शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

पोलिसांनी केले इराणींचे मनपरिर्तन

By admin | Updated: November 10, 2015 23:59 IST

सोनसाखळी चोरीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या इराणी टोळ्यांमधील वस्तीतील सुशिक्षित तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांशी पोलिसांनी संपर्क साधून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात

ठाणे : सोनसाखळी चोरीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या इराणी टोळ्यांमधील वस्तीतील सुशिक्षित तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांशी पोलिसांनी संपर्क साधून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवाहन केले. त्याला त्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे गुन्हेगारीकडे वळणारे हात आता व्यापार आणि चांगल्या नोकरीसाठी सरसावणार आहेत. त्यामुळे मंगळसूत्रासारख्या स्त्री धनाचेही रक्षण होईलच, शिवाय इराणींचे मनपरिवर्तन झाल्यामुळे समाजपरिर्तनही होणार आहे.ठाणे जिल्हयातील कल्याणजवळील अंबिवली, मुंब्य्रातील रशिद कम्पाउंड आणि भिवंडीतील शांतीनगर या इराणींच्या मुख्य वसाहती आहेत. मोटारसायकली चोरणे आणि त्याच चोरलेल्या मोटारसायकलींवरुन महिलांच्या गळयातील मंगळसूत्र हिसकावणे हे मुख्य दोन ‘उद्योग’ या टोळया करतात. संपूर्ण महाराष्ट्रातच सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर परमवीर सिंग यांनी या गुन्हयांचा आढावा घेऊन त्यावर नियंत्रण आणण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी थेट इराणी वस्त्यांवरच कोंम्बिग आॅपरेशन राबवून ४५ जणांना अटक केली. अनेकांना मोक्काअंतर्गतही कारवाई केली. या टोळयांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सोनसाखळयांचा ऐवजही हस्तगत केला. तरीही काही प्रमाणात हे प्रकार सुरुच होते. त्याचदृष्टीने इराणी वस्त्यांमधील सर्वच रहिवाशांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना आयुक्तांनी कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी इराणी वस्तीत जावून तेथील युवकांचे शिक्षण आर्थिक परिस्थिती सामाजिक वातावरणाचे सर्व्हेक्षण करुन आपला अहवाल पोलिस आयुक्तांना दिला होता. (प्रतिनिधी)