शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

डोंबिवलीकर साहित्यिकांनी दिला कवी केशवसूत यांच्या स्मृतींना उजाळा

By admin | Updated: November 8, 2016 02:13 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेने (मसाप) कविवर्य केशवसूत यांच्या १११ व्या स्मृतिदिनाचे निमित्तसाधत रविवारी घेतलेल्या त्यांच्या कविता वाचनाच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

डोंबिवली : महाराष्ट्र साहित्य परिषदेने (मसाप) कविवर्य केशवसूत यांच्या १११ व्या स्मृतिदिनाचे निमित्तसाधत रविवारी घेतलेल्या त्यांच्या कविता वाचनाच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थितांनी केशवसूत यांच्या स्मृतींना उजाळा दिला. शहरात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी हा कार्यक्रम येथील टिळकनगर शाळेच्या सभागृहात झाला. यावेळी निवडक १५ निमंत्रित कवींच्या कविता आणि केशवसूत यांच्या कवितांचे वाचन झाले. १८८८ ते १९०६ हा केशवसूतांचा काळ. या काळातील कविता आजच्या परिस्थितीत किती समर्पक आहेत, याचाच प्रत्यय उपस्थितांना आला. अस्पृश्यांच्या प्रश्नाबद्दल कोणतीही घोषणा न करता त्यांच्या मुलांच्या मनातील शंका उच्चारून या प्रश्नाविषयी वाटणारी तळमळ केशवसूतांनी आपल्या कवितेतून मांडली होती, असे अरुण गवळी यांनी सांगितले. ३ सप्टेंबर १८८८ मध्ये केशवसूतांनी लिहिलेल्या ‘अत्यंजाच्या मुलाचा पहिला प्रश्न’ हिचे वाचन करून त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. अनुसया कुंभार यांनी ‘प्रीती’ ही कविता सादर केली. केशवसूतांनी या कवितेतून प्रेमविषयक तत्वज्ञान अत्यंत साध्या व सोप्या भाषेत या कवितेतून मांडले आहे. या कवितेला गेयता असल्यामुळे ही कविता म्हणजे गाणे वाटते. १०० वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेली ‘मजुरावर उपासमारीची पाळी’ ही कविता विशाल सामाजिक जाणीव व्यक्त करते. त्या काळात प्रथमच हा विषय केशवसूतांनी कवितेतून मांडला होता. ही कविता दामोदर मोरे यांनी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली. राजीव जोशी यांनी ‘झपूर्झा’ ही कविता सादर केली. नवनिर्मिती आवश्यक असणारी तन्मयता म्हणजे ‘झपूर्झा’ हा शब्द मराठी भाषेला केशवसूतांनी दिलेली देणगी आहे. हेमंत राजाराम यांनी विद्यार्थ्यांप्रत ही कविता सादर केली. इंग्रजी म्हणीवरून केशवसूतांनी ही कविता सूचली असावी, असे बोलले जाते. तीच कविता मृणाल केळकर यांनी, ‘काट्यावाचून गुलाब’ सादर करून उपस्थितांना जिंकून घेतले. वृंदा कौजलगीकर यांनी ‘काव्य कोणाच’े ही कविता सादर केली. दया घोंगे यांनी ‘स्फूट विचार’, किरण सोनावणे यांनी ‘मूर्तीभंग,’ सुलभा कोरे यांनी ‘प्रशस्तीपत्र’ या कविता सादर केल्या. केशवसूतांनी निराशेवर मात करण्यासाठी लिहिलेली ‘फुलपाखरू’ ही कविता लीला शाह यांनी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. प्रविण दामले यांनी ‘आम्ही कोण,’ गजानन गावंड यांनी ‘गोफण केली छान’ या कवितांचे वाचन केले. जयंता कुलकर्णी यांनी ‘टू अ पोईट’ ही कविता सादर केली. विशेष म्हणजे ही कविता २१ एप्रिल १८९१ मध्ये कल्याण येथे लिहिल्याचे संदर्भ आढळतात. प्रज्ञा कुलकर्णी यांनी ‘तुझे नाम मुखी’ या अभंगाने कार्यक्रमाचा शेवट केला. कार्यक्रमाचे निवदेन नारायण लाळे, शुक्राचार्य गायकवाड यांनी केले. प्रस्ताविक सुरेश देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना नारायण लाळे यांची होती. यावेळी ज्येष्ठ कवी नीलकंठ कदम, संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे, ज्येष्ठ साहित्यिक आणि मसापचे अध्यक्ष वामनराव देशपांडे, उपाध्यक्ष सुरेश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)