शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान; जिल्ह्यात १५९ जागांवर उमेदवारच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:05 IST

आरक्षणासह न्यायालयीन अडथळे

ठाणे : ग्रामपंचायतींसाठी २३ जून रोजी मतदान होत आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या २०० सदस्यांसाठी मतदान होणार होते. मात्र, १५८ सदस्य व एका सरपंचपदाच्या जागेसाठी उमेदवारी अर्जच आला नाही. एसटी उमेदवारांसाठी या जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, उमेदवारच मिळाले नाहीत. तर, अन्य काही ठिकाणी न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्यामुळे तेथे मतदान होणार नाही. यामुळे जिल्ह्यातील केवळ सात मतदानकेंद्रांवर मतदान होणार आहे.मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये शहापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश असून त्यातील प्रत्येकी एका सदस्यासाठी मतदान आहे. याप्रमाणेच कल्याणच्या एका ग्रामपंचायतीमध्ये एका सदस्यासाठी आणि भिवंडीत चार ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण तालुक्यातील खोणी आडवली येथील एका सदस्याच्या निवडीसाठी स्थगिती मिळाली आहे. याप्रमाणेच भिवंडीच्या खारबाव ग्रामपंचायतीच्या चार जागांसाठीदेखील स्थगिती मिळाली असून एक जागा बिनविरोध निवडून आली आहे.शहापूर तालुक्यामधील गोठेघर ग्रामपंचायतीच्या एका जागेचे व मढहाळ येथील चार जागांचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने पडल्यामुळे तेथील निवडणूक आयोगानेच रद्द केली आहे. येथील आरक्षण गटविकास अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने जिल्हा परिषदेला पाठवले, जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाºयांकडे आणि तेथून थेट आयोगाकडे गेले. मात्र, या दोन ग्रामपंचायतींच्या पाच जागांचे आरक्षण चुकीचे असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनात आली आणि येथील निवडणूक रद्द करण्यात आली. यामुळे या जागांसाठी मतदान होणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले. चुकीचे आरक्षण, न्यायालयीन स्थगिती आणि आरक्षित जागेवर उमेदवार न मिळाल्यामुळे तेथे निवडणूक प्रक्रिया पार पडत नसल्याचे वास्तव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीस अनुसरून निदर्शनास आले आहे.मुरबाडमध्ये सरपंचासह ७४ जागांवर उमेदवारांचा शोधउमेदवारी अर्ज न आलेल्यांमध्ये एका सरपंचपदासह १५८ सदस्यांच्या जागांचा समावेश आहे. यापैकी मुरबाड तालुक्यातील ७४ सदस्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जच आले नाहीत. शहापूर तालुक्यातील एका सरपंचपदासह ४५ सदस्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवार मिळाले नाहीत. कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतींसह अंबरनाथ, भिवंडी तालुक्यांतील प्रत्येकी १३ सदस्यांच्या निवडणुकीसाठी संबंधित ग्रामपंचायतीकडे उमेदवारी अर्ज न मिळाल्यामुळे निवडणूक प्रक्रिया पार पडणार नसल्याचे वास्तव उघड झाले आहे. या विविध समस्यांमुळे जिल्ह्यात केवळ सात ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूक