शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

भातसा प्रकल्पाचा वीजपुरवठा केला खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST

शेणवा : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसंपदा विभागाच्या भातसा धरण व्यवस्थापन कार्यालयावर बारा लाखांच्या वीजबिल थकितप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी ...

शेणवा : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसंपदा विभागाच्या भातसा धरण व्यवस्थापन कार्यालयावर बारा लाखांच्या वीजबिल थकितप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी वीजपुरवठा खंडित केला. यामुळे जलसंपदा विभागाच्या कार्यालयासह भातसा वसाहतीतील रहिवाशांना तीन दिवस अंधारात राहावे लागण्याची वेळ आली. दरम्यान, शनिवारी वीजबिल भरणा केल्याने खंडित पुरवठा सुरळीत करण्यात आला.

मुंबईला रोज दोन हजार एमएलडी पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरण कार्यालयावर महावितरणच्या अभियंत्यांनी वीजबिल थकित प्रकरणी वीज खंडित करण्याची कारवाई केली. जलसंपदा कार्यालयाने दोन महिन्यांचे विजेचे तब्बल बारा लाखांचे थकित बिल वेळेवर न भरल्याने अखेर गुरुवारी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीज पुरवठा खंडित झाल्याने विजेअभावी भातसा धरणातून मुंबई व ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा ठप्प झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. वीजपुरवठा खंडित झाल्याने भातसा धरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणाही बंद पडल्याने धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

सरकारी कार्यालयावर शहापूर तालुक्यात प्रथमच वीज खंडित करण्याच्या कारवाईने खळबळ उडाली असून, भातसा धरणाच्या खंडित वीज कारवाईप्रकरणी भातसा धरण कार्यालयास महावितरणच्या कार्यालयातून कोणत्याही लेखी पत्राद्वारे लेखी सूचना न देता कारवाई झाल्याचा आरोप भातसा प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी व रहिवाशांनी केला आहे.

वीजबिल थकितप्रकरणी भातसा प्रकल्प कार्यालयास मेल व भ्रमणध्वनीद्वारे मेसेजने सूचित करण्यात येऊनही बिल भरणा ने केल्याने अखेर वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागली.

- अविनाश कटकवार, उपअभियंता, महावितरण