शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

मीरा-भाईंदरमध्ये सर्वत्र पूरस्थिती, ६९ जणांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड : मुसळधार लावलेल्या पावसाने मीरा-भाईंदरकरांची झोप उडवली. शहरात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून, घरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड : मुसळधार लावलेल्या पावसाने मीरा-भाईंदरकरांची झोप उडवली. शहरात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून, घरात पाणी शिरले आहे. तर दुर्घटना घडू नये म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अग्निशमन दलाने पाण्यात अडकलेल्या ६९ जणांची सुटका केली. महाजनवाडी येथे पाण्याच्या लोंढ्याने एका घराची पडझड, तर २० ते २२ दुचाकी वाहून गेल्या.

शनिवारच्या मध्यरात्रीपासून पावसाने ‘जाेर’धार लावल्यामुळे घरात गुडघाभर पाणी साचल्याने लोकांना रात्र जागून काढावी लागली. शहरातील महाजन वाडी, काशिमीरा, सिल्व्हर पार्क, विजय पार्क, चंद्रेश, शांतीनगर, शीतलनगर, कृष्ण स्थळ, विनय पार्क, सिल्व्हर सरिता, पटेल कम्पाउंड, खारीगाव, तलाव मार्ग, बेकरी गल्ली, विनायकनगर, नवघर मार्ग, गोडदेवसह अन्य अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रात्रीपासून सकाळपर्यंत अनेक ठिकाणी पाणी उपसा करणारे पालिकेचे पंप सुरू नव्हते. पाण्यात अडकलेले अनेक नागरिक पंप सुरू करा म्हणून प्रयत्न करत होते. घरातील धान्य, विजेची उपकरणे यांची नासधूस झाली आहे. शहरातील अनेक रस्ते तर पाण्याखाली गेले होते. इमारतीतील पाण्याच्या टाक्यांमध्ये दूषित पाणी शिरल्याने अनेकांना पाण्यावाचून राहावे लागले. औद्योगिक वसाहती व दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले.

महाजनवाडी येथे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधील डोंगरांवरून पाण्याचा प्रचंड लोंढा वाहत होता. पाण्याचा वेग इतका होता की, सुमारे २० ते २२ दुचाकी वाहून गेल्या. गावदेवी कम्पाउंड, गायत्री चाळीमधील रामू पाटील यांच्या घराची या लोंढ्याने पडझड झाली. लोकांचे सामान वाहून गेले. पाण्याच्या लोंढ्यात अडकलेल्या ५२ जणांची अग्निशमन दलाने सुटका केली. माशाचा पाडा मार्ग परिसरातही डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या पूरस्थिती बिकट बनली होती.

मुंबई-अहमदाबाद महामार्गही पाण्याखाली गेला होता. महामार्गावर एका मोटारकारमध्ये अडकलेल्या चौघांना अग्निशमन दलाने वाचविले. गायत्री इमारतीच्या तळ मजल्यातून पाण्यात अडकलेल्या पाच जणांची अग्निशमन दलाने सुटका केली. सिल्वर सरिता इमारतीमधून पाच जण तर येथील एका दूध टँकरमधून तीन जणांची सुटका केल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले. सकाळपर्यंत अनेक भागांतील पाणी उतरले नव्हते. लोक नगरसेवकांना शोधत शिमगा करत होते. काही नगरसेवक रात्रीपासून लोकांच्या संपर्कात होते. सकाळी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त दिलीप ढोले आदींनी शहरात फिरून आढावा घेतला.

बेकायदा बांधकामांमुळे घात

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगराळ भागातून पाण्याचे लोंढे येत असताना महाजन वाडी, माशाचा पाडा मार्ग परिसरात नैसर्गिक ओढ्यांमध्ये बेकायदा बांधकामे झाली आहेत. शहरातील खाड्या व नैसर्गिक नाल्यांवर भराव करून बांधकामे उभी राहिली आहेत. शहराची कवचकुंडले असलेल्या कांदळवन, पाणथळ, सीआरझेड भागात भराव आणि बांधकामे झाल्याने पाण्याचा निचरा होणारे मार्ग व वॉटरहोल्डिंग क्षेत्र नष्ट झाल्याने शहरात पूरस्थिती होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही बांधकामेच पूरस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.