शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

मीरा-भाईंदरमध्ये सर्वत्र पूरस्थिती; घोडबंदर मार्ग व राष्ट्रीय महामार्गदेखील पाण्याखाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 19:27 IST

वन हद्दीलगत नैसर्गिक ओढ्यावर सरकारी जागेत या भागातील चाळी असून रहिवाश्याना २००५ च्या महाप्रलयचा अनुभव असल्याने रात्री कोणी झोपले नाही. 

मीरारोड - मीरा-भाईंदरमध्ये सोमवार रात्रीपासून मंगळवार दुपारपर्यंत कोसळणाऱ्या पावसाने मीरा-भाईंदर पाण्याखाली गेले. सर्वत्र पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन ठप्प झाले. मुंबई-अहमदाबाद महामार्ग व घोडबंदर मार्गदेखील पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद पडली. मुसळधार पावसामुळे काशिमीरा लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरांवरून पाण्याचे लोंढेच्या लोंढे वाहून येत होते. पाण्यासह मातीदेखील मोठ्या प्रमाणात वाहत आली. महाजनवाडीमध्ये तर पाण्यासह अजगर देखील वाहून आला होता. पाण्यातून जीव वाचवत तो एक दुकानाच्या भिंतीवर चढला. त्याला गोणीत अन्यत्र सोडण्यात आले. वन हद्दीलगत नैसर्गिक ओढ्यावर सरकारी जागेत या भागातील चाळी असून रहिवाश्याना २००५ च्या महाप्रलयचा अनुभव असल्याने रात्री कोणी झोपले नाही. 

काशिमीरा भागातून जाणार मुंबई अहमदाबाद महामार्ग व परिसर तर चेणे गावातून जाणारा घोडबंदर मार्ग व वरसावे नाका देखील पाण्याखाली गेला होता. लहान वाहने तर पाण्यात बंद पडल्याने लोकं अडकून पडली. काशिमीराचा ग्रीन व्हिलेज संकुल, मीरारोडचे सिल्वर सरिता, विनय नगर, कृषणस्थळ, अमिष पार्क, मुन्शी कंपाउंड, आरएनए ब्रॉडवे, विजय पार्क, प्लेझन्ट पार्क, शांती नगर, शीतल नगर, शांतिपार्क, कनकिया, नया नगर, हाटकेश, काशिगाव, सिल्वर पार्क आदी जवळपास सर्व मीरारोडच पाण्यात गेले.

तर भाईंदरच्या गोडदेव, महात्मा फुले मार्ग, तलाव मार्ग, बेकरी गल्ली, नाकोडा रुग्णालय गल्ली,  राई - मोरवा मार्ग, पाली, उत्तन, बाळाराम पाटील मार्ग, नर्मदा नगर जलमय झाले होते. शहरातील बहूतांश परिसरात कमरे एवढे पाणी साचले होते. लोकांच्या घरात व दुकानात सांडपाणी आणि पुराचे पाणी शिरल्याने घरातील फर्निचर, वस्तू आदींचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घरात चूल देखील पेटली नाही. लोकांच्या गाड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्याचेसुद्धा नुकसान झाले आहे. गाड्या पाण्याखाली जातील या भीतीने लोकांनी सोमवारी रात्रीच गाड्या रस्त्यांच्या मध्येच उभ्या केल्या होत्या. 

पालिकेने पाणी उपसासाठी ठेक्याने ठेवलेले पंप निरुपयोगी ठरले. दुपारी पावसाने जराशी विश्रांती घेतली तसेच भरती ओसरू लागली म्हणून शहरातील पाणी ओसरू लागले होते. पण सायंकाळी पुन्हा पावसाने जोर धरला. पालिकेची नाले व अंतर्गत गटार सफाई कुचकामी ठरलीच शिवाय खाड्या, नाले, ओढे यातील बेकायदेशीर भराव - बांधकामे, कांदळवन, सीआरझेड मधील भराव - बांधकामांमुळे पाण्याचा निचरा झाला नाही. पाणी साठवून ठेवणारे  होल्डिंग पॉईंट या भराव - बांधकामामुळे नष्ट केल्याचासुद्धा मोठा फटका बसला, असे जाणकारांनी सांगितले.