शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:05 IST

अतिवृष्टी, पुरामुळे उभे पीक वाहून गेले, तर अवकाळी पावसाने नष्ट केले.

सुरेश लोखंडे ठाणे : अतिवृष्टी, पुरामुळे उभे पीक वाहून गेले, तर अवकाळी पावसाने नष्ट केले. यामुळे यंदाचा खरीप हंगाम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानदायक ठरला. मात्र, यावर मात करून रब्बी हंगाम लाभदायक ठरवण्यासाठी एक हजार ४४४ हेक्टर रब्बी पिकांची लागवड होत आहे. तर, सात हजार ५०० हेक्टर शेतात परदेशात निर्यात होणारी भेंडी, ढोबळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.भाजीपाला या नगदी पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी सात हजार ५०० हेक्टरवर तो घेतला जात आहे. याशिवाय, आदिवासी शेतकºयांच्या ७५० एकरांवर ढोबळी मिरची, भेंडीलागवड करण्याचे नियोजन आहे. यापैकी शहापूर तालुक्यात ४५० एकर व मुरबाड तालुक्यात ३०० एकर क्षेत्रावर आदिवासींकडून भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचे नियोजन आहे. या उत्पादनासह गळीत धान्यदेखील यंदा जिल्ह्यातील शेतकरी घेणार आहेत. त्यासाठी कृषी विभागाने दूर दृष्टिकोन ठेवून भाताच्या जमिनीत एसबी-एक्सआय या वाणाचा भुईमूगदेखील १३७ हेक्टरवर पेरला जाणार आहे. यासाठी ८२.२० क्विंटल बियाण्यांची मागणी महाबीजकडे केली आहे. याशिवाय, राहुरी कृषी विद्यापीठाकडे २०५.५० लीटर द्रवरूप रायझोबियनची मागणी नोंदवली आहे. जिल्ह्यातील २५० हेक्टर शेतजमिनीत भुईमूग घेण्यासाठी १२८ क्विंटल बियाणे शेतकºयांना मोफत दिले जात आहे. तर, हरभºयाच्या उत्पादनासाठी एक हजार ४४४ हेक्टर शेतजमिनीवर पेरणी होणार आहे. त्यासाठी लागणाºया ८६६.४० क्विंटल बियाण्यांचे वाटप शेतकºयांना मोफत दिले जात आहे.>जैविक खतासह बियाण्यांचे वाटप सुरूअतिवृष्टी, पूर आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या या ७७ हजार शेतकºयांना भुईमूग, हरभरा बियाण्यांसह बीजप्रक्रिया करण्यासाठी द्रवरूप रायझोबियम हे जैविक खत १०० टक्के मोफत दिले जात आहे. राष्टÑीय अन्नसुरक्षा अभियानाद्वारे कडधान्य ५१५ हेक्टरवर घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ३०९ क्ंिवटल बियाण्यांचे वाटप आहे. भात पडच्या ४१७ हेक्टर शेतातील पेरणीसाठी २५० क्ंिवटल आणि भातबियाणे साखळी विकसित करणे, हरभरा या योजनेतून ५१२ हेक्टरसाठी ३०७ क्ंिवटल हरभरा बियाणेवाटप करण्याचे नियोजन आहे. कृषी विभागाकडून तीन लाख रुपयांच्या निधीसह जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून दोन लाख आणि जिल्हा नियोजनकडून एक लाख आदी सहा लाख रुपयांच्या निधीतून मका बियाण्यांची खरेदी करून मोफत दिले जात आहे. यातून पाच हजार ५८० टन जनावरांचा चारा तयार होणार आहे.>यंदा रब्बीसाठी पोषक हवामानजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १४६.६० टक्के पाऊस पडला आहे. यामुळे रब्बी व उन्हाळी पीक घेण्यास सध्याचे हवामान सुयोग्य आहे. मुबलक पाणी आहे. याशिवाय यंदा थंडी मोठ्या प्रमाणात पडणार असल्यामुळे रब्बी हंगामासाठी वातावरण पोषक आहे. कृषी व महसूल विभागाद्वारेएक हजार २० वनराई बंधारे बांधले जाणार आहे. तर, जिल्हा परिषदेने साडेचार हजार बंधारे बांधण्यास प्रारंभही केला आहे. यामुळे नदी, नाल्याच्या पाण्याचे संवर्धन रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरत आहे. यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन जोमाने होण्यास वातावरणाची साथ लाभणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी लोकमतला सांगितले.