शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान; जिल्ह्यात १५९ जागांवर उमेदवारच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:05 IST

आरक्षणासह न्यायालयीन अडथळे

ठाणे : ग्रामपंचायतींसाठी २३ जून रोजी मतदान होत आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या २०० सदस्यांसाठी मतदान होणार होते. मात्र, १५८ सदस्य व एका सरपंचपदाच्या जागेसाठी उमेदवारी अर्जच आला नाही. एसटी उमेदवारांसाठी या जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, उमेदवारच मिळाले नाहीत. तर, अन्य काही ठिकाणी न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्यामुळे तेथे मतदान होणार नाही. यामुळे जिल्ह्यातील केवळ सात मतदानकेंद्रांवर मतदान होणार आहे.मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये शहापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश असून त्यातील प्रत्येकी एका सदस्यासाठी मतदान आहे. याप्रमाणेच कल्याणच्या एका ग्रामपंचायतीमध्ये एका सदस्यासाठी आणि भिवंडीत चार ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण तालुक्यातील खोणी आडवली येथील एका सदस्याच्या निवडीसाठी स्थगिती मिळाली आहे. याप्रमाणेच भिवंडीच्या खारबाव ग्रामपंचायतीच्या चार जागांसाठीदेखील स्थगिती मिळाली असून एक जागा बिनविरोध निवडून आली आहे.शहापूर तालुक्यामधील गोठेघर ग्रामपंचायतीच्या एका जागेचे व मढहाळ येथील चार जागांचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने पडल्यामुळे तेथील निवडणूक आयोगानेच रद्द केली आहे. येथील आरक्षण गटविकास अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने जिल्हा परिषदेला पाठवले, जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाºयांकडे आणि तेथून थेट आयोगाकडे गेले. मात्र, या दोन ग्रामपंचायतींच्या पाच जागांचे आरक्षण चुकीचे असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनात आली आणि येथील निवडणूक रद्द करण्यात आली. यामुळे या जागांसाठी मतदान होणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले. चुकीचे आरक्षण, न्यायालयीन स्थगिती आणि आरक्षित जागेवर उमेदवार न मिळाल्यामुळे तेथे निवडणूक प्रक्रिया पार पडत नसल्याचे वास्तव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीस अनुसरून निदर्शनास आले आहे.मुरबाडमध्ये सरपंचासह ७४ जागांवर उमेदवारांचा शोधउमेदवारी अर्ज न आलेल्यांमध्ये एका सरपंचपदासह १५८ सदस्यांच्या जागांचा समावेश आहे. यापैकी मुरबाड तालुक्यातील ७४ सदस्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जच आले नाहीत. शहापूर तालुक्यातील एका सरपंचपदासह ४५ सदस्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवार मिळाले नाहीत. कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतींसह अंबरनाथ, भिवंडी तालुक्यांतील प्रत्येकी १३ सदस्यांच्या निवडणुकीसाठी संबंधित ग्रामपंचायतीकडे उमेदवारी अर्ज न मिळाल्यामुळे निवडणूक प्रक्रिया पार पडणार नसल्याचे वास्तव उघड झाले आहे. या विविध समस्यांमुळे जिल्ह्यात केवळ सात ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूक