शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

उल्हासनगरात रिपाइंमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:40 IST

अंतर्गत वाद; उपमहापौर भगवान भालेराव यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

- सदानंद नाईकउल्हासनगर :  देशासह राज्यात रिपाइं आठवले गटाची भाजपसोबत आघाडी असताना उल्हासनगर महापालिकेत पक्षाचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव हे शिवसेना महाआघाडीसोबत आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा केल्याने, अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊन पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.उल्हासनगर महापालिकेत रिपाइं आठवले गट भाजपऐवजी शिवसेना महाआघाडीसोबत आहेत. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना, भाजपमधील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीत अनुक्रमे शिवसेनेच्या लीलाबाई अशान व रिपाइंचे भगवान भालेराव यांना मतदान केल्याने ते निवडून आले. स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने भाजपचे बंडखोर समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक अनुमोदन दिले. एका भाजप सदस्याने समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने पाटील सभापतिपदी निवडून आले. शिवसेना महाआघाडीत रिपाइं असताना पक्षातील अनेकांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत चर्चा केल्याने रिपाइंतील वाद चव्हाट्यावर आला.भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, पक्षाचे प्रवक्ता मनोज लासी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी आदींनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइंचे प्रदेश सचिव नाना पवार, माजी अध्यक्ष राजू सोनावणे, माजी नगरसेवक शांताराम निकम, पक्षाचे नेते अरुण कांबळे, महेंद्र बच्छाव, गौरव धावरे, तुकाराम सोनावणे आदींसोबत चर्चा केली. पक्षाची राज्य व शहर कार्यकारिणी पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांनी बरखास्त केल्याने, या चर्चेत दम नसल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली. पक्षाचे नेते व माजी नगरसेवक शांताराम निकम यांनी पक्षाची भाजपसोबत आघाडी असून शहर त्याला अपवाद नाही, अशी प्रतिक्रिया दिली. कार्यकारिणी बरखास्त केली असेल तर भालेराव शहराचे अध्यक्ष कसे काय, असाही सूर यानिमित्ताने काहींनी आळवला.रिपाइंची शक्ती विखुरलेली?शहर आंबेडकर आंदोलनाचे केंद्र असून रिपाइंची शक्ती मोठी आहे. मात्र रिपाइंची शक्ती अनेक गटातटांत विखुरली आहे. आठवले गटाची ताकद शहरात आहे. पक्षाचे ३ नगरसेवक महापालिकेत असून भगवान भालेराव यांच्याकडे उपमहापौरपद आहे. भगवान भालेराव यांच्या एकला चलो रेच्या भूमिकेमुळे पक्षातील दुखावलेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.