शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

पॅनल पद्धतीने निवडणूक घेण्याच्या निर्णयामुळे राजकीय गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : गेल्या दीड वर्षापासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंबरनाथ आणि बदलापुरातील राजकीय पुढाऱ्यांना राज्य शासनाने नवीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : गेल्या दीड वर्षापासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंबरनाथ आणि बदलापुरातील राजकीय पुढाऱ्यांना राज्य शासनाने नवीन धक्का दिला आहे. नगरपालिका निवडणुका पॅनल पद्धतीने घेण्याबाबत राज्य शासनाच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतल्याने पुन्हा राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. पण कोरोना काळामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात दीड वर्ष उलटले तरीही पालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली नाही. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना प्रभागातील आरक्षण अशा सर्व गोष्टी पूर्ण झाल्या असून मतदार याद्यादेखील निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. पालिकेची निवडणूक एक सदस्य पद्धतीने म्हणजे एक वाॅर्ड, एक नगरसेवक अशा पद्धतीने घेण्यात येणार होती. मात्र राज्य शासनाने पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुका दि्वसदस्यीय पद्धतीने म्हणजे दोन वाॅर्डांचा मिळून एक प्रभाग करून त्यानुसार घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे अंबरनाथ आणि बदलापुरातील राजकीय वर्तुळात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असताना, केवळ कोरोनामुळे निवडणुका न झाल्याने राज्य शासनाचा नवीन आदेश अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेला लागू होईल का नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे.

इच्छुकांचे धाबे दणाणले

दि्वसदस्यीय पद्धतीमुळे अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत काढण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रभागात निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. एवढेच नव्हे, तर आरक्षण आणि प्रभागात बदल झाल्यास त्याचा फटकाही इच्छुक उमेदवारांना सहन करावा लागणार आहे.

-------------