शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याच्या पाण्यासाठी लढा उभारण्याची सज्जता

By admin | Updated: March 17, 2017 05:49 IST

सूर्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पायदळी तुडविला जात असून त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनाचे मोठे क्षेत्र नापीक ठरण्याची व भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे

हितेन नाईक , पालघरसूर्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पायदळी तुडविला जात असून त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनाचे मोठे क्षेत्र नापीक ठरण्याची व भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागण्याची आपत्ती ओढवू शकते. हे लक्षात घेऊन सूर्याचे पाणी जिल्ह्यातच राखण्यासाठी आरपारचा लढा उभारण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. सूर्या प्रकल्प हा जिल्ह्यातील आदिवासी भागातील प्रकल्प असून पालघर, विक्रमगड, डहाणू या तीन आदिवासी तालुक्यातील सुमारे १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे व ६.७५ मेगा वॅट वीजनिर्मिती करणे हा मूळ उद्देश बाजूला सारून मतांच्या वजनाचा सोईस्कररित्या वापर करून इथले पाणी वसई-विरारला नेले. राजकीय दबावातून सरकारने मीरा-भार्इंदरला दिले. त्यानंतर उरलेले पाणी मुंबई उपप्रदेशासाठी वळविण्यात आले आहे. हे रोखण्यासाठी आयोजिलेल्या बैठकीला सूर्याच्या पाण्यासाठी प्रारंभा पासून लढा देणारे माजी आमदार नवनीत भाई शहा, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे, भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर पाटील, कुणबी सेनेचे जितू राऊळ, काँग्रेसचे केदार काळे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, माकपचे एडवर्ड वरठा, कष्टकरीचे ब्रायन लोबो, आदिवासी एकताचे दत्ता करबट, श्रमजीवीचे राजेश राऊत, शेतकरी संघर्षचे संतोष पावडे, राजेश अधिकारी होते. रिपाई, मनसे, राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे.डहाणू : सूर्या पाटबंधारे विभागांतर्गत आगवण ग्रामपंचायत हद्दीत चरी कोटबी येथे मागील काही महिन्यांपासून कालव्याला मोठे भगदाड पडून पाण्याचा अपव्यय होऊन शेतीला पाणी मिळत नव्हते. परिणामी आगवण परिसरात पाणीटंचाई भेडसावू लागली होती. त्याबाबत ग्रामपंचायतीने कालव्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. अखेरीस सरपंच दमयंती भुयाळ, उपसरपंच रूपजी कोम, ग्रामसेवक अरविंद संखे यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्यावतीने हा कालवा दुरुस्त केला. त्यामुळे आगवण गावातील आजूबाजूच्या पाड्यांची पिण्याच्या पाण्याची, तसेच सिंचनाच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. सूर्या पाटबंधारे विभागाचा कालवा दाभले, वरून चरी कोटबी आगवणकडे जातो. भगदाड पडून पाणी वाहून जात होते. त्यामुळे चरी कोटबी, आगवण , दाबले, चिंचले या पाड्यांना शेतीला पाणी मिळत नव्हते. त्याबाबत ग्रामपंचायतीने सतत सूर्या पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करु न दुरूस्ती करण्याची मागणी केली होती पण ती व्यर्थ ठरली.जवळजवळ १ लाख खर्च केले, जलवाहिनी दुरुस्त केली. आगवण ग्रामपंचायतीच्या मानपाडा, वाघाडी, शिशुपाडा, नवासाखरा, आगचण, चरी कोटबी या पाड्यांची पाण्याची समस्येवर त्यामुळे काही अंशी मात झाल्याने ग्रामस्थात आनंदाचे वातावरण पसरले आहे.