शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

प.रे. वेळापत्रक बदलाने झाली परवड

By admin | Updated: October 9, 2015 23:30 IST

पश्चिम रेल्वे प्रशासनाने १ आॅक्टोबरपासून गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केल्याने डहाणू तसेच तलासरी तालुक्यांतील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. नवीन वेळापत्रक रद्द करण्याची

बोर्डी : पश्चिम रेल्वे प्रशासनाने १ आॅक्टोबरपासून गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केल्याने डहाणू तसेच तलासरी तालुक्यांतील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. नवीन वेळापत्रक रद्द करण्याची मागणी प्रवाशांनी केली असून सह्यांची मोहीम हाती घेतली आहे.नवीन वेळापत्रकानुसार अप आणि डाऊन गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. त्याचा फटका डहाणू, तलासरी तालुक्यांसह गुजरातमधील प्रवाशांना बसत आहे. येथील घोलवड, बोर्डी रोड, उंबरगाव रेल्वे स्थानकांतून मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यापैकी पालघर तसेच बोईसर औद्योगिक वसाहतीत आदिवासी मजूर मोठ्या संख्येने कामाला जातात. बदललेल्या वेळापत्रकामुळे परतीचा प्रवास असुविधेचा झाला आहे. विरारहून सुटणारी सुरत शटल जुन्या वेळापत्रकानुसार पालघर रेल्वे स्थानकात ५.५८ तर बोईसर स्थानकात ६.१३ वाजता येत होती. नवीन वेळापत्रकामुळे १३ ते १५ मिनिटे अगोदर स्थानक गाठते. त्यामुळे कार्यालय अथवा कारखान्यात जनरल ड्युटी करणाऱ्यांची गाडी चुकते. डहाणू रोडनंतर लोकल सेवा नसल्याने अनेक प्रवाशांना दोन तास गाड्यांची वाट पाहावी लागते. या दगदगीचा परिणाम गाड्यांशी कनेक्ट रिक्षाचालकांनाही बसत आहे. त्यामुळे नवीन वेळापत्रक रद्द करण्याची मागणी वाढली आहे. (वार्ताहर)पश्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकाचा परिणाम प्रवाशांच्या जीवनशैलीत जाणवत असून शारीरिक, मानसिक खच्चीकरण होत आहे. गाड्यांच्या वेळा पूर्ववत झाल्या पाहिजेत.- नरेंद्र भागवत, रेल्वे प्रवासी