शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील शिरीष पै कट्ट्यावर सादर झाल्या स्वरचित कविता, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 16:15 IST

उद्वेली बुक्स व शांता वसंत पटवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिरीष पै कट्ट्यावर स्वरचित कवितांचा पाऊस पडला.

ठळक मुद्देस्वरचित कविता शिरीष पै कट्ट्यावर सादर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनोद इंगळहळीकरआपले लिखाण हे मोघम असू नये - डॉ. विनोद इंगळहळीकर

ठाणे: विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच कवींनी आपल्या स्वरचित कविता शिरीष पै कट्ट्यावर सादर केल्या. ऐन पावसाळ््यात या कवितांचा पाऊस देखील ठाणेकरांनी अनुभवला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनोद इंगळहळीकर यांनी कविता लिहीताना प्रतिभा व त्याचे तंत्र माहित असावे असे सांगून मार्गदर्शन केले.डॉ. इंगळहळीकर पुढे म्हणाले की, प्रत्येकाच्या मनात काही ना काही असते. कोणत्याही कविता, लिखाणाचा उद्देश हा आपल्या मनातील विचार समोरच्याच्या मनात जावे. आपल्या मनातील भाव समोरच्याच्या मनात निर्माण व्हावे. हे यशस्वी करण्यासाठी आपले लिखाण हे मोघम असू नये तर ते स्पष्ट, स्वच्छ तसेच, दुसऱ्याला कळेल असे असावे. आपल्याला नेमके काय म्हणायचे हे कवितेत उतरले पाहिजे. विचार सुसुत्र असावे. आपण कोणत्याही शब्दांच्या प्रेमात पडतो आणि तो वापरायचा म्हणून वापरतो, तसे होता कामा नये असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. विवेक मेहेत्रे यांनी त्यांचे स्वागत व परिचय करुन दिला. चिन्मय उमाटकर या विद्यार्थ्याने सादर केलेल्या मैत्री या कवितेने कट्ट्याची सुरूवात झाली. त्यानंतर साक्षी कदम हिने विरह, संजय भट यांनी ससा, माधुरी जोग यांनी ‘इमानाची स्पर्धा’, अदिती भिलारे हिने ‘धरती’, विकास भावे यांनी पावसाळ््यात बहरलेल्या निसर्गावर ‘वारा सुटला, ढग ही आले’, डॉ. मारुती नलावडे यांनी ‘का झाली नकोशी’, मनमोहन रेगे यांनी ‘स्वगेर्ची अमृतधारा’ ही मालवणी कविता, यशवंत दीडवाघ याने ‘माती’, राजनीश सोनावणे हिने ‘होय होय मी स्भी भ्रुण बोलतेय’, उत्तम खडसे यांमी ‘माय भगिनी’ अशा अनेक कविता सादर झाल्या. डॉ. सतिश कानविंदे यांनी ‘शेण म्हणजे शेण असतं’, साक्षी कांबळे हीने ‘आयुष्य’, समिक्षा थिटे हिने ‘तिच्या कविता’, विकास वायकूळ यांनी ‘आठवण पावसाची’, रविंद्र कारेकर यांनी प्रेम, विरह, पाऊस या विषयांवरच्या हलक्या फुलक्या चारोळ््या, अनंत जोशी यांनी ‘ठरवलंय आता’ या कवितांना वाह वाह, क्या बातची दाद दिली. विशेष दाद देऊन गेल्या त्या डॉ. र. म. शेजवलकर यांची आडनावावरच्या विसंगतीवर आधारीत कविता आणि विवेक मेहेत्रे यांची डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर आधारीत ‘वचन आमचे’ या कविता. दरम्यान, डॉ. सुधीर मोंडकर यांनी साधी कवितेपेक्षा बालकविता लिहीणे कठिण असते असे सांगत फुलपाखरु छान किती दिसते ही बालकविता ऐकवली. डॉ. मोंडकर यांनी कार्यक्रमाची सुत्र सांभाळली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई