शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

अंबरनाथच्या फेरीवाल्यांवर पोलिसांची 'वक्रदृष्टी'; चार दिवसात तब्बल ४० गुन्हे दाखल

By पंकज पाटील | Updated: March 27, 2023 16:43 IST

अंबरनाथ शहरातले फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक चांगलेच धास्तावले आहेत.

अंबरनाथ - अंबरनाथमध्ये फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्यावर पोलिसांची 'वक्रदृष्टी' पडली आहे. कारण मागील ४ दिवसात पोलिसांनी रहदारीला अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत तब्बल ४० फेरीवाले आणि रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर देखील शिवाजी महाराज चौकातील फेरीवाल्यांची मुजरी मात्र किंचितही कमी झालेली नाही.

अंबरनाथमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा शहराचा केंद्रबिंदू आहे. रेल्वे स्टेशनबाहेरचा हा प्रमुख चौक असल्याने येथे नेहमीच पादचारी, वाहनचालक यांची गर्दी असते. त्यात फेरीवाले आणि रिक्षाचालक यांचीही चौकात गर्दी असते. मात्र बऱ्याच वेळा थेट अर्धा रस्ता अडवून फेरीवाले बस्तान मांडून बसलेले असतात. तसेच रिक्षाचालकही बेशिस्तपणे रिक्षा रस्त्यात लावून उभे राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत मोठी भर पडते. यामुळे पोलिसांची डोकेदुखी मात्र सतत वाढत राहते. याच कारणाने पोलिसांनी हे फेरीवाले आणि रिक्षाचालक यांच्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. मागील ४ दिवसात पोलिसांनी तब्बल ४० गुन्हे दाखल केले आहेत. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अंबरनाथ शहरातले फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक चांगलेच धास्तावले आहेत. मात्र चौकातील त्यांचे बस्तान आजही कायम आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कारवाई अजून कठोरपणे करणे गरजेचे आहे.