शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महापालिकेत सत्तांतर; काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटले, महापौरपदी कोणार्कच्या प्रतिभा पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 01:42 IST

भिवंडी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरु वारी दुपारी १२ वाजता निवडणूक घेण्यात आली.

भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्याने भाजप-कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील विजयी झाल्या. कोणार्क पुरस्कृत काँग्रेसचे नगरसेवक इम्रान वली मोहम्मद खान हे नवे उपमहापौर असून, सत्ताधारी काँग्रेस आणि शिवसेनेला यामुळे जोरदार हादरा बसला आहे.भिवंडी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरु वारी दुपारी १२ वाजता निवडणूक घेण्यात आली. महापौरपदासाठी काँग्रेसतर्फे रिषिका राका आणि भाजप-कोणार्क विकास आघाडीतर्फे प्रतिभा पाटील रिंगणात होत्या. पीठासीन अधिकारी जोंधळे यांनी हात वर करून मतदान करण्याच्या सूचना केल्या. या मतदान प्रक्रि येत कोणार्क विकास आघाडीसह आरपीआय (एकतावादी), समाजवादी पक्ष आणि भाजपबरोबरच काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी कोणार्कच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना मतदान केल्याने त्या ४९ मतांनी विजयी झाल्या. शिवसेना आणि काँग्रेस युतीच्या उमेदवार रिषिका राका यांना ४१ मते मिळून आठ मतांनी त्यांचापराभव झाला. विशेष म्हणजे,भिवंडी महापालिकेत काँग्रेसचेएकूण ४७ नगरसेवक आहेत. त्यापैकी १८ नगरसेवकांनी कोणार्क विकास आघाडीशी घरोबा केल्याने काँग्रेसचा दारु ण पराभव झाला. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेला पायउतार व्हावे लागले आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही भाजप आणि कोणार्क विकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार काँग्रेसचे नगरसेवक इम्रान खान यांना ४९ मते मिळाली. त्यांनी सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी यांचा पराभव केला. चौधरी यांना ४१ मते मिळाली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाला लाथाडून भाजप-कोणार्क विकास आघाडीला उघडपणे साथ दिली. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे.चार सदस्यीय कोणार्कच्या हाती पालिकेची सत्ताभिवंडी महापालिकेत ९० नगरसेवक असून, त्यामध्ये काँग्रेसचे ४७, शिवसेना १२, भाजप २०, कोणार्क विकास आघाडी ४, समाजवादी पार्टी २, आरपीआय (एकतावादी) ४ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसकडे बहुमत असूनही नगरसेवक फुटण्याची शक्यता लक्षात घेता २०१७ मध्ये काँग्रेसने शिवसेनेच्या १२ नगरसेवकांना सोबत घेऊन सेनेला सत्तेत वाटा दिला होता. त्यामुळे भाजप व कोणार्क विकास आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. याची सल भाजप-कोणार्क विकास आघाडीला होती. त्यामुळे आजच्या निवडणुकीत भाजप-कोणार्क विकास आघाडीने काँग्रेसच्या १८ नगरसेवकांना फोडून महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी