शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

डोंबिवलीत रंगले महामानवांच्या विचारांचे कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:04 IST

ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांना वाहिली आदरांजली : स.है. जोंधळे हायस्कूलमध्ये झाला कार्यक्रम

डोंबिवली : महामानवांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, त्यांनी केलेल्या जनजागृतीचे महत्त्व नागरिकांना कळावे, हे उद्दिष्ट समोर ठेवून शनिवारी सायंकाळी येथील पश्चिमेकडील स.है. जोंधळे हायस्कूलमध्ये विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महामानवांच्या विचारांचे कविसंमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महामानवांच्या विचारधारेवर आधारित, स्वरचित कविता यावेळी सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत दिवंगत राजा ढाले यांना कवींच्या वतीने आदरांजलीही वाहण्यात आली.

चैतन्य सुखदेव सोनावणे फाउंडेशन ठाणे, बहुउद्देशीय मानवसेवा सामाजिक संस्था भिवंडी, कवी कट्टा ग्रुप कल्याण-मुंबई, माझी आई प्रतिष्ठान सामाजिक संस्था भिवंडी, स.सु.स. आणि लाख मोलाच्या कविता काव्यमंच कल्याण, विकास प्रबोधिनी संस्था भांडुप, मुंबई, रामवेणू काव्य मंच दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

संमेलनाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे होते, तर संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक जगदेव भटू, नवनाथ रणखांबे, विजयकुमार भोईर, सुरेखा गायकवाड, कवी दीप यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनात नवनाथ रणखांबे, जगदेव भटू, विजयकुमार भोईर, मिलिंद जाधव, कवी दीप, अशोक कांबळे, विष्णू खांजोडे, सुरेखा गायकवाड, मनीषा मेश्राम, प्रतिभा सोनावणे, वृषाली माने, उदय क्षीरसागर, चेतन जाधव, संघरत्न घनघाव, ज्योती गोळे, गणेश गावखडकर, कामिनी धनगर, शंकर घोगरे या कवींनी कविता सादर केल्या.अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे यावेळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. बलुतेदार-अलुतेदार, अठरापगड जातींना जोडून आणि सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. हिंदू-मुस्लिम, ब्राह्मणेतर वर्गाला सोबत घेऊन प्रत्येक सैनिकांना मावळा ही पदवी दिली. त्यामुळे महाराष्ट्र उभा राहिला. त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे महात्मा जोतिराव फुलेंनी भारतातील जातीय व्यवस्थेला छेद देऊन समस्त स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुले केली आणि आज भारतीय महिला स्वाभिमानाने जगत आहे.दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद जाधव यांनी केले, तर आभार कवी दीप यांनी मानले.

सर्व जातींना जोडणे आवश्यक - अ‍ॅड़ सोनावणेफुले आणि आंबेडकरांना जोडणारा दुवा राजर्षी शाहू महाराज होते. स्वत:च्या राज्यात ५० टक्के बहुजन समाजाला आरक्षणाची तरतूद करणारे खरे समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज होते. आरक्षणाला संविधानिक दर्जा देऊन संपूर्ण बहुजन समाजाला एक प्रतिनिधित्व बहाल केले. देशात क्र ांती घडवून आणणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. या सर्वच महामानवांनी केलेला प्रचंड त्याग आणि त्यांच्या संघर्षाला जगात कुठेच तोड नाही. मानवमुक्तीच्या लढ्यातील प्रणेते आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊन आज आम्ही सर्व जातीजातींना जोडून महामानवांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहोत. जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी, सर्व जातींना जोडणे आवश्यक आहे, याकडे सोनावणे यांनी लक्ष वेधले.