शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
5
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
6
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
8
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
9
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
10
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
11
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
13
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
14
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
15
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
16
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
17
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
18
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
19
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
20
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन

लोकसंख्या आहे एक कोटी, मात्र आधार केंद्रे अवघी 132

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:04 IST

अपडेटसाठी तीन तास रांगेत; आधार केंद्रसंख्या वाढविण्याची मागणी

- अजित मांडकेठाणे :   प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड हा आता महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. परंतु, असे असले तरी लोकसंख्येच्या मानाने जिल्ह्यात अवघी १३२ आधार केंद्रे आहेत. यामुळे एखाद्याला आधार कार्डात काही किरकोळ बदल करायचे असतील तरी त्यासाठी तब्बल तीन रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांनी आधार केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे.आजघडीला ठाणे  जिल्ह्याची लोकसंख्या जवळजवळ एक कोटीच्या आसपास आहे. परंतु, प्रत्येक ठिकाणी आधार केंद्रांची संख्या ही अपुरी आहे. ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर आदींसह ग्रामीण भागातही आधार केंद्रांची संख्या अपुरी आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आधार मुख्य केंद्र आहे. या ठिकाणी ठाणे शहरातील विविध भागांतून नागरिक आधार अपडेटसाठी किंवा  काही किरकोळ बदल करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी  आतील भागात त्यांना बसण्यासाठी आसने ठेवलेली आहेत. परंतु, असे असले तरी बाहेरील बाजूस दिवसभर नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यातही चौकशीसाठी किंवा आधार कार्ड प्रिंटसाठी एक खिडकी ठेवली आहे. त्या ठिकाणीदेखील तोबा गर्दी असल्याचे चित्र दिसते. तर जिल्हा परिषदेच्या आवारात दोन ठिकाणी आधार केंद्रे आहेत. त्या ठिकाणीदेखील सकाळपासून सांयकाळी ५ वाजेपर्यंत गर्दी असते. महापालिका मुख्यालयातील आधार केंद्रांवरदेखील रोजच्या रोज गर्दी दिसत आहे. एका आधार कार्डमध्ये काही किरकोळ बदल करायचे असतील किंवा मोबाइल क्रमांक बदल करायचा असेल तर त्यासाठीदेखील आधी अर्ज भरावा लागतो. त्यानंतर रांगेत उभे राहून आपले काम करून घ्यावे लागत आहे. यासाठीदेखील दोन ते तीन तासांचा कालावधी जात आहे. त्यातही एका व्यक्तीसाठी साधारणपणे १० ते १५ मिनिटांचा कालावधी जात असतो. त्यामुळे रांगा वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे काही वेळेस सर्वर डाऊन होण्यामुळेदेखील या प्रक्रियेला विलंब होताे. कोरोनामुळे जवळजवळ १० महिने आधार केंद्रेही बंद होती. त्यानंतर आता ती सुरू झाल्यानेदेखील नागरिकांची गर्दी विविध केंद्रांवर होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळजवळ एक कोटी लोकसंख्येसाठी १३२ आधार केंद्रे ही अपुरी असल्याने त्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. का करावे लागते आधार नूतनीकरण?प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड हाच मुख्य पुरावा म्हणून लागत आहे. रेशनिंग कार्ड असो किंवा बँक खाते सर्वच ठिकाणी आधार महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे आधारमध्ये काही बदल असल्यास, मोबाइल क्रमांक बदलल्यास, नावात बदल असल्यास तसेच वयाच्या ५व्या, १०व्या आणि १५व्या वर्षांनंतर आधार नूतनीकरण करावे लागते.थम्ब इप्रेशन दिले तरी दोन ते तीन वेळा परत परत द्यावे लागते. तसेच काही वेळेस इंटरनेट स्लो असते, व्यवस्थित अपडेट होत नाही, त्यामुळे हा घोळ आधी कमी करावा. त्यामुळेदेखील आम्हाला येथे रेंगाळत राहावे लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आधारसाठी आधी नोंदणी करावी लागते. त्यानंतर तुम्हाला २ ते ३ दिवसांनी बोलावले जाते.     - महादेव मोरे, ठाणे, विविध कारणांसाठी आधार अपडेट करावे लागत आहे. मला माझा मोबाइल नंबर अपडेट करायचा होता.  त्यासाठीदेखील अर्ज भरा, त्यानंतर तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातही इंटरनेटमध्ये बिघाड आणि सर्वर डाऊन होत असल्याने यात आधी सुधारणा करावी.    - सायली तांबे, ठाणे

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड