शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आयोगाची मतदानासाठी कडेकोट नाकाबंदी

By admin | Updated: June 2, 2016 01:23 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक नगरसेवकाला मतदानाच्यावेळी मतपत्रिकेवरील क्रमांक लिहून आणण्याचे आदेश दिले होते.

पंकज पाटील,  बदलापूरविधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक नगरसेवकाला मतदानाच्यावेळी मतपत्रिकेवरील क्रमांक लिहून आणण्याचे आदेश दिले होते. मात्र, राजकीय पक्ष आपली मते फुटली किंवा कसे, यावर लक्ष ठेवण्याकरिता या क्रमांकाची माहिती मतदारांकडून घेत असल्याचा पूर्वानुभव असल्याने यावेळी मतपत्रिकेवर मतपत्रिकेचा क्रमांक दिसणार नाही, असा बंदोबस्त आयोगाने केला आहे. यामुळे घोडेबाजार करणाऱ्या राजकीय पक्षांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या निवडणुकीकरिता ३ जून रोजी १३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापूर्वी होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतपत्रिकेवरील अनुक्रमांक लिहून पक्षाच्या उमेदवाराकडे देण्याचे बंधन राजकीय पक्ष घालत होते. त्यामुळे कुठल्या अनुक्रमांकाची मतपत्रिका कुणाची असून ते मत आपल्याला मिळाले आहे किंवा कसे, हे उमेदवाराला निकालानंतर कळत होते. परिणामी, गुप्त मतदान पद्धतीला हरताळ फासला जात होता. याच तंत्राचा वापर यावेळीही शिवसेना-भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जाणार होता. होता. मात्र, आयोगाच्या नाकाबंदीमुळे राजकीय पक्षांचे हे मनसुबे धुळीस मिळाले. मतपत्रिका बाहेर नेण्यास बंदी : निवडणुकीसाठी देण्यात येणारी मतपत्रिका लपवून बाहेर नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक मतदारास मतपत्रिका मतपेटीत टाकणे बंधनकारक केले आहे. मतपेटीत मतमोजणीच्यावेळी कोरे कागद सापडतात. ज्या नगरसेवकांवर संशय असतो, त्यांचा गट केला जातो. त्यामधील पहिला नगरसेवक मतपेटीत कोरा कागद टाकतो व मतपत्रिका बाहेर आणून ती मतदान करून पुढील नगरसेवकांला देतो. तो नगरसेवक त्याची मतपत्रिका मत देऊन बाहेर आणतो व दाखवून दुसऱ्याला देतो. या प्रथेला त्यामुळे आळा बसेल.मोबाइल नेण्यास मनाई ‘मतपत्रिकेवरील अनुक्रमांकाबाबतची तक्रार आपण निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर, निवडणूक आयोगाने दिलेल्या उत्तरात मतपत्रिकेवरील अनुक्रमांक मतदाराला दिसणार नाही, असा उल्लेख आहे.’- कॅप्टन आशीष दामले, नगरसेवक, बदलापूरमतदान केल्यावर मतपत्रिकेचे फोटो काढण्याची शक्यता असल्याने आणि मतदान करताना मोबाइलने शूटिंग केले जाण्याची शक्यता असल्याने मतदान केंद्रात मोबाइल फोन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोबाइल बाहेर जमा करूनच मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्याच पेनचा वापर बंधनकारक निवडणुकीत उमेदवाराला मतदान करताना त्याच्या नावापुढे ‘१’ अंक लिहावा लागणार आहे. मात्र, हा क्रमांक लिहिण्याकरिता नगरसेवकांना स्वत:चे पेन वापरता येणार नाही. निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेल्या पेनचाच वापर करावा लागणार आहे. राजकीय पक्ष हे मतदारांना वेगवेगळ्या रंगाची शाई असलेले पेन देत होते. पाच ते सात नगरसेवकांना गट करून त्यांना तेवढ्या रंगाची शाई असलेले पेन देऊन मतदान केले जायचे. त्या गटात कुणाला कुठल्या रंगाचे पेन दिले आहे, हे उमेदवार अगोदरच नोंदवत असल्याने फुटीचा संशय असलेल्या नगरसेवकांचे मत पडले की नाही, ते कळत होते. कुठल्या कंपनीचे कुठल्या रंगाचे पेन वापरले जाणार, तेही आयोगाने स्पष्ट केलेले नाही.