शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

डोंबिवलीत रंगले महामानवांच्या विचारांचे कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:04 IST

ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांना वाहिली आदरांजली : स.है. जोंधळे हायस्कूलमध्ये झाला कार्यक्रम

डोंबिवली : महामानवांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, त्यांनी केलेल्या जनजागृतीचे महत्त्व नागरिकांना कळावे, हे उद्दिष्ट समोर ठेवून शनिवारी सायंकाळी येथील पश्चिमेकडील स.है. जोंधळे हायस्कूलमध्ये विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महामानवांच्या विचारांचे कविसंमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महामानवांच्या विचारधारेवर आधारित, स्वरचित कविता यावेळी सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत दिवंगत राजा ढाले यांना कवींच्या वतीने आदरांजलीही वाहण्यात आली.

चैतन्य सुखदेव सोनावणे फाउंडेशन ठाणे, बहुउद्देशीय मानवसेवा सामाजिक संस्था भिवंडी, कवी कट्टा ग्रुप कल्याण-मुंबई, माझी आई प्रतिष्ठान सामाजिक संस्था भिवंडी, स.सु.स. आणि लाख मोलाच्या कविता काव्यमंच कल्याण, विकास प्रबोधिनी संस्था भांडुप, मुंबई, रामवेणू काव्य मंच दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

संमेलनाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे होते, तर संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक जगदेव भटू, नवनाथ रणखांबे, विजयकुमार भोईर, सुरेखा गायकवाड, कवी दीप यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनात नवनाथ रणखांबे, जगदेव भटू, विजयकुमार भोईर, मिलिंद जाधव, कवी दीप, अशोक कांबळे, विष्णू खांजोडे, सुरेखा गायकवाड, मनीषा मेश्राम, प्रतिभा सोनावणे, वृषाली माने, उदय क्षीरसागर, चेतन जाधव, संघरत्न घनघाव, ज्योती गोळे, गणेश गावखडकर, कामिनी धनगर, शंकर घोगरे या कवींनी कविता सादर केल्या.अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे यावेळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. बलुतेदार-अलुतेदार, अठरापगड जातींना जोडून आणि सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. हिंदू-मुस्लिम, ब्राह्मणेतर वर्गाला सोबत घेऊन प्रत्येक सैनिकांना मावळा ही पदवी दिली. त्यामुळे महाराष्ट्र उभा राहिला. त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे महात्मा जोतिराव फुलेंनी भारतातील जातीय व्यवस्थेला छेद देऊन समस्त स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुले केली आणि आज भारतीय महिला स्वाभिमानाने जगत आहे.दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद जाधव यांनी केले, तर आभार कवी दीप यांनी मानले.

सर्व जातींना जोडणे आवश्यक - अ‍ॅड़ सोनावणेफुले आणि आंबेडकरांना जोडणारा दुवा राजर्षी शाहू महाराज होते. स्वत:च्या राज्यात ५० टक्के बहुजन समाजाला आरक्षणाची तरतूद करणारे खरे समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज होते. आरक्षणाला संविधानिक दर्जा देऊन संपूर्ण बहुजन समाजाला एक प्रतिनिधित्व बहाल केले. देशात क्र ांती घडवून आणणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. या सर्वच महामानवांनी केलेला प्रचंड त्याग आणि त्यांच्या संघर्षाला जगात कुठेच तोड नाही. मानवमुक्तीच्या लढ्यातील प्रणेते आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊन आज आम्ही सर्व जातीजातींना जोडून महामानवांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहोत. जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी, सर्व जातींना जोडणे आवश्यक आहे, याकडे सोनावणे यांनी लक्ष वेधले.