शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मीरा-भाईंदरमध्ये सर्वत्र पूरस्थिती, ६९ जणांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड : मुसळधार लावलेल्या पावसाने मीरा-भाईंदरकरांची झोप उडवली. शहरात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून, घरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड : मुसळधार लावलेल्या पावसाने मीरा-भाईंदरकरांची झोप उडवली. शहरात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून, घरात पाणी शिरले आहे. तर दुर्घटना घडू नये म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अग्निशमन दलाने पाण्यात अडकलेल्या ६९ जणांची सुटका केली. महाजनवाडी येथे पाण्याच्या लोंढ्याने एका घराची पडझड, तर २० ते २२ दुचाकी वाहून गेल्या.

शनिवारच्या मध्यरात्रीपासून पावसाने ‘जाेर’धार लावल्यामुळे घरात गुडघाभर पाणी साचल्याने लोकांना रात्र जागून काढावी लागली. शहरातील महाजन वाडी, काशिमीरा, सिल्व्हर पार्क, विजय पार्क, चंद्रेश, शांतीनगर, शीतलनगर, कृष्ण स्थळ, विनय पार्क, सिल्व्हर सरिता, पटेल कम्पाउंड, खारीगाव, तलाव मार्ग, बेकरी गल्ली, विनायकनगर, नवघर मार्ग, गोडदेवसह अन्य अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रात्रीपासून सकाळपर्यंत अनेक ठिकाणी पाणी उपसा करणारे पालिकेचे पंप सुरू नव्हते. पाण्यात अडकलेले अनेक नागरिक पंप सुरू करा म्हणून प्रयत्न करत होते. घरातील धान्य, विजेची उपकरणे यांची नासधूस झाली आहे. शहरातील अनेक रस्ते तर पाण्याखाली गेले होते. इमारतीतील पाण्याच्या टाक्यांमध्ये दूषित पाणी शिरल्याने अनेकांना पाण्यावाचून राहावे लागले. औद्योगिक वसाहती व दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले.

महाजनवाडी येथे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधील डोंगरांवरून पाण्याचा प्रचंड लोंढा वाहत होता. पाण्याचा वेग इतका होता की, सुमारे २० ते २२ दुचाकी वाहून गेल्या. गावदेवी कम्पाउंड, गायत्री चाळीमधील रामू पाटील यांच्या घराची या लोंढ्याने पडझड झाली. लोकांचे सामान वाहून गेले. पाण्याच्या लोंढ्यात अडकलेल्या ५२ जणांची अग्निशमन दलाने सुटका केली. माशाचा पाडा मार्ग परिसरातही डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या पूरस्थिती बिकट बनली होती.

मुंबई-अहमदाबाद महामार्गही पाण्याखाली गेला होता. महामार्गावर एका मोटारकारमध्ये अडकलेल्या चौघांना अग्निशमन दलाने वाचविले. गायत्री इमारतीच्या तळ मजल्यातून पाण्यात अडकलेल्या पाच जणांची अग्निशमन दलाने सुटका केली. सिल्वर सरिता इमारतीमधून पाच जण तर येथील एका दूध टँकरमधून तीन जणांची सुटका केल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले. सकाळपर्यंत अनेक भागांतील पाणी उतरले नव्हते. लोक नगरसेवकांना शोधत शिमगा करत होते. काही नगरसेवक रात्रीपासून लोकांच्या संपर्कात होते. सकाळी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त दिलीप ढोले आदींनी शहरात फिरून आढावा घेतला.

बेकायदा बांधकामांमुळे घात

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगराळ भागातून पाण्याचे लोंढे येत असताना महाजन वाडी, माशाचा पाडा मार्ग परिसरात नैसर्गिक ओढ्यांमध्ये बेकायदा बांधकामे झाली आहेत. शहरातील खाड्या व नैसर्गिक नाल्यांवर भराव करून बांधकामे उभी राहिली आहेत. शहराची कवचकुंडले असलेल्या कांदळवन, पाणथळ, सीआरझेड भागात भराव आणि बांधकामे झाल्याने पाण्याचा निचरा होणारे मार्ग व वॉटरहोल्डिंग क्षेत्र नष्ट झाल्याने शहरात पूरस्थिती होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही बांधकामेच पूरस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.