शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोपर दिशेकडील पुलावरून डोंबिवलीत रंगले राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:40 IST

डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद करण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.

कल्याण : डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद करण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यासाठी मनसेने मैदानात उडी घेताना पूल बंद करून नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असून रेल्वे आणि महापालिकेत यासंदर्भात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पूल बंद करण्यापूर्वी केडीएमसीने वाहतुकीसंदर्भात काय नियोजन केले आहे, याबाबत केडीएमसीने दोन दिवसांत लेखी स्वरूपात मनसेला उत्तर द्यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.मनसेचे गटनेते हळबे यांच्यासह मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, माजी नगरसेवक हर्षद पाटील, सुदेश चुडनाईक, युवा पदाधिकारी सागर जेधे यांनी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मारुती खोडके यांची भेट घेतली. यावेळी प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा आदी उपस्थित होते. कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद करण्याविषयी २० मे रोजी रेल्वे प्रशासनाने महापालिकेस पत्र दिले. २७ मे रोजी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता; मात्र तो अद्याप सुरूच आहे. रेल्वे व महापालिकेत पुलाविषयी समन्वय नसल्याने गोंधळाचे वातावरण असल्याचा आरोप मनसेच्या शिष्टमंडळाने केला आहे.कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल १९८० मध्ये खुला झाला. तेव्हा डोंबिवली पूर्व-पश्चिमेची लोकसंख्या कमी होती. लोकसंख्या वाढल्याने या पुलावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे हा पूल अपुरा पडत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आणि रेल्वेने निम्मा खर्च उचलून ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती केली. हा पूल तयार झाल्यावर वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, हा पूल अर्धवट आणि अरुंद आहे. त्याचे पोहोचरस्तेही अरुंद आहेत. त्यामुळे कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल पूर्ण बंद न करता त्यावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवून त्याची देखभाल-दुरुस्ती करता येईल का, असा पर्याय नागरिकांना द्यावा. पुलाच्या दुरुस्तीसाठी वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवण्याचा पर्याय दिला, तर अरुंद पोहोचरस्ते हे एकेरी वाहतुकीचे करावेत, अशी मागणी मनसेने खोडके यांच्याकडे केली. कोपर पुलाचाकोणता भाग धोकादायक आहे. त्यासाठी निविदा काढली आहे का, पुलाचे काम किती दिवसांत पूर्ण होईल. त्याची निश्चित डेडलाइन किती असेल, याचा खुलासा पालिकेने करावा. पत्रीपूल पाडला. त्याचे काम अद्याप झालेले नाही. त्यामुळे कोपर पुलाचा पत्रीपूल होऊ देणार नाही, असे मनसेने स्पष्ट केले आहे.>केडीएमसीत आज बैठककोपर दिशेकडील पुलासंदर्भात रेल्वेचे अधिकारी व महापालिका आयुक्त यांच्यासोबत मंगळवारी बैठक होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता जुनेजा यांनी दिली. या बैठकीत मनसेच्या प्रतिनिधींना सहभागी होण्याची अनुमती द्यावी. मनसेच्या स्थानिक प्रतिनिधींना पुलाविषयी चांगली माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काही मुद्दे बैठकीत उपस्थित केले जाऊ शकतात, याकडे हळबे यांनी लक्ष वेधले.