शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

ठाण्यात मतदान ५ टक्के वाढले

By admin | Updated: February 22, 2017 05:02 IST

ठाणे व उल्हासनगर महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ठाण्यात ५८ टक्के तर

ठाणे, उल्हासनगर : ठाणे व उल्हासनगर महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ठाण्यात ५८ टक्के तर उल्हासनगरात ४७ टक्के मतदानाची नोंद झाली. मागील निवडणुकीच्या तुलनेत ठाण्यातील मतदानात पाच टक्के वाढ झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र उल्हासनगरात पुन्हा मतदारांच्या निरुत्साहाचेच दर्शन घडले आहे.ठाणे शहरात मतदान शांततेत झाले असले तरी मतदार यादीमधील घोळाचे परिणाम विविध ठिकाणच्या मतदान केंद्रावर दिसून आले. राबोडी, लोकपुरम, कळवा, घोडबंदर, वागळे, किसननगर व इतर भागात हा गोंधळ झाल्याचे दिसून आले. ठाण्यातील राबोडी भागातील सरस्वती विद्यालय या मतदान केंद्रावर गेलेल्या सुमारे दीड हजार मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली. त्यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण होते. महिलांनी तर आक्रमक स्वरूप धारण केले होते. अखेर या ठिकाणी पोलिसांच्या अतिरिक्त तुकडीला पाचारण करण्यात आले. दुसरीकडे लोकपुरम भागातही काही मतदारांची नावे यादीतून गहाळ झाली होती. वर्तकनगर भागात मुंब्रा आणि भिवंडीतील मतदार आणून मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप केले गेले. परंतु सतर्कतेमुळे हे बोगस मतदार पकडण्यात आले. पालिकेच्या निवडणूक विभागामार्फत २० फेब्रुवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्याने, त्यानंतर मतदाराचा क्रमांक बदलला गेला, तसेच मतदानाचे ठिकाणही बदलले गेले. त्यामुळे मतदारांना आधीच मिळालेल्या स्लीप हाती घेऊन मतदार केंद्रापर्यंत पोहोचल्यावर तुमचे मतदान येथे नाही दुसरीकडे बघा असे सांगितले जात असल्याने असंख्य मतदारांचा गोंधळ उडाला. काही ठिकाणी विविध पक्षांचे कार्यकर्ते हाती पेन घेऊन कोऱ्या स्लीप भरून देण्याचे काम करीत होते.  माजी नगरसेवकाला मारहाण पैसे वाटप करीत असल्याच्या आरोपावरून माजी नगरसेवक शहाजी जाविर यांना वागळे इस्टेट भागात मारहाण झाली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. किसननगर भागात तर अनिल कुमार यादव नामक मतदाता मतदान करण्यासाठी गेला असता त्याच्या जागी आधीच कोणी तरी मतदान करून मोकळा झाला होता. त्यामुळे या भागातही वातावरण तापल्याचे दिसून आले. मतदानाच्या दिवशीच पैसे वाटणाऱ्या दोघांना चोप देऊन लोकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. (प्रतिनिधी)असा वाढला टक्का 1 सकाळच्या सत्रापासून विविध भागांत मतदारांचा चांगलाच प्रतिसाद लाभल्याने सकाळी साडेअकरापर्यंत १०.३८ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामध्ये तरुणांचा सहभाग अधिक दिसून आला. त्यानंतर पुढील दोन तासांत १९.११ टक्के मतदानाची नोंद झाली. तर पुढील दोन तासांत म्हणजेच दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानात केवळ ९ टक्क्यांचीच वाढ दिसून आली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४५.०५ टक्के मतदानाची नोंद झाली. 2 उल्हासनगरात काही भागात मतदारांच्या तुरळक रांगा लागल्या होत्या. मात्र यादीत नावे नसल्याचे लक्षात येऊ लागल्यावर, तसेच केंद्राबाबतचा घोळ असल्याने काही अपवाद वगळता सर्वच मतदान केंद्रांवरील गर्दी ओसरू लागली. पुन्हा साडेतीननंतर मतदारांनी केंद्रांवर रांगा लावल्या. सकाळी साडेनऊपर्यंत ७ टक्के, साडेअकरा वाजेपर्यंत १२.४३ टक्के, दीड वाजेपर्यंत २४ टक्के, तर साडेचार वाजेपर्यंत ४०.१२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.