शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

केडीएमसीतील १३ नगरसेवकांचे पद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:07 IST

मुदत संपण्यापूर्वीच झाले बाद : १८ गावे वगळल्याचा बसला फटका

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने एकीकडे घेतला असताना या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद अखेर रद्द झाले आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने यासंदर्भात सादर केलेल्या अहवालावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शिक्कामोर्तब केले असून, सदस्यत्व रद्द केल्याचे परिपत्रक संबंधित नगरसेवकांना पाठवले आहे.२७ गावांमधील घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळिवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळेगाव ही १८ गावे सरकारने केडीएमसीतून वगळली आहेत. तर, उर्वरित आजदे, सागाव, नांदिवली पंचानंद, घारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर, देसलेपाडा या नऊ गावांसह केडीएमसीच्या हद्दीची अधिसूचना सरकारने जाहीर केली आहे.आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी केडीएमसीची निवडणूक कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडणार असल्याचे संकेत मिळत असले, तरी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केडीएमसीच्या निवडणूक विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. गावे वगळण्याच्या झालेल्या बदलानंतर महापालिकेत ११८ प्रभाग राहतील, यावरही आयोगाने शिक्कामोर्तब करुन प्रभागरचनेचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. १२ जुलै २००२ ला २७ गावे वगळण्यात आली होती. तेव्हादेखील नगरसेवकपद रद्द करण्याची कार्यवाही झाली होती. हीच प्रक्रिया पुन्हा राबविली गेली आहे. गावे वगळल्याचा फटका मोरेश्वर भोईर, रमाकांत पाटील, सोनी अहिरे, ऊर्मिला गोसावी, कुणाल पाटील, प्रमिला पाटील, प्रभाकर जाधव, दमयंती वझे, जालिंदर पाटील, इंदिरा तरे, विमल भोईर, शैलजा भोईर, सुनीता खंडागळे या १३ नगरसेवकांना बसला आहे.नगरसेवकांच्या भूमिकेकडे लागले लक्ष४२७ गावांच्या पालिकेसाठी लढणाºया सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने १८ गावे वगळण्यास विरोध करून, सर्व गावे वगळण्याची मागणी केली आहे.४२७ गावांच्या नगर परिषदेबाबत पुनर्विचार करा, असे पत्र मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावे वगळण्याची प्रक्रिया स्थगित करण्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल आहे. पद रद्द करण्याच्या कार्यवाहीवर नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे.नगरसेवकपद रद्द केल्यासंदर्भात पत्र मिळाले आहे. आयुक्तांनी हा चुकीचा निर्णय घेतला. आम्ही लोकनियुक्त सदस्य असून आम्हाला जे अधिकार बहाल करण्यात आले आहेत, ते खंडित करण्याचा हा प्रकार आहे. आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.- मोरेश्वर भोईर,नगरसेवक, केडीएमसी