शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

पोलिसांनी केले इराणींचे मनपरिर्तन

By admin | Updated: November 10, 2015 23:59 IST

सोनसाखळी चोरीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या इराणी टोळ्यांमधील वस्तीतील सुशिक्षित तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांशी पोलिसांनी संपर्क साधून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात

ठाणे : सोनसाखळी चोरीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या इराणी टोळ्यांमधील वस्तीतील सुशिक्षित तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांशी पोलिसांनी संपर्क साधून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवाहन केले. त्याला त्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे गुन्हेगारीकडे वळणारे हात आता व्यापार आणि चांगल्या नोकरीसाठी सरसावणार आहेत. त्यामुळे मंगळसूत्रासारख्या स्त्री धनाचेही रक्षण होईलच, शिवाय इराणींचे मनपरिवर्तन झाल्यामुळे समाजपरिर्तनही होणार आहे.ठाणे जिल्हयातील कल्याणजवळील अंबिवली, मुंब्य्रातील रशिद कम्पाउंड आणि भिवंडीतील शांतीनगर या इराणींच्या मुख्य वसाहती आहेत. मोटारसायकली चोरणे आणि त्याच चोरलेल्या मोटारसायकलींवरुन महिलांच्या गळयातील मंगळसूत्र हिसकावणे हे मुख्य दोन ‘उद्योग’ या टोळया करतात. संपूर्ण महाराष्ट्रातच सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर परमवीर सिंग यांनी या गुन्हयांचा आढावा घेऊन त्यावर नियंत्रण आणण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी थेट इराणी वस्त्यांवरच कोंम्बिग आॅपरेशन राबवून ४५ जणांना अटक केली. अनेकांना मोक्काअंतर्गतही कारवाई केली. या टोळयांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सोनसाखळयांचा ऐवजही हस्तगत केला. तरीही काही प्रमाणात हे प्रकार सुरुच होते. त्याचदृष्टीने इराणी वस्त्यांमधील सर्वच रहिवाशांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना आयुक्तांनी कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी इराणी वस्तीत जावून तेथील युवकांचे शिक्षण आर्थिक परिस्थिती सामाजिक वातावरणाचे सर्व्हेक्षण करुन आपला अहवाल पोलिस आयुक्तांना दिला होता. (प्रतिनिधी)