शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

प्रांजळपणा हा ललित लेखनाचा आत्मा असतो. तो ललित लेखकानं जपला पाहिजे : अशोक बागवे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 16:24 IST

डॉ. अनुपमा उजगरे यांच्या बिलोरी कवडसे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

ठळक मुद्देप्रांजळपणा हा ललित लेखनाचा आत्मा असतो - अशोक बागवे डॉ. अनुपमा उजगरे यांच्या बिलोरी कवडसे पुस्तकाचे प्रकाशन सुमारे 25 हून अधिक पुस्तकांची देवाणघेवाण

ठाणे : कविता ही सृजनाचा पहिला हुंकार असतो. कला हा आत्मा शुद्ध करणारा प्रांत आहे. कलारूपी वेगवेगळी झाडे असतील, पण मातीखाली सगळ्या झाडांची मुळं एकत्र येतात, तशा सर्व  कला अशा सांस्कृतिक मंचावर एकत्र येणं हे आशावादी चित्र आहे. शहराचं सांस्कृतिक पर्यावरण शुद्ध राहण्यासाठी पुस्तक आदान प्रदान महोत्सवासारखे उपयुक्त आहेत.ललित लेखनामध्ये आव आणता येत नाही. ललित लेखनाचा वेग हा पाण्यासारखा प्रवाही असतो. ललित लेखक हा आपल्याबरोबर वाचकाला त्याच्या दुनियेत घेऊन जात असतो. प्रांजळपणा हा ललित लेखनाचा आत्मा असतो. तो ललित लेखकानं जपला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी केले.  मराठी ग्रंथ संग्रहालय आणि व्यास क्रिएशन्स् आयोजित पुस्तक आदान प्रदान महोत्सवाच्या समारोप सत्रात ते बोलत होते.

यावेळी  ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे, डॉ. अनुपमा उजगरे, ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर,  ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अरूण म्हात्रे म्हणाले, साहित्याकडे घेऊन जाणारं पहिला अंग म्हणजे ललितलेख. मानसिक आंदोलनाचं तरल वर्णन ललित लेखात केलं जातं. कथा आणि कविता याचं अपत्य असलेल्या या ललितलेखांतील खरं मर्म डॉ. अनुपमा उजगरे यांच्या ललितलेखातून जाणवतं. आपली परंपरा ही ज्ञानोबा, तुकोबांची आहे. ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे, ती जपली गेली पाहिजे. ग्रंथ हेच मनावर निर्मळ उपचार करतात. जेव्हा मन निराश होते, दुर्दधर प्रसंग ओढवतात, तेव्हा शास्त्रीय संगीत आणि पुस्तके आधार देतात. ग्रंथ ही मनाची आणि समाजाची मशागत करतात. घरात जसं देवघराचं स्थान असतं, तसं पुस्तकांच्या कपाटालाही असलं पाहिजे. अशी घरंच समाज जीवंत असल्याचं लक्षण असतं. असा सुसंवाद ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर यांनी साधला.

कार्यक्रमाच्या विशेष सत्रात व्यास क्रिएशन्स् प्रकाशित आणि डॉ. अनुपमा उजगरे लिखित बिलोरी कवडसे या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शेवटच्या सत्राच्या सुरवातीला गायक आणि लेखक अनिरूद्ध जोशी यांची वृंदा दाभोळकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. तीन दिवस चाललेल्या पुस्तक आदान प्रदान महोत्सवात सुमारे 25 हजार हून अधिक पुस्तकांची देवाणघेवाण झाली असल्याचे व्यास क्रिएशन्स्चे संचालक नीलेश गायकवाड आणि मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी सांगितले.  महेंद्र कोंडे यांनी निवेदन केले. ठाणे शहराच्या सांस्कृतिक जीवनाची मूळं घट्ट ठेवण्याचं काम मराठी ग्रंथ संग्रहालय आणि व्यास क्रिएशन्स् या संस्थांनी केलं आहे. 

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्यMumbaiमुंबई