शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अंबरनाथच्या फेरीवाल्यांवर पोलिसांची 'वक्रदृष्टी'; चार दिवसात तब्बल ४० गुन्हे दाखल

By पंकज पाटील | Updated: March 27, 2023 16:43 IST

अंबरनाथ शहरातले फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक चांगलेच धास्तावले आहेत.

अंबरनाथ - अंबरनाथमध्ये फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्यावर पोलिसांची 'वक्रदृष्टी' पडली आहे. कारण मागील ४ दिवसात पोलिसांनी रहदारीला अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत तब्बल ४० फेरीवाले आणि रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर देखील शिवाजी महाराज चौकातील फेरीवाल्यांची मुजरी मात्र किंचितही कमी झालेली नाही.

अंबरनाथमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा शहराचा केंद्रबिंदू आहे. रेल्वे स्टेशनबाहेरचा हा प्रमुख चौक असल्याने येथे नेहमीच पादचारी, वाहनचालक यांची गर्दी असते. त्यात फेरीवाले आणि रिक्षाचालक यांचीही चौकात गर्दी असते. मात्र बऱ्याच वेळा थेट अर्धा रस्ता अडवून फेरीवाले बस्तान मांडून बसलेले असतात. तसेच रिक्षाचालकही बेशिस्तपणे रिक्षा रस्त्यात लावून उभे राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत मोठी भर पडते. यामुळे पोलिसांची डोकेदुखी मात्र सतत वाढत राहते. याच कारणाने पोलिसांनी हे फेरीवाले आणि रिक्षाचालक यांच्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. मागील ४ दिवसात पोलिसांनी तब्बल ४० गुन्हे दाखल केले आहेत. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अंबरनाथ शहरातले फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक चांगलेच धास्तावले आहेत. मात्र चौकातील त्यांचे बस्तान आजही कायम आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कारवाई अजून कठोरपणे करणे गरजेचे आहे.