शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत रंगले महामानवांच्या विचारांचे कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:04 IST

ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांना वाहिली आदरांजली : स.है. जोंधळे हायस्कूलमध्ये झाला कार्यक्रम

डोंबिवली : महामानवांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, त्यांनी केलेल्या जनजागृतीचे महत्त्व नागरिकांना कळावे, हे उद्दिष्ट समोर ठेवून शनिवारी सायंकाळी येथील पश्चिमेकडील स.है. जोंधळे हायस्कूलमध्ये विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महामानवांच्या विचारांचे कविसंमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महामानवांच्या विचारधारेवर आधारित, स्वरचित कविता यावेळी सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत दिवंगत राजा ढाले यांना कवींच्या वतीने आदरांजलीही वाहण्यात आली.

चैतन्य सुखदेव सोनावणे फाउंडेशन ठाणे, बहुउद्देशीय मानवसेवा सामाजिक संस्था भिवंडी, कवी कट्टा ग्रुप कल्याण-मुंबई, माझी आई प्रतिष्ठान सामाजिक संस्था भिवंडी, स.सु.स. आणि लाख मोलाच्या कविता काव्यमंच कल्याण, विकास प्रबोधिनी संस्था भांडुप, मुंबई, रामवेणू काव्य मंच दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

संमेलनाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे होते, तर संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक जगदेव भटू, नवनाथ रणखांबे, विजयकुमार भोईर, सुरेखा गायकवाड, कवी दीप यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनात नवनाथ रणखांबे, जगदेव भटू, विजयकुमार भोईर, मिलिंद जाधव, कवी दीप, अशोक कांबळे, विष्णू खांजोडे, सुरेखा गायकवाड, मनीषा मेश्राम, प्रतिभा सोनावणे, वृषाली माने, उदय क्षीरसागर, चेतन जाधव, संघरत्न घनघाव, ज्योती गोळे, गणेश गावखडकर, कामिनी धनगर, शंकर घोगरे या कवींनी कविता सादर केल्या.अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे यावेळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. बलुतेदार-अलुतेदार, अठरापगड जातींना जोडून आणि सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. हिंदू-मुस्लिम, ब्राह्मणेतर वर्गाला सोबत घेऊन प्रत्येक सैनिकांना मावळा ही पदवी दिली. त्यामुळे महाराष्ट्र उभा राहिला. त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे महात्मा जोतिराव फुलेंनी भारतातील जातीय व्यवस्थेला छेद देऊन समस्त स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुले केली आणि आज भारतीय महिला स्वाभिमानाने जगत आहे.दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद जाधव यांनी केले, तर आभार कवी दीप यांनी मानले.

सर्व जातींना जोडणे आवश्यक - अ‍ॅड़ सोनावणेफुले आणि आंबेडकरांना जोडणारा दुवा राजर्षी शाहू महाराज होते. स्वत:च्या राज्यात ५० टक्के बहुजन समाजाला आरक्षणाची तरतूद करणारे खरे समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज होते. आरक्षणाला संविधानिक दर्जा देऊन संपूर्ण बहुजन समाजाला एक प्रतिनिधित्व बहाल केले. देशात क्र ांती घडवून आणणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. या सर्वच महामानवांनी केलेला प्रचंड त्याग आणि त्यांच्या संघर्षाला जगात कुठेच तोड नाही. मानवमुक्तीच्या लढ्यातील प्रणेते आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊन आज आम्ही सर्व जातीजातींना जोडून महामानवांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहोत. जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी, सर्व जातींना जोडणे आवश्यक आहे, याकडे सोनावणे यांनी लक्ष वेधले.