शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

ठाण्यातील अभिनय कट्टयाची संध्याकाळ रंगली डूबाईटी या एकांकिकेच्या प्रयोगाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 16:54 IST

विविध कलाकृती सादर करणाºया अभिनय कट्ट्यावर या रविवारी एक वेगळा प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

ठळक मुद्देअभिनय कट्ट्याची संध्याकाळ ही ‘डूबाईटी’ या एकांकिकेच्या प्रयोगाने रंगलीसलग २० एकपात्री प्रयोग सुद्धा लक्षावधी ठरलेअभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला

ठाणे: ३५५ क्र मांकाच्या अभिनय कट्ट्याची संध्याकाळ ही ‘डूबाईटी’ या एकांकिकेच्या प्रयोगाने रंगली. यावेळी विविध कलाकारांनी सादर केलेले सलग २० एकपात्री प्रयोग सुद्धा लक्षावधी ठरले.प्रेक्षक प्रतिनिधी श्रीपाद नेमाडे आणि स्वाती नेमाडे यांच्या हस्ते दीप्रज्वलन पार पडले. निवेदिका आरती ताथवडकर यांनी सूत्रसंचालनाची सूत्रे हाती घेत कट्ट्याच्या कार्यक्र मास आरंभ केला. सई कदम, सचिन हिमुकले, रोहित मुणगेकर, लवेश दळवी, यांनी अनुक्र मे आमच्या ‘स्वयंपाकीन काकू’, ‘मी वासुसेव’, ‘अश्विन जागा होतो तेंव्हा’, ‘गुरु पौर्णिमा’ या एकपात्री सादर केल्या तर रुचिता आठवले हिने ‘किती सुंदर आहे हे जग’, प्रतिभा घाडगे यांनी ‘खरच मोबाईलची गरज आहे का?’, रोशनी उंबरसाडे हिने ‘मी.. मी आहे’ या एकपात्रीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. साक्षी महाडिक, माधुरी कोळी , राजेंद्र एडवनकर, आयुष हांडे, नरेंद्र सावंत, अनिकेत शिंदे, स्वप्नजा जाधव, शनी जाधव, विजया साळुंखे, नूतन लंके दत्तराज सकपाळ या कलाकारांनी आपापल्या एकपात्रीद्वारे आपल्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवली. हितेश नेमाडे आणि परेश दळवी लिखित ‘डूबाईटी’या एकांकीकेमध्ये शिल्पा लाडवंते आणि ( शिल्पा ) परेश दळवी (कार्तिक) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. एकांकिकेमधील कार्तिक आणि शिल्पा हे प्रेमी युगल संशयामुळे विभक्त होतात. पेशाने सेल्सगर्ल असलेली शिल्पा आपल्या व्यवसायचे निमित्त काढून मुद्दाम कार्तिकला भेटायला येते आणि दोघांची खरी शाब्दीक जुगलबंदी सुरू होते. यावेळी विभक्त झालेले असताना सुद्धा दोघांना एकमेकांबद्दलचे प्रेम निदर्शनास येण्यास वेळ लागत नाही आणि कथानकाच्या सरतेशेवटी त्यांच्यामधील डुबाईटी म्हणजे संशय संपून त्यांच्यातील प्रेमाचे नाते पुन्हा सुरळीत होते. आजच्या टेक्नोसाव्ही जगात नातेसंबंधात गैरसमज संशय यामुळे आलेला दुरावा हा फेसबुक व व्हॉटसअ‍ॅपचे स्टेटस बदलून नाही दूर होणार त्यासाठी दोन व्यक्तींमधील संवाद महत्वाचा आहे आणि त्यातूनच नाती जपली जाऊ शकतात याचे सार या एकांकिकेत मांडले गेले. दिग्दर्शक हितेश नेमाडे यांनी सदर एकांकिकेत कार्तिक आणि शिल्पातील दुरावलेल्या प्रेमाचा प्रवास वादाकडून सुसंवादाकडे होताना खूपच रंजकरित्या मांडला. सदर एकांकिकेची प्रकाशयोजना स्वप्नील माने आणि संगीत संयोजन हितेश नेमाडे यांनी सांभाळले. एकांकिके नंतर दिग्दर्शक व कलाकारांनी एकांकिके दरम्यानचे किस्से आणिअनुभव सांगितले. त्यानंतर अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला. पुढच्या रविवारी अभिनय कट्ट्याचे कलाकार एक विशेष सादरीकरण घेऊन येणार आहेत तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन किरण नाकती यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकentertainmentकरमणूक