शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीतील १३ नगरसेवकांचे पद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:07 IST

मुदत संपण्यापूर्वीच झाले बाद : १८ गावे वगळल्याचा बसला फटका

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने एकीकडे घेतला असताना या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद अखेर रद्द झाले आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने यासंदर्भात सादर केलेल्या अहवालावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शिक्कामोर्तब केले असून, सदस्यत्व रद्द केल्याचे परिपत्रक संबंधित नगरसेवकांना पाठवले आहे.२७ गावांमधील घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळिवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळेगाव ही १८ गावे सरकारने केडीएमसीतून वगळली आहेत. तर, उर्वरित आजदे, सागाव, नांदिवली पंचानंद, घारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर, देसलेपाडा या नऊ गावांसह केडीएमसीच्या हद्दीची अधिसूचना सरकारने जाहीर केली आहे.आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी केडीएमसीची निवडणूक कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडणार असल्याचे संकेत मिळत असले, तरी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केडीएमसीच्या निवडणूक विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. गावे वगळण्याच्या झालेल्या बदलानंतर महापालिकेत ११८ प्रभाग राहतील, यावरही आयोगाने शिक्कामोर्तब करुन प्रभागरचनेचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. १२ जुलै २००२ ला २७ गावे वगळण्यात आली होती. तेव्हादेखील नगरसेवकपद रद्द करण्याची कार्यवाही झाली होती. हीच प्रक्रिया पुन्हा राबविली गेली आहे. गावे वगळल्याचा फटका मोरेश्वर भोईर, रमाकांत पाटील, सोनी अहिरे, ऊर्मिला गोसावी, कुणाल पाटील, प्रमिला पाटील, प्रभाकर जाधव, दमयंती वझे, जालिंदर पाटील, इंदिरा तरे, विमल भोईर, शैलजा भोईर, सुनीता खंडागळे या १३ नगरसेवकांना बसला आहे.नगरसेवकांच्या भूमिकेकडे लागले लक्ष४२७ गावांच्या पालिकेसाठी लढणाºया सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने १८ गावे वगळण्यास विरोध करून, सर्व गावे वगळण्याची मागणी केली आहे.४२७ गावांच्या नगर परिषदेबाबत पुनर्विचार करा, असे पत्र मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावे वगळण्याची प्रक्रिया स्थगित करण्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल आहे. पद रद्द करण्याच्या कार्यवाहीवर नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे.नगरसेवकपद रद्द केल्यासंदर्भात पत्र मिळाले आहे. आयुक्तांनी हा चुकीचा निर्णय घेतला. आम्ही लोकनियुक्त सदस्य असून आम्हाला जे अधिकार बहाल करण्यात आले आहेत, ते खंडित करण्याचा हा प्रकार आहे. आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.- मोरेश्वर भोईर,नगरसेवक, केडीएमसी