शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
2
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
3
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
4
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
5
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
6
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
7
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
8
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
9
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
10
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
11
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
12
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
13
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
14
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
15
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
16
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
17
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
18
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
19
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
20
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले

कृषी कायद्याआडून राजकारण- कपिल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:59 IST

विराेधकांचा अराजक माजवण्याचा प्रयत्न

पालघर : दिल्लीतील आंदोलक शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही त्यांचे नेते हेका सोडण्यास तयार नाहीत. मोदी सरकारला अडचणीत आणून या आंदोलनाआडून अराजकता माजवण्याचा प्रयत्न काही शक्ती करत असल्याचा आरोप खासदार कपिल पाटील यांनी केला.केंद्राच्या कृषीविषयक कायद्याविषयी जनजागृती व्हावी व शंकांचे निराकरण मिडियाद्वारे व्हावे या दृष्टीने साेमवारी पालघरच्या शासकीय विश्रामगृहात खा. कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सुजित पाटील, युवाध्यक्ष समीर पाटील, माजी आमदार पास्कल धनारे, मधुकर पाटील, पुंडलिक भानुशाली आदी उपस्थित होते.  शेतकरी सक्षम व्हावा, त्याचे उत्पन्न दुप्पट व्हावा असा प्रयत्न केंद्रात पंतप्रधान झाल्यानंतर कृषीखात्यामार्फत सुरू आहे.केंद्राच्या २०१३ चे कृषी बजेट १७ हजार कोटी होते ते आता २०१९-२० चे एक लाख ३४ कोटींचे असल्याचे सांगून शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले. शेती सुधारणा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य हे काँग्रेस-राष्ट्रवादी सत्ता असताना बनले होते. तोच कायदा आता देशपातळीवर झाल्यास त्याला विरोध का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जव्हार, मोखाडा या आदिवासीबहुल भागातील आदिवासी बांधवांना शेतातील मोगरा, भाजी, फळेविक्रीची यंत्रणा उभी नसल्याने रस्त्यावर अथवा आठवडाबाजारात विक्री करावी लागते. यावर खा. पाटील समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. तसेच भाजप सरकार खाजगीकरणाच्या दिशेने जात अदानी-अंबानीसाठी हे करत असल्याबाबतचे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले.

‘लाेकभावना केंद्रापर्यंत पाेहाेचवू’देशात प्रत्येकाला सुविधा पाहिजेत. परंतु त्या सुविधा निर्माण करण्यासाठी एखादा प्रकल्प आणला की त्याला आपण विरोध करतो. एनराॅन प्रकल्पापासून हे आपण पाहत असून देशात एखाद्याला लीडर व्हायचे असेल तर शंभर माणसे जमवून विरोध दर्शविला की तुम्ही लीडर बनता. सध्या हेच सुरू असून वाढवण बंदराबाबत लोकांचा नेमका का विरोध आहे हे समजून घेताना केंद्र सरकारने काही चांगल्या गोष्टींचा विचार करूनच हा प्रकल्प आणला असेल, असे खासदारांनी सांगून लोकांच्या भावना केंद्रापर्यंत पोहाेचवू, असे स्पष्ट केले.