शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

बोरीवलीत नारळांच्या झाडांवर विषप्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 02:40 IST

वृक्ष प्राधिकरणाचे दुर्लक्ष : चार झाडांवर विषप्रयोग

मुंबई : बोरीवली पूर्वेकडील राजेंद्रनगरातील ओम साई सोसायटी येथील चार नारळांच्या झाडांवर विषप्रयोग झाला असून, झाडे सुकत चालली आहेत. झाडांच्या खोडाला ड्रिल करून, त्यात रासायनिक पदार्थ टाकून विषप्रयोग झाल्याची तक्रार कस्तुरबा पोलीस ठाण्यामध्ये नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणात कित्येक दिवस उलटूनही वृक्ष प्राधिकरण किंवा उद्यान विभागाने दखल न घेतल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

२५ डिसेंबर, २०१८च्या सायंकाळी तीन अज्ञात माणसे आली होती. जमिनीचा सर्व्हे करण्यासाठी आलो आहोत, असे त्या अज्ञात लोकांनी सांगितले. या वेळी त्यांनी आमच्या घरातून ड्रिल मशिनसाठी लागणारी वीज घेतली. त्यानंतर, झाडांना ड्रिल करायला सुरुवात केली. दरम्यान, ते तिघेही काही तरी चुकीचे करत असल्याचा संशय आला. त्यातली एक व्यक्ती चहूबाजूने नजर ठेवत होती. सायंकाळची वेळ झाल्यामुळे घराबाहेरची लाइट लावली. तेव्हा लाइट बंद करण्यासाठी तिघांतल्या एका व्यक्तीने सांगितले. त्याच्याकडे पिवळ्या रंगाचे रसायन होते. ते रसायन नारळाच्या झाडांच्या मुळाजवळ टाकत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने सांगितली.

म्हाडाच्या भूखंडावर अशोक, आंबा, नारळ इत्यादी जुनी झाडे आहेत. याबाबत माजी नगरसेविका शिल्पा चोगले यांनी २६ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्रनगर येथील चार नारळ झाडांच्या मुळावर विषप्रयोग करण्यात आल्याची तक्रार नोंदविली आहे. शिल्पा चोगले या संदर्भात सांगतात की, महापालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे. महापालिकेकडून तपास करण्यात दिरंगाई होत आहेत. झाडे अर्धी मेलेल्या स्थितीमध्ये आहेत. जमिनीचा सर्व्हे करण्याचे कारण देऊन तिघांनी झाडांवर ड्रिल मशिनने छिद्र पाडून विषप्रयोग केला आहे. संबंधित व्यक्तिवर कारवाई झाली पाहिजे.‘झाडे बचाव’ आंदोलनसरकारने पर्यावरण संरक्षणासाठी इतके कायदे व नियम तयार केले असून, राजेंद्रनगर येथील झाडांवर झालेल्या विष प्रयोगवर अद्याप महापालिका, पोलीस आणि उद्यान प्रशासनाकडून कारवाई झालेली नाही. गुन्हेगाराला शिक्षा झाली नाही, तर झाडांच्या हत्येचे सत्र काही थांबणार नाही. यासाठी सोमवारी, १० वाजता राजेंद्रनगर येथे झाडे बचाव आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक शुभजीत मुखर्जी यांनी दिली.

टॅग्स :Mumbaiमुंबईthaneठाणे