शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

प.रे. वेळापत्रक बदलाने झाली परवड

By admin | Updated: October 9, 2015 23:30 IST

पश्चिम रेल्वे प्रशासनाने १ आॅक्टोबरपासून गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केल्याने डहाणू तसेच तलासरी तालुक्यांतील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. नवीन वेळापत्रक रद्द करण्याची

बोर्डी : पश्चिम रेल्वे प्रशासनाने १ आॅक्टोबरपासून गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केल्याने डहाणू तसेच तलासरी तालुक्यांतील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. नवीन वेळापत्रक रद्द करण्याची मागणी प्रवाशांनी केली असून सह्यांची मोहीम हाती घेतली आहे.नवीन वेळापत्रकानुसार अप आणि डाऊन गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. त्याचा फटका डहाणू, तलासरी तालुक्यांसह गुजरातमधील प्रवाशांना बसत आहे. येथील घोलवड, बोर्डी रोड, उंबरगाव रेल्वे स्थानकांतून मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यापैकी पालघर तसेच बोईसर औद्योगिक वसाहतीत आदिवासी मजूर मोठ्या संख्येने कामाला जातात. बदललेल्या वेळापत्रकामुळे परतीचा प्रवास असुविधेचा झाला आहे. विरारहून सुटणारी सुरत शटल जुन्या वेळापत्रकानुसार पालघर रेल्वे स्थानकात ५.५८ तर बोईसर स्थानकात ६.१३ वाजता येत होती. नवीन वेळापत्रकामुळे १३ ते १५ मिनिटे अगोदर स्थानक गाठते. त्यामुळे कार्यालय अथवा कारखान्यात जनरल ड्युटी करणाऱ्यांची गाडी चुकते. डहाणू रोडनंतर लोकल सेवा नसल्याने अनेक प्रवाशांना दोन तास गाड्यांची वाट पाहावी लागते. या दगदगीचा परिणाम गाड्यांशी कनेक्ट रिक्षाचालकांनाही बसत आहे. त्यामुळे नवीन वेळापत्रक रद्द करण्याची मागणी वाढली आहे. (वार्ताहर)पश्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकाचा परिणाम प्रवाशांच्या जीवनशैलीत जाणवत असून शारीरिक, मानसिक खच्चीकरण होत आहे. गाड्यांच्या वेळा पूर्ववत झाल्या पाहिजेत.- नरेंद्र भागवत, रेल्वे प्रवासी