शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

प्रांजळपणा हा ललित लेखनाचा आत्मा असतो. तो ललित लेखकानं जपला पाहिजे : अशोक बागवे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 16:24 IST

डॉ. अनुपमा उजगरे यांच्या बिलोरी कवडसे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

ठळक मुद्देप्रांजळपणा हा ललित लेखनाचा आत्मा असतो - अशोक बागवे डॉ. अनुपमा उजगरे यांच्या बिलोरी कवडसे पुस्तकाचे प्रकाशन सुमारे 25 हून अधिक पुस्तकांची देवाणघेवाण

ठाणे : कविता ही सृजनाचा पहिला हुंकार असतो. कला हा आत्मा शुद्ध करणारा प्रांत आहे. कलारूपी वेगवेगळी झाडे असतील, पण मातीखाली सगळ्या झाडांची मुळं एकत्र येतात, तशा सर्व  कला अशा सांस्कृतिक मंचावर एकत्र येणं हे आशावादी चित्र आहे. शहराचं सांस्कृतिक पर्यावरण शुद्ध राहण्यासाठी पुस्तक आदान प्रदान महोत्सवासारखे उपयुक्त आहेत.ललित लेखनामध्ये आव आणता येत नाही. ललित लेखनाचा वेग हा पाण्यासारखा प्रवाही असतो. ललित लेखक हा आपल्याबरोबर वाचकाला त्याच्या दुनियेत घेऊन जात असतो. प्रांजळपणा हा ललित लेखनाचा आत्मा असतो. तो ललित लेखकानं जपला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी केले.  मराठी ग्रंथ संग्रहालय आणि व्यास क्रिएशन्स् आयोजित पुस्तक आदान प्रदान महोत्सवाच्या समारोप सत्रात ते बोलत होते.

यावेळी  ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे, डॉ. अनुपमा उजगरे, ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर,  ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अरूण म्हात्रे म्हणाले, साहित्याकडे घेऊन जाणारं पहिला अंग म्हणजे ललितलेख. मानसिक आंदोलनाचं तरल वर्णन ललित लेखात केलं जातं. कथा आणि कविता याचं अपत्य असलेल्या या ललितलेखांतील खरं मर्म डॉ. अनुपमा उजगरे यांच्या ललितलेखातून जाणवतं. आपली परंपरा ही ज्ञानोबा, तुकोबांची आहे. ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे, ती जपली गेली पाहिजे. ग्रंथ हेच मनावर निर्मळ उपचार करतात. जेव्हा मन निराश होते, दुर्दधर प्रसंग ओढवतात, तेव्हा शास्त्रीय संगीत आणि पुस्तके आधार देतात. ग्रंथ ही मनाची आणि समाजाची मशागत करतात. घरात जसं देवघराचं स्थान असतं, तसं पुस्तकांच्या कपाटालाही असलं पाहिजे. अशी घरंच समाज जीवंत असल्याचं लक्षण असतं. असा सुसंवाद ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर यांनी साधला.

कार्यक्रमाच्या विशेष सत्रात व्यास क्रिएशन्स् प्रकाशित आणि डॉ. अनुपमा उजगरे लिखित बिलोरी कवडसे या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शेवटच्या सत्राच्या सुरवातीला गायक आणि लेखक अनिरूद्ध जोशी यांची वृंदा दाभोळकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. तीन दिवस चाललेल्या पुस्तक आदान प्रदान महोत्सवात सुमारे 25 हजार हून अधिक पुस्तकांची देवाणघेवाण झाली असल्याचे व्यास क्रिएशन्स्चे संचालक नीलेश गायकवाड आणि मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी सांगितले.  महेंद्र कोंडे यांनी निवेदन केले. ठाणे शहराच्या सांस्कृतिक जीवनाची मूळं घट्ट ठेवण्याचं काम मराठी ग्रंथ संग्रहालय आणि व्यास क्रिएशन्स् या संस्थांनी केलं आहे. 

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्यMumbaiमुंबई