शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

लॉकडाऊनसाठी ठाणे जिल्ह्यात ३१ ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेंतर्गत कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी २२ एप्रिलपासून लॉकडाऊनचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेंतर्गत कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी २२ एप्रिलपासून लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यांवर, तसेच शहर आणि जिल्ह्याची वेस अत्यावश्यक कारणाशिवाय ओलांडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. अशा कारवाईसाठी ठाणे ग्रामीणमध्ये चार, तर शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील २७ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्य शासनाने गुरुवारी रात्री ८ वाजेपासून ते १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यभर कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये शहर आणि जिल्हाबंदीबाबतचे नियम अधिक काटेकोरपणे पाळले जाणार आहेत. त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या पुणे, नाशिक आणि अहमदनगर, या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर तपासणी नाके उभारले आहेत. यामध्ये कसारा, टोकावडे, गणेशपुरी आणि कुळगाव या चार महत्त्वाच्या नाक्यांसह पोलीस ठाण्यांच्या अंतर्गतही नाकाबंदी आहे. याशिवाय, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट, या पाच परिमंडळांमधील ३५ पोलीस ठाण्यांतर्गत २७ ठिकाणी चेकनाके उभारले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडणाऱ्यांवर याठिकाणी साथ प्रतिबंधक कायदा कलम १८८ अंतर्गत कारवाईचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि सहपोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या आधिपत्याखालील हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त राहणार असून, पोलीस ठाण्यांच्या पातळीवरील पेट्रोलिंग, फिक्स पॉइंट, कोविड सेंटर आणि महत्त्वाच्या नाक्यांवर पोलिसांमार्फत कारवाई केली जाणार आहे.

असा राहणार बंदोबस्त-

राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या (एका कंपनीत १०० कर्मचारी), ५०० गृहरक्षक दलाचे जवान, मुख्यालयातील तीन हजार ५०० पोलीस, तसेच स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तपासणीला तैनात राहणार आहे.

अशी होणार कारवाई-

अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरणारे, वाहनांद्वारे शहर आणि जिल्हा ओलांडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वैद्यकीय तसेच अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अत्यावश्यक तसेच रुग्णालयीन कारण असेल, तर तशी कागदपत्रे संबंधितांनी दाखविल्यास त्यांना अनुमती दिली जाईल; पण बाहेर जाण्यासाठी कोणताही पास दिला जाणार नसल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.