शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

पोलिसांनी केले इराणींचे मनपरिर्तन

By admin | Updated: November 10, 2015 23:59 IST

सोनसाखळी चोरीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या इराणी टोळ्यांमधील वस्तीतील सुशिक्षित तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांशी पोलिसांनी संपर्क साधून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात

ठाणे : सोनसाखळी चोरीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या इराणी टोळ्यांमधील वस्तीतील सुशिक्षित तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांशी पोलिसांनी संपर्क साधून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवाहन केले. त्याला त्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे गुन्हेगारीकडे वळणारे हात आता व्यापार आणि चांगल्या नोकरीसाठी सरसावणार आहेत. त्यामुळे मंगळसूत्रासारख्या स्त्री धनाचेही रक्षण होईलच, शिवाय इराणींचे मनपरिवर्तन झाल्यामुळे समाजपरिर्तनही होणार आहे.ठाणे जिल्हयातील कल्याणजवळील अंबिवली, मुंब्य्रातील रशिद कम्पाउंड आणि भिवंडीतील शांतीनगर या इराणींच्या मुख्य वसाहती आहेत. मोटारसायकली चोरणे आणि त्याच चोरलेल्या मोटारसायकलींवरुन महिलांच्या गळयातील मंगळसूत्र हिसकावणे हे मुख्य दोन ‘उद्योग’ या टोळया करतात. संपूर्ण महाराष्ट्रातच सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर परमवीर सिंग यांनी या गुन्हयांचा आढावा घेऊन त्यावर नियंत्रण आणण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी थेट इराणी वस्त्यांवरच कोंम्बिग आॅपरेशन राबवून ४५ जणांना अटक केली. अनेकांना मोक्काअंतर्गतही कारवाई केली. या टोळयांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सोनसाखळयांचा ऐवजही हस्तगत केला. तरीही काही प्रमाणात हे प्रकार सुरुच होते. त्याचदृष्टीने इराणी वस्त्यांमधील सर्वच रहिवाशांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना आयुक्तांनी कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी इराणी वस्तीत जावून तेथील युवकांचे शिक्षण आर्थिक परिस्थिती सामाजिक वातावरणाचे सर्व्हेक्षण करुन आपला अहवाल पोलिस आयुक्तांना दिला होता. (प्रतिनिधी)