यात आले आहे. हे रोखण्यासाठी आयोजिलेल्या बैठकीला सूर्याच्या पाण्यासाठी प्रारंभा पासून लढा देणारे माजी आमदार नवनीत भाई शहा, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे, भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर पाटील, कुणबी सेनेचे जितू राऊळ, काँग्रेसचे केदार काळे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, माकपचे एडवर्ड वरठा, कष्टकरीचे ब्रायन लोबो, आदिवासी एकताचे दत्ता करबट, श्रमजीवीचे राजेश राऊत, शेतकरी संघर्षचे संतोष पावडे, राजेश अधिकारी होते. रिपाई, मनसे, राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे.डहाणू : सूर्या पाटबंधारे विभागांतर्गत आगवण ग्रामपंचायत हद्दीत चरी कोटबी येथे मागील काही महिन्यांपासून कालव्याला मोठे भगदाड पडून पाण्याचा अपव्यय होऊन शेतीला पाणी मिळत नव्हते. परिणामी आगवण परिसरात पाणीटंचाई भेडसावू लागली होती. त्याबाबत ग्रामपंचायतीने कालव्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. अखेरीस सरपंच दमयंती भुयाळ, उपसरपंच रूपजी कोम, ग्रामसेवक अरविंद संखे यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्यावतीने हा कालवा दुरुस्त केला. त्यामुळे आगवण गावातील आजूबाजूच्या पाड्यांची पिण्याच्या पाण्याची, तसेच सिंचनाच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. सूर्या पाटबंधारे विभागाचा कालवा दाभले, वरून चरी कोटबी आगवणकडे जातो. भगदाड पडून पाणी वाहून जात होते. त्यामुळे चरी कोटबी, आगवण , दाबले, चिंचले या पाड्यांना शेतीला पाणी मिळत नव्हते. त्याबाबत ग्रामपंचायतीने सतत सूर्या पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करु न दुरूस्ती करण्याची मागणी केली होती पण ती व्यर्थ ठरली.जवळजवळ १ लाख खर्च केले, जलवाहिनी दुरुस्त केली. आगवण ग्रामपंचायतीच्या मानपाडा, वाघाडी, शिशुपाडा, नवासाखरा, आगचण, चरी कोटबी या पाड्यांची पाण्याची समस्येवर त्यामुळे काही अंशी मात झाल्याने ग्रामस्थात आनंदाचे वातावरण पसरले आहे.