शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

साहित्यामध्ये युवाशक्तीला दिशा देण्याची ताकद- एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:54 IST

राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलनाचा समारोप, पुढील संमेलन दिल्लीला ?

अंबरनाथ : अंबरनाथ शहराला शिवमंदिरामुळे ऐतिहासिक तर कारखानदारीमुळे औद्योगिक वारसा मिळालेला आहे. या सोबतच आता शहराला साहित्यिक वारसा देखील लाभला आहे. साहित्यामध्ये युवाशक्तीला दिशा देण्याची ताकद आहे. त्यामुळे साहित्याचा वारसा आता युवकांच्या माध्यमातून जपण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.८ आणि ९ डिसेंबर या दोन दिवसांत राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलनाचे अंबरनाथ शहरात आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस रंगलेल्या या महोत्सवाची सांगता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी शिंदे यांनी युवाशक्तीकडे साहित्याची धुरा देण्याची गरज व्यक्त केले. तरुण साहित्यिक घडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक जिल्ह्यात तरुणांना संघटीत करुन युवाशक्ती साहित्य संमेलन भरवल्यास तरुणांमधील साहित्यिकांना संधी मिळेल. अनेक तरुण साहित्याकडे ओढले जातील. तरुणांमध्ये लिखाणाचे कौशल्य आहे. त्याला वाव देण्यासाठी अशा साहित्य संमेलनांची गरज आहे.अंबरनाथला साहित्याची गोडी आहे. त्यामुळेच येथे होणाऱ्या शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तीन वर्षांपासून सुरू झालेला हा फेस्टिव्हल राष्ट्रीय स्तरावरील झाला आहे. त्यामुळे कला आणि साहित्य क्षेत्रात अंबरनाथचे नाव उंचावल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ‘वाचाल तर वाचाल’ असे म्हणतात ते काही खोटे नाही. पुढील संमेलन दिल्लीला घेण्याची मागणी होत आहे. त्यासाठी जी काही मदत लागेल, ती मी नक्की करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील चौधरी यांनीही अंबरनाथमध्ये पुस्तकांचे शहर ही संकल्पना राबवली जात असल्याची माहिती दिली. लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार असून देशातील पहिले साहित्य उद्यान अंबरनाथमध्ये साकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोमसापने संमेलनासाठी अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेतली नाही. त्याची प्रेरणा मराठी साहित्य परिषदेनेही घेतली. त्यामुळे कोमसाप खूप आधीपासून पुरोगामी विचारसरणीचे असल्याचे कवी अरूण म्हात्रे यांनी समारोपाच्या वेळी सांगितले. दोन दिवस रंगलेल्या संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन, मुलाखत, अनवट गप्पा, वाद्यसंगीत व भावगीत, मुक्त चर्चा, एकपात्री अभिनय असे कार्यक्रम आयोजित केले होते.या संमेलनाच्या निमित्ताने कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, प्रसिध्द लेखक अरविंद जगताप, कवी डॉ. महेश केळुसकर, अरुण म्हात्रे, किरण येले असे दिग्गज साहित्यिक अंबरनाथमध्ये आले. त्यांच्या साहित्यांचा आस्वाद रसिकांनी घेतला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेambernathअंबरनाथ