शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विषारी भाज्यांनी लोकांचे आरोग्य आले धोक्यात

By admin | Updated: January 11, 2017 07:08 IST

डोंबिवली परिसरात रेल्वेमार्गालगत पिकवल्या जाणाऱ्या पालेभाज्यांसाठी नाल्यात सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी वापरले जात आहे.

डोंबिवली : डोंबिवली परिसरात रेल्वेमार्गालगत पिकवल्या जाणाऱ्या पालेभाज्यांसाठी नाल्यात सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी वापरले जात आहे. या भाज्या ताज्या म्हणून मिळत असल्या, तरी त्या मानवी आरोग्यास सर्वाधिक हानीकारक आहेत. त्या पिकविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा संतप्त सवाल मनसेने उपस्थित केला आहे. यातील काही भाज्या पालिकेच्या हद्दीत तर काही रेल्वेच्या हद्दीत पिकवल्या जातात. त्यासाठी भाडेपट्ट्याने भूखंड दिले आहेत. मात्र त्यानंतर तेथे पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. पालिका, रेल्वे त्याबाबत परस्परांकडे बोट दाखवते, असा आरोप मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केला. कृषी विभागानेही त्याबाबत काहीही कारवाई केलेली नाही. याविरोधात पक्षातर्फे गेली पाच वर्षे दरवर्षी आंदोलन केले जाते. या विषारी भाज्यांची शेती उखडून टाकली जाते. एक दिवसाचे आंदोलन होते. त्यामुळे त्यावर स्टंटबाजीची टीका केली जाते. हा मुद्दा जनहिताचा आहे, या दृष्टीकोनातून त्याकडे पाहिले जात नाही. इतर राजकीय पक्षही त्यासाठी पुढे येत नाहीत, अशी खंत मांडली. भाज्या पिकविणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी कोणतीही सरकारी यंत्रणा पुढे येत नाही. त्यांची कारवाईची इच्छा दिसत नाही. रेल्वेमार्गालगतच्या जागा रेल्वेने काही शेतकऱ्यांना भाडे तत्वावर दिल्या आहेत. या शेतीला बाजाराधिष्ठीत शेती असे संंबोधले जाते. पण त्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो. रेल्वे ज्या शेतकऱ्याना ही जागा भाडे तत्वावर देते. ते स्वत: भाजीपाला न पिकविता परप्रांतीयांना भाड्याने देतात. ती मंडळी नाल्यातून पंपाद्वारे पाणी उचलून प्रदूषित सांडपाण्यावर भाजीपाला पिकवतात. तोच बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. त्या भाज्या खाणाऱ्यांना अनेक आजार होतात. ते आजार जीवघेणे असतात. त्याकडे डोळेझाक केली जाते, असे म्हणणे त्यांनी मांडले. डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरासमोर रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. या केंद्रातून रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते खंबाळपाडा नाल्यात सोडले जाते. ते ठाकुर्लीनजीक रेल्वेमार्गाखालून कल्याण खाडीत जाते. याच नाल्यातील पाणी भाजीपाला शेतीसाठी वापरले जाते, असे त्यांचे म्हणणे आहे. विषारी भाज्या पिकविणाऱ्या ंविरोधात कदम यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयात धाव घेतली. मंडळाच्या अधिकारी वर्गाला जाब विचारला असता त्यांनी हा प्रश्न आमच्या कार्यकक्षेत येत नाही, असे सांगितले. त्यामुळे कदम यांनी त्यांचा मोर्चा कल्याण कृषी अधिकाऱ्यांकडे वळविला. (प्रतिनिधी)