शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

मार्चमध्येच आदिवासी महिलांच्या डोक्यावर हंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 00:54 IST

मोखाडा तालुक्यात भीषण पाणीटंचाई

रवींद्र साळवे

मोखाडा :  पालघर जिल्ह्यात पाणीटंचाईची पहिली ठिणगी डिसेंबर महिन्यात मोखाड्यातील दापटी-१ व २ या गावांतून पडली आहे. यासह अन्य  १८  गावपाड्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यामधील  १० गावपाड्यांचा प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाने मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा दापटीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर मंजुरीसाठी पडून आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात येथील आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर वणवण पायपीट करावी लागत आहे. 

मोखाडा तालुक्यात प्रतिवर्षी फेब्रुवारीपासून पाणीटंचाईला सुरुवात होते. १००  हून अधिक गावपाडे पाणीटंचाईने होरपळतात. मात्र, यंदा दोन महिने अगोदरच तालुक्यातील दापटी-१ व  दापटी-२ या दोन गावांमध्ये डिसेंबर २०२० मध्येच पाणीटंचाई जाणवू लागली. यामुळे येथील आदिवासींनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. सद्य:स्थितीत मोखाड्यातील  १८  गावपाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईग्रस्त गावपाड्यांची पाहणी केल्यानंतर मोखाडा तहसीलदार कार्यालयाने दापटी-१ व दापटी-२ या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव  १७  व  २०  डिसेंबर  २०२० ला जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. 

शासनाच्या धोरणानुसार टंचाईग्रस्त गावपाड्यांनी, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करताच त्याची  २४  तासांत तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी करून  ४८  तासांत टँकरद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र, दापटी गावांचे प्रस्ताव गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात साहेबांच्या टेबलावर पडून आहेत.

तालुक्यातील १८ गावपाड्यांत टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने सध्या १८   गावपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यांनीही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरीसाठी  पाठविल्याची माहिती तहसीलदार वैभव पवार आणि गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे यांनी दिली आहे.  मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एकाही प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्याने मोखाड्यातील आदिवासी महिला रणरणत्या उन्हात हंडाभर  पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर पायपीट करीत आहेत. 

मोखाडा पंचायत समितीच्या सभापती सारिका निकम  यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन, टंचाईग्रस्त गावपाड्यांना मंजुरी देऊन, टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. मात्र, तीन महिने होऊनही दापटी गावांचे प्रस्ताव तेथेच पडून आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे येथील आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे गतसालाप्रमाणे टंचाईग्रस्त गावपाड्यांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थानिक तहसीलदारांना द्यावेत, अशी मागणी आपण पालकमंत्र्यांकडे केली आहे.- प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्य, पालघर.

मोखाड्यातील टंचाईग्रस्त गावपाडेदापटी-१, दापटी-२, धामणी, कुंडाचापाडा, स्वामीनगर, धनगरेवाडी, डोंगरवाडी, हेदवाडी (पाथर्डी), ठवळपाडा, पिंपळपाडा (खोच).

टॅग्स :Vasai Virarवसई विरार