शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

ठाण्यात मतदान ५ टक्के वाढले

By admin | Updated: February 22, 2017 05:02 IST

ठाणे व उल्हासनगर महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ठाण्यात ५८ टक्के तर

ठाणे, उल्हासनगर : ठाणे व उल्हासनगर महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ठाण्यात ५८ टक्के तर उल्हासनगरात ४७ टक्के मतदानाची नोंद झाली. मागील निवडणुकीच्या तुलनेत ठाण्यातील मतदानात पाच टक्के वाढ झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र उल्हासनगरात पुन्हा मतदारांच्या निरुत्साहाचेच दर्शन घडले आहे.ठाणे शहरात मतदान शांततेत झाले असले तरी मतदार यादीमधील घोळाचे परिणाम विविध ठिकाणच्या मतदान केंद्रावर दिसून आले. राबोडी, लोकपुरम, कळवा, घोडबंदर, वागळे, किसननगर व इतर भागात हा गोंधळ झाल्याचे दिसून आले. ठाण्यातील राबोडी भागातील सरस्वती विद्यालय या मतदान केंद्रावर गेलेल्या सुमारे दीड हजार मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली. त्यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण होते. महिलांनी तर आक्रमक स्वरूप धारण केले होते. अखेर या ठिकाणी पोलिसांच्या अतिरिक्त तुकडीला पाचारण करण्यात आले. दुसरीकडे लोकपुरम भागातही काही मतदारांची नावे यादीतून गहाळ झाली होती. वर्तकनगर भागात मुंब्रा आणि भिवंडीतील मतदार आणून मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप केले गेले. परंतु सतर्कतेमुळे हे बोगस मतदार पकडण्यात आले. पालिकेच्या निवडणूक विभागामार्फत २० फेब्रुवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्याने, त्यानंतर मतदाराचा क्रमांक बदलला गेला, तसेच मतदानाचे ठिकाणही बदलले गेले. त्यामुळे मतदारांना आधीच मिळालेल्या स्लीप हाती घेऊन मतदार केंद्रापर्यंत पोहोचल्यावर तुमचे मतदान येथे नाही दुसरीकडे बघा असे सांगितले जात असल्याने असंख्य मतदारांचा गोंधळ उडाला. काही ठिकाणी विविध पक्षांचे कार्यकर्ते हाती पेन घेऊन कोऱ्या स्लीप भरून देण्याचे काम करीत होते.  माजी नगरसेवकाला मारहाण पैसे वाटप करीत असल्याच्या आरोपावरून माजी नगरसेवक शहाजी जाविर यांना वागळे इस्टेट भागात मारहाण झाली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. किसननगर भागात तर अनिल कुमार यादव नामक मतदाता मतदान करण्यासाठी गेला असता त्याच्या जागी आधीच कोणी तरी मतदान करून मोकळा झाला होता. त्यामुळे या भागातही वातावरण तापल्याचे दिसून आले. मतदानाच्या दिवशीच पैसे वाटणाऱ्या दोघांना चोप देऊन लोकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. (प्रतिनिधी)असा वाढला टक्का 1 सकाळच्या सत्रापासून विविध भागांत मतदारांचा चांगलाच प्रतिसाद लाभल्याने सकाळी साडेअकरापर्यंत १०.३८ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामध्ये तरुणांचा सहभाग अधिक दिसून आला. त्यानंतर पुढील दोन तासांत १९.११ टक्के मतदानाची नोंद झाली. तर पुढील दोन तासांत म्हणजेच दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानात केवळ ९ टक्क्यांचीच वाढ दिसून आली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४५.०५ टक्के मतदानाची नोंद झाली. 2 उल्हासनगरात काही भागात मतदारांच्या तुरळक रांगा लागल्या होत्या. मात्र यादीत नावे नसल्याचे लक्षात येऊ लागल्यावर, तसेच केंद्राबाबतचा घोळ असल्याने काही अपवाद वगळता सर्वच मतदान केंद्रांवरील गर्दी ओसरू लागली. पुन्हा साडेतीननंतर मतदारांनी केंद्रांवर रांगा लावल्या. सकाळी साडेनऊपर्यंत ७ टक्के, साडेअकरा वाजेपर्यंत १२.४३ टक्के, दीड वाजेपर्यंत २४ टक्के, तर साडेचार वाजेपर्यंत ४०.१२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.