शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

अंत्यसंस्कारासाठी गरिबांना मिळणार मोफत लाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 01:31 IST

स्मशानभूमी ट्रस्टीचा निर्णय; महापालिकेने दिली प्रलंबित बिले

- सदानंद नाईकउल्हासनगर :  महापालिकेने लाकडाची प्रलंबित बिले दोन दिवसांपूर्वी दिल्याने स्मशानभूमी ट्रस्टीने गोरगरिब व गरजू नागरिकांना मोफत लाकडे देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, लाकडाचे दर वाढल्याने मोफत लाकडे देताना अल्प शुल्क आकारात असल्याची कबुली शांतीनगर भूमीचे ट्रस्टी मेघराज लुंड यांनी दिली आहे. गेल्या रविवारी या संदर्भात ‘लोकमत’ने ‘... आम्ही ती स्मशाने, ज्यांना लाकडेही न मिळाली’ या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पालिकेने प्रलंबित बिले दिली.उल्हासनगर महापालिकेने गोरगरीब व गरजू नागरिकांना आपल्या नातेवाइकांवर अंत्यसंस्कार करता यावे, म्हणून मोफत लाकडे देण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेतला होता. महापालिकेच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. एका अंत्यसंस्कारामागे महापालिका स्मशानभूमी ट्रस्टीला १ हजार रुपये देत असून, हा जुनाच दर आजही कायम आहे. दरमहा ३५० ते ४०० पेक्षा जास्त अंत्यसंस्कार शहराच्या चार स्मशानभूमींत होत असून, ७० टक्के नागरिक पालिकेच्या मोफत लाकडाच्या योजनेचा लाभ घेत आहेत. लाकडाच्या किमती वाढल्याने दरात वाढ करण्याची मागणी स्मशानभूमी ट्रस्टीने महापालिकेकडे केल्याची माहिती लुंड यांनी दिली. एका अंत्यसंस्कारामागे ट्रस्टीला एकूण १,७०० ते १,८०० रुपये खर्च येतो, तर महापालिका फक्त लाकडाचा १ हजार रुपये खर्च देते.दरम्यान, चार महिन्यांपासून महापालिकेने लाकडाची बिले दिले नसल्याने, स्मशानभूमी ट्रस्टीने मोफत लाकडे देण्यास टाळाटाळ केली. या प्रकाराने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला, तसेच स्मशानभूमीत लाकडे ओली, तसेच मोठ्या आकाराची असल्याने इतर स्मशानभूमीमध्ये मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याची वेळ नागरिकांवर आली होती. या बाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच महापालिकेचे धाबे दणाणले. उपायुक्त मदन सोंडे यांनी दोन दिवसांपूर्वी स्मशानभूमीचे प्रलंबित बिले दिल्याची माहिती दिली, तसेच लाकडाचे दर वाढल्याने वाढीव निधीचा प्रस्ताव मंजूर करून वाढीव निधी देण्याचे संकेत दिले. लुंड यांनीही प्रलंबित बिले मिळाली, असे ते म्हणाले.स्मशानभूमी ट्रस्टीला करावा लागतो जास्त खर्चएका अंत्यसंस्कारासाठी १,७०० ते १,८०० रुपये तर लाकडावर १,२०० रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. महापालिका फक्त एका अंत्यसंस्कारामागे हजार रुपये देत, असल्याने नाईलाजाने नागरिकांना अल्प शुल्क आकारावा लागतो. ट्रस्टीला स्मशानभूमीची देखभाल, पाणी, वीजबिल, माळीचा खर्च, अंत्यसंस्कार करणाऱ्यांचा पगार आदी खर्च ट्रस्टीला करावा लागत असल्याचे मेघराज लुंड यांचे म्हणणे आहे.