शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

By अजित मांडके | Updated: March 14, 2024 16:36 IST

या कालावधीत कोणताही अनुचीत प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी भिवंडीत तब्बल दिड हजाराहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे.

ठाणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडा न्याय यात्रेच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर शुक्रवार आणि शनिवारी येत आहेत. त्या अनुषंगाने या कालावधीत कोणताही अनुचीत प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी भिवंडीत तब्बल दिड हजाराहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. तसेच ठाण्यातही मुंब्रा, कळवा आणि ठाण्यातील काही भागातही राहुल गांधी यांची ही यात्रा येणार असल्याने त्यासाठी देखील सुमारे ८०० पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी भिवंडीत प्रवेश केल्यानंतर ते भिवंडी येथील नदीनाका भागात नागरिकांची भेट घेण्याची शक्यता आहे. आनंद दिघे चौक परिसरात सांयकाळी ५ वाजता एक चौक सभा घेणार आहेत. त्यानंतर रांजनोली मार्गे प्रवास करतील. भिवंडीतील काही भाग ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तर काही भाग ग्रामीण क्षेत्राच्या अंतर्गत येतो. त्यामुळे ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात असणार आहे. ठाणे शहर पोलिसांचे दोन उपायुक्त, पाच साहाय्यक पोलीस आयुक्त, ४० अधिकारी आणि सुमारे एक हजार पोलीस अधिकारी कर्मचारी ठिकठिकाणी तैनात असणार आहे. तर ठाणे ग्रामीण पोलिसांचे पोलीस अधीक्षकांसह ४५० ते ५०० पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

भिवंडीतील सोनाळे गाव परिसरातील एका मैदानात ही यात्रा थांबणार आहे. त्यामुळे त्याठिकाणी देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. दुसºया दिवशी सकाळी ही यात्रा खारेगाव टोलनाका मार्गे मुंब्रा, कळवा, ठाणे शहरात प्रवेश करेल. या दरम्यान, ठाण्यातील इंडिया आघाडीचे नेते या यात्रेत सहभागी होणार आहे. दुसरीकडे ठाण्यातही शनिवारी राहुल गांधी यांची ही न्याय यात्रा येत असल्याने त्या अनुषगांने कायदा सुव्यवस्था आबादीत ठेवण्याच्या दृष्टीने मुंब्रा, कळवा आणि ठाणे शहरातील नियोजन देखील केले जाणार आहे. त्यानुसार याठिकाणी देखील ७०० ते ८०० पोलीसांचा ताफा सज्ज ठेवला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीthaneठाणेbhiwandiभिवंडी