शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

मीरा-भाईंदरमध्ये सर्वत्र पूरस्थिती; घोडबंदर मार्ग व राष्ट्रीय महामार्गदेखील पाण्याखाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 19:27 IST

वन हद्दीलगत नैसर्गिक ओढ्यावर सरकारी जागेत या भागातील चाळी असून रहिवाश्याना २००५ च्या महाप्रलयचा अनुभव असल्याने रात्री कोणी झोपले नाही. 

मीरारोड - मीरा-भाईंदरमध्ये सोमवार रात्रीपासून मंगळवार दुपारपर्यंत कोसळणाऱ्या पावसाने मीरा-भाईंदर पाण्याखाली गेले. सर्वत्र पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन ठप्प झाले. मुंबई-अहमदाबाद महामार्ग व घोडबंदर मार्गदेखील पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद पडली. मुसळधार पावसामुळे काशिमीरा लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरांवरून पाण्याचे लोंढेच्या लोंढे वाहून येत होते. पाण्यासह मातीदेखील मोठ्या प्रमाणात वाहत आली. महाजनवाडीमध्ये तर पाण्यासह अजगर देखील वाहून आला होता. पाण्यातून जीव वाचवत तो एक दुकानाच्या भिंतीवर चढला. त्याला गोणीत अन्यत्र सोडण्यात आले. वन हद्दीलगत नैसर्गिक ओढ्यावर सरकारी जागेत या भागातील चाळी असून रहिवाश्याना २००५ च्या महाप्रलयचा अनुभव असल्याने रात्री कोणी झोपले नाही. 

काशिमीरा भागातून जाणार मुंबई अहमदाबाद महामार्ग व परिसर तर चेणे गावातून जाणारा घोडबंदर मार्ग व वरसावे नाका देखील पाण्याखाली गेला होता. लहान वाहने तर पाण्यात बंद पडल्याने लोकं अडकून पडली. काशिमीराचा ग्रीन व्हिलेज संकुल, मीरारोडचे सिल्वर सरिता, विनय नगर, कृषणस्थळ, अमिष पार्क, मुन्शी कंपाउंड, आरएनए ब्रॉडवे, विजय पार्क, प्लेझन्ट पार्क, शांती नगर, शीतल नगर, शांतिपार्क, कनकिया, नया नगर, हाटकेश, काशिगाव, सिल्वर पार्क आदी जवळपास सर्व मीरारोडच पाण्यात गेले.

तर भाईंदरच्या गोडदेव, महात्मा फुले मार्ग, तलाव मार्ग, बेकरी गल्ली, नाकोडा रुग्णालय गल्ली,  राई - मोरवा मार्ग, पाली, उत्तन, बाळाराम पाटील मार्ग, नर्मदा नगर जलमय झाले होते. शहरातील बहूतांश परिसरात कमरे एवढे पाणी साचले होते. लोकांच्या घरात व दुकानात सांडपाणी आणि पुराचे पाणी शिरल्याने घरातील फर्निचर, वस्तू आदींचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घरात चूल देखील पेटली नाही. लोकांच्या गाड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्याचेसुद्धा नुकसान झाले आहे. गाड्या पाण्याखाली जातील या भीतीने लोकांनी सोमवारी रात्रीच गाड्या रस्त्यांच्या मध्येच उभ्या केल्या होत्या. 

पालिकेने पाणी उपसासाठी ठेक्याने ठेवलेले पंप निरुपयोगी ठरले. दुपारी पावसाने जराशी विश्रांती घेतली तसेच भरती ओसरू लागली म्हणून शहरातील पाणी ओसरू लागले होते. पण सायंकाळी पुन्हा पावसाने जोर धरला. पालिकेची नाले व अंतर्गत गटार सफाई कुचकामी ठरलीच शिवाय खाड्या, नाले, ओढे यातील बेकायदेशीर भराव - बांधकामे, कांदळवन, सीआरझेड मधील भराव - बांधकामांमुळे पाण्याचा निचरा झाला नाही. पाणी साठवून ठेवणारे  होल्डिंग पॉईंट या भराव - बांधकामामुळे नष्ट केल्याचासुद्धा मोठा फटका बसला, असे जाणकारांनी सांगितले.