शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

भातसा प्रकल्पाचा वीजपुरवठा केला खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST

शेणवा : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसंपदा विभागाच्या भातसा धरण व्यवस्थापन कार्यालयावर बारा लाखांच्या वीजबिल थकितप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी ...

शेणवा : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसंपदा विभागाच्या भातसा धरण व्यवस्थापन कार्यालयावर बारा लाखांच्या वीजबिल थकितप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी वीजपुरवठा खंडित केला. यामुळे जलसंपदा विभागाच्या कार्यालयासह भातसा वसाहतीतील रहिवाशांना तीन दिवस अंधारात राहावे लागण्याची वेळ आली. दरम्यान, शनिवारी वीजबिल भरणा केल्याने खंडित पुरवठा सुरळीत करण्यात आला.

मुंबईला रोज दोन हजार एमएलडी पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरण कार्यालयावर महावितरणच्या अभियंत्यांनी वीजबिल थकित प्रकरणी वीज खंडित करण्याची कारवाई केली. जलसंपदा कार्यालयाने दोन महिन्यांचे विजेचे तब्बल बारा लाखांचे थकित बिल वेळेवर न भरल्याने अखेर गुरुवारी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीज पुरवठा खंडित झाल्याने विजेअभावी भातसा धरणातून मुंबई व ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा ठप्प झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. वीजपुरवठा खंडित झाल्याने भातसा धरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणाही बंद पडल्याने धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

सरकारी कार्यालयावर शहापूर तालुक्यात प्रथमच वीज खंडित करण्याच्या कारवाईने खळबळ उडाली असून, भातसा धरणाच्या खंडित वीज कारवाईप्रकरणी भातसा धरण कार्यालयास महावितरणच्या कार्यालयातून कोणत्याही लेखी पत्राद्वारे लेखी सूचना न देता कारवाई झाल्याचा आरोप भातसा प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी व रहिवाशांनी केला आहे.

वीजबिल थकितप्रकरणी भातसा प्रकल्प कार्यालयास मेल व भ्रमणध्वनीद्वारे मेसेजने सूचित करण्यात येऊनही बिल भरणा ने केल्याने अखेर वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागली.

- अविनाश कटकवार, उपअभियंता, महावितरण