शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

सूर्याच्या पाण्यासाठी लढा उभारण्याची सज्जता

By admin | Updated: March 17, 2017 05:49 IST

सूर्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पायदळी तुडविला जात असून त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनाचे मोठे क्षेत्र नापीक ठरण्याची व भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे

हितेन नाईक , पालघरसूर्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पायदळी तुडविला जात असून त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनाचे मोठे क्षेत्र नापीक ठरण्याची व भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागण्याची आपत्ती ओढवू शकते. हे लक्षात घेऊन सूर्याचे पाणी जिल्ह्यातच राखण्यासाठी आरपारचा लढा उभारण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. सूर्या प्रकल्प हा जिल्ह्यातील आदिवासी भागातील प्रकल्प असून पालघर, विक्रमगड, डहाणू या तीन आदिवासी तालुक्यातील सुमारे १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे व ६.७५ मेगा वॅट वीजनिर्मिती करणे हा मूळ उद्देश बाजूला सारून मतांच्या वजनाचा सोईस्कररित्या वापर करून इथले पाणी वसई-विरारला नेले. राजकीय दबावातून सरकारने मीरा-भार्इंदरला दिले. त्यानंतर उरलेले पाणी मुंबई उपप्रदेशासाठी वळविण्यात आले आहे. हे रोखण्यासाठी आयोजिलेल्या बैठकीला सूर्याच्या पाण्यासाठी प्रारंभा पासून लढा देणारे माजी आमदार नवनीत भाई शहा, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे, भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर पाटील, कुणबी सेनेचे जितू राऊळ, काँग्रेसचे केदार काळे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, माकपचे एडवर्ड वरठा, कष्टकरीचे ब्रायन लोबो, आदिवासी एकताचे दत्ता करबट, श्रमजीवीचे राजेश राऊत, शेतकरी संघर्षचे संतोष पावडे, राजेश अधिकारी होते. रिपाई, मनसे, राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे.डहाणू : सूर्या पाटबंधारे विभागांतर्गत आगवण ग्रामपंचायत हद्दीत चरी कोटबी येथे मागील काही महिन्यांपासून कालव्याला मोठे भगदाड पडून पाण्याचा अपव्यय होऊन शेतीला पाणी मिळत नव्हते. परिणामी आगवण परिसरात पाणीटंचाई भेडसावू लागली होती. त्याबाबत ग्रामपंचायतीने कालव्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. अखेरीस सरपंच दमयंती भुयाळ, उपसरपंच रूपजी कोम, ग्रामसेवक अरविंद संखे यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्यावतीने हा कालवा दुरुस्त केला. त्यामुळे आगवण गावातील आजूबाजूच्या पाड्यांची पिण्याच्या पाण्याची, तसेच सिंचनाच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. सूर्या पाटबंधारे विभागाचा कालवा दाभले, वरून चरी कोटबी आगवणकडे जातो. भगदाड पडून पाणी वाहून जात होते. त्यामुळे चरी कोटबी, आगवण , दाबले, चिंचले या पाड्यांना शेतीला पाणी मिळत नव्हते. त्याबाबत ग्रामपंचायतीने सतत सूर्या पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करु न दुरूस्ती करण्याची मागणी केली होती पण ती व्यर्थ ठरली.जवळजवळ १ लाख खर्च केले, जलवाहिनी दुरुस्त केली. आगवण ग्रामपंचायतीच्या मानपाडा, वाघाडी, शिशुपाडा, नवासाखरा, आगचण, चरी कोटबी या पाड्यांची पाण्याची समस्येवर त्यामुळे काही अंशी मात झाल्याने ग्रामस्थात आनंदाचे वातावरण पसरले आहे.