शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सद्य परिस्थीतीवर भाष्य करण्यासाठी कवी, साहित्यिकांनी पुढे यावे : राज ठाकरे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 24, 2023 20:28 IST

रावण पब्लिशिंग हाऊसच्यावतीने टीप टॉप प्लाझा येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आपल्या आजूबाजूला निर्माण झालेल्या परिस्थीतीवर कवी बोलले तर कवींचेही महत्त्व वाढेल. आपल्या आजूबाजूला जे राजकीय वातावरण गढूळ झाले आहे त्यावरही भाष्य होणे गरजेचे आहे आणि ते त्याचवेळेला होणे गरजेचे आहे. असलेल्या परिस्थीतीवर भाष्य करण्यासाठी त्याचवेळी कवी, साहित्यिक पुढे आले पाहिजे. कवींना महत्त्व प्राप्त व्हावे असे पाऊल त्यांच्याकडूनही उचलले गेले पाहिजे असे परखड मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केले.

डॉ. नागेश कांबळे यांनी कवी कुसुमाग्रज यांचे अप्रकाशित साहित्य संकलित केले आहे. या अप्रकाशित साहित्याचे क आणि ख या दोन ग्रंथाच्या अखंड मालेचे प्रकाशन राज यांच्या हस्ते करण्यात आले. 

रावण पब्लिशिंग हाऊसच्यावतीने टीप टॉप प्लाझा येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. राज म्हणाले, कवी कुसुमाग्रज यांना मी बाळासाहेबांबरोबर भेटलो होतो. ती एकच त्यांना भेटण्याची संधी मिळाली होती. आपण आपल्याच लोकांना मोठे करत नाही. आपली माणसे किती थोर होती हे परदेशात सांगितले जाते पण दुर्दैवाने ते आपल्याकडे सांगितले जात नाही. ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी आपल्या भाषणात आपल्याकडे अज्ञानाचे महामेरु खूप आहेत असा उल्लेख केला होता. त्याचे समर्थन करत राज यांनी ह्ल्लीच्या मंत्र्यांना तर काही माहीतच नसते. ते वर्तमानकाळात नसतातच. हे सांगताना कवी कुसुमाग्रज यांची पन्नाशीची उमर गाठली ही कविता राज यांनी सादर केली.

ही कविता प्रत्येकाच्या घरात लावली पाहिजे आणि जो चुकत असेल त्याला ती पाठवली पाहिजे असे आवाहनही केले. ही कविता मंत्रालयात लावली होती, जागा चुकली होती असे मिश्किलपणे म्हणाले. मराठी साहित्य इतर भाषांत यायला हवे. मराठीपण जगाला कळण्यासाठी साहित्यासारखी दुसरी गोष्ट नाही असे ते शेवटी म्हणाले. यावेळी व्यासपीठावर डॉ. कांबळे, ज्येष्ठ कवी बागवे, अरुण म्हात्रे, प्रकाशक सुदेश हिंगलासपुरकर, रावण पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक अभिजीत पानसे, अभय गाडगीळ, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अभिजीत पेडणेकर आदी उपस्थित होते. 

दरम्यान, जितेंद्र जोशी, स्पृहा जोशी, पुष्कर श्रोत्री, कौशल इनामदार यांनी कुसुमाग्रज यांच्या कवीता, साहित्याचे सादरीकरण केले. समीरा गुजर हिने सुत्रसंचालन केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे