शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

पॅनल पद्धतीने निवडणूक घेण्याच्या निर्णयामुळे राजकीय गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : गेल्या दीड वर्षापासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंबरनाथ आणि बदलापुरातील राजकीय पुढाऱ्यांना राज्य शासनाने नवीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : गेल्या दीड वर्षापासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंबरनाथ आणि बदलापुरातील राजकीय पुढाऱ्यांना राज्य शासनाने नवीन धक्का दिला आहे. नगरपालिका निवडणुका पॅनल पद्धतीने घेण्याबाबत राज्य शासनाच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतल्याने पुन्हा राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. पण कोरोना काळामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात दीड वर्ष उलटले तरीही पालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली नाही. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना प्रभागातील आरक्षण अशा सर्व गोष्टी पूर्ण झाल्या असून मतदार याद्यादेखील निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. पालिकेची निवडणूक एक सदस्य पद्धतीने म्हणजे एक वाॅर्ड, एक नगरसेवक अशा पद्धतीने घेण्यात येणार होती. मात्र राज्य शासनाने पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुका दि्वसदस्यीय पद्धतीने म्हणजे दोन वाॅर्डांचा मिळून एक प्रभाग करून त्यानुसार घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे अंबरनाथ आणि बदलापुरातील राजकीय वर्तुळात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असताना, केवळ कोरोनामुळे निवडणुका न झाल्याने राज्य शासनाचा नवीन आदेश अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेला लागू होईल का नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे.

इच्छुकांचे धाबे दणाणले

दि्वसदस्यीय पद्धतीमुळे अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत काढण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रभागात निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. एवढेच नव्हे, तर आरक्षण आणि प्रभागात बदल झाल्यास त्याचा फटकाही इच्छुक उमेदवारांना सहन करावा लागणार आहे.

-------------