शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

अंबरनाथमध्ये फेरीवाल्यांचा पोलिसांवर हल्ला

By admin | Updated: February 10, 2017 04:13 IST

अंबरनाथ रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाल्यांची दादागिरी वाढलेली असून त्याचा प्रत्यय नागरिकांसोबत आता पोलिसांनाही आला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाल्यांची दादागिरी वाढलेली असून त्याचा प्रत्यय नागरिकांसोबत आता पोलिसांनाही आला आहे. मुजोर फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांवरच या फेरीवाल्यांनी हल्ला करत कारवाईला विरोध केला. पोलिसांवरच हल्ला झाल्याने याप्रकरणी सात फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सहा आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा वावर वाढला असून त्या ठिकाणी फेरीवाले नागरिकांवर दादागिरी करतात. पालिका प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलालाही हे फेरीवाले जुमानत नसल्याचे वृत्त गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. याचा प्रत्यय सुरक्षा दलाला गुरुवारी आला. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान पादचारी पुलावर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेले असता सर्व फेरीवाल्यांनी एकत्रित येऊन या कारवाईला विरोध केला. पुलावर प्रवाशांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहत नसल्याच्या अनेक तक्रारी रेल्वेकडे येत असल्याने रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी सुभाष ठाकूर यांनी पूल मोकळा करण्याचे आदेश दिले. फेरीवाल्यांनीही संघटित होऊन या कारवाईला विरोध करण्याचे निश्चित केले. पोलीस जसे कारवाईसाठी पुलावर आले, त्याचवेळी सर्व फेरीवाल्यांनी त्यांना घेराव घालत कारवाईला विरोध केला. काही फेरीवाल्यांनी आपल्या फळाची टोपली उलटून पोलिसांवर आरोप करण्यास सुरुवात केली. या कारवाईला विरोध करण्यासाठी महिला पुढे सरसावल्याने पोलिसांनाही नमते घेण्याची वेळ आली. आपल्या कर्मचाऱ्यांना रोखण्याचे प्रयत्न होत असल्याचे अधिकारी ठाकूर यांना कळताच त्यांनी कडक कारवाई करण्याच्या हेतूने मोबाइलवर सर्व विरोध करणाऱ्या फेरीवाल्यांचे चित्रीकरण करत पुलापर्यंत आले. त्याचवेळी पोलीस आणि फेरीवाल्यांची वादावादी सुरू असताना एका महिलाविक्रेतीने ठाकूर यांच्या दिशेने फळ फेकून मारले. अधिकाऱ्यासोबत हा प्रकार घडल्याने पोलिसांनीही आक्रमक भूमिका घेत या फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई करत संपूर्ण पूल मोकळा केला. पुलावरून पळालेले हे फेरीवाले पालिका हद्दीतील स्कायवॉकवर जाऊन बसले, तर काही फेरीवाल्यांनी थेट पुलाशेजारील जागेवर आपले ठाण मांडले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील संजीव यादव, सोहिल जाधव, जितेंद्र छेदीलाल, विकास यादव, कल्लू यादव, धर्मू यादव या सहा जणांना अटक केली, तर अखिलेश यादव हा फेरीवाला फरार झाला आहे. (प्रतिनिधी)