शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान; जिल्ह्यात १५९ जागांवर उमेदवारच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:05 IST

आरक्षणासह न्यायालयीन अडथळे

ठाणे : ग्रामपंचायतींसाठी २३ जून रोजी मतदान होत आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या २०० सदस्यांसाठी मतदान होणार होते. मात्र, १५८ सदस्य व एका सरपंचपदाच्या जागेसाठी उमेदवारी अर्जच आला नाही. एसटी उमेदवारांसाठी या जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, उमेदवारच मिळाले नाहीत. तर, अन्य काही ठिकाणी न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्यामुळे तेथे मतदान होणार नाही. यामुळे जिल्ह्यातील केवळ सात मतदानकेंद्रांवर मतदान होणार आहे.मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये शहापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश असून त्यातील प्रत्येकी एका सदस्यासाठी मतदान आहे. याप्रमाणेच कल्याणच्या एका ग्रामपंचायतीमध्ये एका सदस्यासाठी आणि भिवंडीत चार ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण तालुक्यातील खोणी आडवली येथील एका सदस्याच्या निवडीसाठी स्थगिती मिळाली आहे. याप्रमाणेच भिवंडीच्या खारबाव ग्रामपंचायतीच्या चार जागांसाठीदेखील स्थगिती मिळाली असून एक जागा बिनविरोध निवडून आली आहे.शहापूर तालुक्यामधील गोठेघर ग्रामपंचायतीच्या एका जागेचे व मढहाळ येथील चार जागांचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने पडल्यामुळे तेथील निवडणूक आयोगानेच रद्द केली आहे. येथील आरक्षण गटविकास अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने जिल्हा परिषदेला पाठवले, जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाºयांकडे आणि तेथून थेट आयोगाकडे गेले. मात्र, या दोन ग्रामपंचायतींच्या पाच जागांचे आरक्षण चुकीचे असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनात आली आणि येथील निवडणूक रद्द करण्यात आली. यामुळे या जागांसाठी मतदान होणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले. चुकीचे आरक्षण, न्यायालयीन स्थगिती आणि आरक्षित जागेवर उमेदवार न मिळाल्यामुळे तेथे निवडणूक प्रक्रिया पार पडत नसल्याचे वास्तव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीस अनुसरून निदर्शनास आले आहे.मुरबाडमध्ये सरपंचासह ७४ जागांवर उमेदवारांचा शोधउमेदवारी अर्ज न आलेल्यांमध्ये एका सरपंचपदासह १५८ सदस्यांच्या जागांचा समावेश आहे. यापैकी मुरबाड तालुक्यातील ७४ सदस्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जच आले नाहीत. शहापूर तालुक्यातील एका सरपंचपदासह ४५ सदस्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवार मिळाले नाहीत. कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतींसह अंबरनाथ, भिवंडी तालुक्यांतील प्रत्येकी १३ सदस्यांच्या निवडणुकीसाठी संबंधित ग्रामपंचायतीकडे उमेदवारी अर्ज न मिळाल्यामुळे निवडणूक प्रक्रिया पार पडणार नसल्याचे वास्तव उघड झाले आहे. या विविध समस्यांमुळे जिल्ह्यात केवळ सात ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूक