शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

ठाण्यातील शिरीष पै कट्ट्यावर सादर झाल्या स्वरचित कविता, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 16:15 IST

उद्वेली बुक्स व शांता वसंत पटवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिरीष पै कट्ट्यावर स्वरचित कवितांचा पाऊस पडला.

ठळक मुद्देस्वरचित कविता शिरीष पै कट्ट्यावर सादर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनोद इंगळहळीकरआपले लिखाण हे मोघम असू नये - डॉ. विनोद इंगळहळीकर

ठाणे: विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच कवींनी आपल्या स्वरचित कविता शिरीष पै कट्ट्यावर सादर केल्या. ऐन पावसाळ््यात या कवितांचा पाऊस देखील ठाणेकरांनी अनुभवला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनोद इंगळहळीकर यांनी कविता लिहीताना प्रतिभा व त्याचे तंत्र माहित असावे असे सांगून मार्गदर्शन केले.डॉ. इंगळहळीकर पुढे म्हणाले की, प्रत्येकाच्या मनात काही ना काही असते. कोणत्याही कविता, लिखाणाचा उद्देश हा आपल्या मनातील विचार समोरच्याच्या मनात जावे. आपल्या मनातील भाव समोरच्याच्या मनात निर्माण व्हावे. हे यशस्वी करण्यासाठी आपले लिखाण हे मोघम असू नये तर ते स्पष्ट, स्वच्छ तसेच, दुसऱ्याला कळेल असे असावे. आपल्याला नेमके काय म्हणायचे हे कवितेत उतरले पाहिजे. विचार सुसुत्र असावे. आपण कोणत्याही शब्दांच्या प्रेमात पडतो आणि तो वापरायचा म्हणून वापरतो, तसे होता कामा नये असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. विवेक मेहेत्रे यांनी त्यांचे स्वागत व परिचय करुन दिला. चिन्मय उमाटकर या विद्यार्थ्याने सादर केलेल्या मैत्री या कवितेने कट्ट्याची सुरूवात झाली. त्यानंतर साक्षी कदम हिने विरह, संजय भट यांनी ससा, माधुरी जोग यांनी ‘इमानाची स्पर्धा’, अदिती भिलारे हिने ‘धरती’, विकास भावे यांनी पावसाळ््यात बहरलेल्या निसर्गावर ‘वारा सुटला, ढग ही आले’, डॉ. मारुती नलावडे यांनी ‘का झाली नकोशी’, मनमोहन रेगे यांनी ‘स्वगेर्ची अमृतधारा’ ही मालवणी कविता, यशवंत दीडवाघ याने ‘माती’, राजनीश सोनावणे हिने ‘होय होय मी स्भी भ्रुण बोलतेय’, उत्तम खडसे यांमी ‘माय भगिनी’ अशा अनेक कविता सादर झाल्या. डॉ. सतिश कानविंदे यांनी ‘शेण म्हणजे शेण असतं’, साक्षी कांबळे हीने ‘आयुष्य’, समिक्षा थिटे हिने ‘तिच्या कविता’, विकास वायकूळ यांनी ‘आठवण पावसाची’, रविंद्र कारेकर यांनी प्रेम, विरह, पाऊस या विषयांवरच्या हलक्या फुलक्या चारोळ््या, अनंत जोशी यांनी ‘ठरवलंय आता’ या कवितांना वाह वाह, क्या बातची दाद दिली. विशेष दाद देऊन गेल्या त्या डॉ. र. म. शेजवलकर यांची आडनावावरच्या विसंगतीवर आधारीत कविता आणि विवेक मेहेत्रे यांची डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर आधारीत ‘वचन आमचे’ या कविता. दरम्यान, डॉ. सुधीर मोंडकर यांनी साधी कवितेपेक्षा बालकविता लिहीणे कठिण असते असे सांगत फुलपाखरु छान किती दिसते ही बालकविता ऐकवली. डॉ. मोंडकर यांनी कार्यक्रमाची सुत्र सांभाळली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई