शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

उल्हासनगरात रिपाइंमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:40 IST

अंतर्गत वाद; उपमहापौर भगवान भालेराव यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

- सदानंद नाईकउल्हासनगर :  देशासह राज्यात रिपाइं आठवले गटाची भाजपसोबत आघाडी असताना उल्हासनगर महापालिकेत पक्षाचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव हे शिवसेना महाआघाडीसोबत आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा केल्याने, अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊन पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.उल्हासनगर महापालिकेत रिपाइं आठवले गट भाजपऐवजी शिवसेना महाआघाडीसोबत आहेत. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना, भाजपमधील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीत अनुक्रमे शिवसेनेच्या लीलाबाई अशान व रिपाइंचे भगवान भालेराव यांना मतदान केल्याने ते निवडून आले. स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने भाजपचे बंडखोर समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक अनुमोदन दिले. एका भाजप सदस्याने समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने पाटील सभापतिपदी निवडून आले. शिवसेना महाआघाडीत रिपाइं असताना पक्षातील अनेकांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत चर्चा केल्याने रिपाइंतील वाद चव्हाट्यावर आला.भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, पक्षाचे प्रवक्ता मनोज लासी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी आदींनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइंचे प्रदेश सचिव नाना पवार, माजी अध्यक्ष राजू सोनावणे, माजी नगरसेवक शांताराम निकम, पक्षाचे नेते अरुण कांबळे, महेंद्र बच्छाव, गौरव धावरे, तुकाराम सोनावणे आदींसोबत चर्चा केली. पक्षाची राज्य व शहर कार्यकारिणी पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांनी बरखास्त केल्याने, या चर्चेत दम नसल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली. पक्षाचे नेते व माजी नगरसेवक शांताराम निकम यांनी पक्षाची भाजपसोबत आघाडी असून शहर त्याला अपवाद नाही, अशी प्रतिक्रिया दिली. कार्यकारिणी बरखास्त केली असेल तर भालेराव शहराचे अध्यक्ष कसे काय, असाही सूर यानिमित्ताने काहींनी आळवला.रिपाइंची शक्ती विखुरलेली?शहर आंबेडकर आंदोलनाचे केंद्र असून रिपाइंची शक्ती मोठी आहे. मात्र रिपाइंची शक्ती अनेक गटातटांत विखुरली आहे. आठवले गटाची ताकद शहरात आहे. पक्षाचे ३ नगरसेवक महापालिकेत असून भगवान भालेराव यांच्याकडे उपमहापौरपद आहे. भगवान भालेराव यांच्या एकला चलो रेच्या भूमिकेमुळे पक्षातील दुखावलेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.