शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मार्चमध्येच आदिवासी महिलांच्या डोक्यावर हंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 00:54 IST

मोखाडा तालुक्यात भीषण पाणीटंचाई

रवींद्र साळवे

मोखाडा :  पालघर जिल्ह्यात पाणीटंचाईची पहिली ठिणगी डिसेंबर महिन्यात मोखाड्यातील दापटी-१ व २ या गावांतून पडली आहे. यासह अन्य  १८  गावपाड्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यामधील  १० गावपाड्यांचा प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाने मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा दापटीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर मंजुरीसाठी पडून आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात येथील आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर वणवण पायपीट करावी लागत आहे. 

मोखाडा तालुक्यात प्रतिवर्षी फेब्रुवारीपासून पाणीटंचाईला सुरुवात होते. १००  हून अधिक गावपाडे पाणीटंचाईने होरपळतात. मात्र, यंदा दोन महिने अगोदरच तालुक्यातील दापटी-१ व  दापटी-२ या दोन गावांमध्ये डिसेंबर २०२० मध्येच पाणीटंचाई जाणवू लागली. यामुळे येथील आदिवासींनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. सद्य:स्थितीत मोखाड्यातील  १८  गावपाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईग्रस्त गावपाड्यांची पाहणी केल्यानंतर मोखाडा तहसीलदार कार्यालयाने दापटी-१ व दापटी-२ या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव  १७  व  २०  डिसेंबर  २०२० ला जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. 

शासनाच्या धोरणानुसार टंचाईग्रस्त गावपाड्यांनी, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करताच त्याची  २४  तासांत तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी करून  ४८  तासांत टँकरद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र, दापटी गावांचे प्रस्ताव गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात साहेबांच्या टेबलावर पडून आहेत.

तालुक्यातील १८ गावपाड्यांत टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने सध्या १८   गावपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यांनीही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरीसाठी  पाठविल्याची माहिती तहसीलदार वैभव पवार आणि गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे यांनी दिली आहे.  मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एकाही प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्याने मोखाड्यातील आदिवासी महिला रणरणत्या उन्हात हंडाभर  पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर पायपीट करीत आहेत. 

मोखाडा पंचायत समितीच्या सभापती सारिका निकम  यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन, टंचाईग्रस्त गावपाड्यांना मंजुरी देऊन, टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. मात्र, तीन महिने होऊनही दापटी गावांचे प्रस्ताव तेथेच पडून आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे येथील आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे गतसालाप्रमाणे टंचाईग्रस्त गावपाड्यांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थानिक तहसीलदारांना द्यावेत, अशी मागणी आपण पालकमंत्र्यांकडे केली आहे.- प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्य, पालघर.

मोखाड्यातील टंचाईग्रस्त गावपाडेदापटी-१, दापटी-२, धामणी, कुंडाचापाडा, स्वामीनगर, धनगरेवाडी, डोंगरवाडी, हेदवाडी (पाथर्डी), ठवळपाडा, पिंपळपाडा (खोच).

टॅग्स :Vasai Virarवसई विरार