शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भिवंडी पालिकेच्या जलकुंभाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:40 IST

भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रातील आय.जी.एम. उपजिल्हा रुग्णालयाशेजारी असलेल्या २० दशलक्ष पाणी साठवण क्षमता असलेल्या जलकुंभाची दुरवस्था झाली असून, ...

भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रातील आय.जी.एम. उपजिल्हा रुग्णालयाशेजारी असलेल्या २० दशलक्ष पाणी साठवण क्षमता असलेल्या जलकुंभाची दुरवस्था झाली असून, भविष्यात कधीही अपघात होऊन मोठी दुर्घटना होण्याची भीती नगरसेवक अरुण राऊत यांनी व्यक्त केली आहे. पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.

या रुग्णालयाशेजारी पालिकेने ४० वर्षांपूर्वी २० दशलक्ष लीटर क्षमतेचा जलकुंभ बांधला. यातून भिवंडी पूर्वेत पाणीपुरवठा होतो. जलकुंभाची निगा व दुरुस्ती न केल्याने दुरवस्था झाली आहे. स्लॅब व खांबांना चिरा पडलेल्या असून काही ठिकाणी प्लास्टरही निखळून पडले आहे. प्लास्टर निखळून पडण्याच्या घटनांमुळे काहींना किरकोळ दुखपतीही झाल्या आहेत. तसेच जिनाही तुटलेला असून तो कधीही कोसळू शकतो, अशी भीती राऊत यांनी पाहणी केल्यावर व्यक्त केली आहे. जलकुंभाची कित्येक वर्षे स्वच्छता न केल्यामुळे टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व माती साचलेली असून यातून दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांना विविध साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. जलकुंभाच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. दुरुस्ती न केल्याने जलकुंभ धोकादायक स्थितीत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणीही राऊत यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.