शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

तहसिलदारांसमवेतच्या बैठकीत सकारात्मक तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:36 IST

मार्क्सवाद्यांचे आंदोलन : आदिवासींनी आणली होती वनजमिनीदाव्यांची गाठोडी

पालघर : भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पालघरमध्ये केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवारी तहसीलदार महेश सागर ह्यांच्या समवेत झालेल्या बैठकी मध्ये सकारात्मक तोडगा काढण्यात आला.माकपच्या वतीने आदिवासी, शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सत्ताधारी सरकार विरोधात नाशिक येथे महामुक्काम, नाशिक-मुंबई लॉगमार्च काढण्यात आला होता. ह्या आंदोलनापुढे नमते घेत शासनाने मागण्या मान्य केल्या होत्या. मागण्या मान्य होऊनही प्रशासन पातळी वरून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे कारण देत १० आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील ७ तहसीलदार कार्यालयावर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार महेश सागर ह्यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलवूनही ठोस अंमलबजावणीची मागणी करुन आंदोलनकर्त्यांनी पालघरमध्ये पंचायत समिती कार्यालयासमोरच्या रस्त्यावर ठिय्या आंदोलन करुन रस्त्यातच चुली पेटवून अन्न शिजविले होते. सकाळी काही आंदोलनकर्त्यांच्या तब्येती बिघडल्यानंतर संतप्त आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणातच आंदोलन सुरू केले होते. ह्यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान लिखित आश्वासना नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.आज पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार महेश सागर, गटविकास अधिकारी डॉ.घोरपडे, नायब तहसीलदार पष्टे, जिल्हा उद्योगअधिकारी भामरे,वन विभागाचे अधिकारी पोळ, संखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.खंदारे,शिक्षण विभागाचे अधिकारी आणि माकपचे सुनील धानवा,बबलू त्रिवेदी आदींची बैठक पार पडली. ह्यावेळी कुटुंब विभक्त झाल्यानंतर त्यांना दर माणसी नियमाप्रमाणे धान्य पुरवठा केला जाईल,जिल्ह्यात वनहक्क दाव्या संदर्भात पालघर तालुक्याने उत्तम काम केले असून प्रांताधिकाºयांकडील एकूण ४ हजार १४९ दाव्या पैकी ३ हजार ७४१ दावे मंजूर करण्यात आले असून ते जिल्हाधिकाºयाकडे पाठविण्यात आले आहेत.कातकरी समाजाचे वनांतर्गत असलेले घरथान ५२८ दावे मंजूर करून ते वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आले आहे.सफाळे प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, काही स्टाफ कडून इंजेक्शन,सलाईन लावणे आदी उपचारासाठी पैशांची मागणी करतात व औषध साठा असूनही बाहेरून औषधें आणण्यास सांगितले जात असल्याच्या तक्र ारी महिलांनी केल्या. ह्यावर वैयक्तिकतक्रारी केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.खंदारे ह्यांनी सांगितले.ह्यावेळी सोमटा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची रिक्त जागेमुळे रु ग्णांच्या जीवितास निर्माण झालेला धोका, जि.प. चिंचारे शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान, विद्यार्थ्यांया गणवेशाचा घोळ, ११ वि १२ वि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची समस्या आदी विषयावरसकारात्मक चर्चा झाल्या नंतरही बैठक संपली.

टॅग्स :palgharपालघर