शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

पोलिसांनाही स्वत:ला घडवता आले पाहिजे - पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे

By जितेंद्र कालेकर | Updated: January 9, 2024 00:02 IST

ठाणे, भिवंडीतील ८९४ तक्रारदारांना मिळाला नऊ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल

ठाणे : चित्रपट, मालिकांमधील कथानकांसह विविध कारणांनी पोलिसांबद्दलचे मत नकारात्मक होते. जेंव्हा खऱ्या बाजूने पोलिस उभे राहतात, हे पटते तेंव्हा नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा दृष्टीकोन बदलतो, असे प्रतिपादन ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सोमवारी केले. ठाणे आणि भिवंडीतील ८९४ फिर्यादींना चोरीस गेलेला नऊ कोटी ३५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल आयुक्तांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहाच्या सभागृहात महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त पश्चिम प्रादेशिक विभागातील ठाणे, वागळे इस्टेट आणि भिवंडी या तीन परिमंडळातील तक्रारदारांच्या चोरी, दरोडा, जबरी चोरीतील मुद्देमालाचे अभिहस्तांतरण झाले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते पुढे म्हणाले, ब्रिटीश काळात सत्तेला मदत करण्यासाठी आणि नागरिकांना दाबून ठेवण्यासाठी पोलिसांचा उपयोग केला जात असे. साधारण १९८० नंतर पोलिसांनी जनतेचा भाग असले पाहिजे. जनतेच्या सेवेसाठी असले पाहिजे, ही धारणा पुढे आली. त्यादृष्टीने पोलिसांमध्ये बदल झाले. परंतू, पोलिस कोठडीतील मृत्यू, वाहतूक पोलिसाने दंडापोटी घेतलेले पैसे किंवा चित्रपट मालिकांमधील दाखवले जाणारे पोलिसांचे चित्र यामुळे पोलिसांबद्दलचे मत नागरिकांमध्ये नकारात्मक होते. 

पोलिस खात्यात येण्यापूर्वी आपलाही पोलिसांशी कधी संपर्क नव्हता. त्यामुळे आपलीही तशीच भावना होती. परंतू, पोलिस ठाण्यात आलेल्या दाेघांपैकी एक बाजू नाराज होते. परंतू, ,खऱ्या बाजूने पाेलिस उभे राहतात,मदत करतात, हे जेंव्हा समजते. तेंव्हा नागरिकांचे पोलिसांबद्दलचे मत बदलते. महिला,विद्याथीर् आणि जेष्ठ नागरिक यांना पोलिसांची कशी मदत हवी आहे, याचाही विचार झाला पाहिजे, नागरिकांनी पोलिसांना मदत केली पाहिजे आणि पोलिसांनाही स्वतत:ला घडवता आले पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी एक कोटी सात लाख ८९ हजार ९०६ इतकी रोकड, दोन कोटी २० लाख २० हजार ५४७ रुपयांचे दागिने, १५ लाख दोन हजारांचे मोबाईल फोन, दोन कोटी ९७ लाख ५० हजारांची वाहने, गहाळ झालेले एक कोटी ५७ लाख ८५ हजारांचे मोबाईल आणि २८ लाख १८ हजार ९२९ रुपयांच्या इलेक्ट्रीक वस्तू तसेच इतर एक कोटी आठ लाख ७१ हजारांचा ऐवज असा नऊ कोटी ३५ लाख ३८ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना आयुक्तांच्या हस्ते परत केला. यावेळी नागरिकांनी पोलिसांच्या प्रती समाधान व्यक्त केले.यावेळी सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त गणेश गावडे, नवनाथ ढवळे आणि अमरसिंह जाधव यांच्यासह नागरिक तसेच पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे