शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:05 IST

अतिवृष्टी, पुरामुळे उभे पीक वाहून गेले, तर अवकाळी पावसाने नष्ट केले.

सुरेश लोखंडे ठाणे : अतिवृष्टी, पुरामुळे उभे पीक वाहून गेले, तर अवकाळी पावसाने नष्ट केले. यामुळे यंदाचा खरीप हंगाम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानदायक ठरला. मात्र, यावर मात करून रब्बी हंगाम लाभदायक ठरवण्यासाठी एक हजार ४४४ हेक्टर रब्बी पिकांची लागवड होत आहे. तर, सात हजार ५०० हेक्टर शेतात परदेशात निर्यात होणारी भेंडी, ढोबळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.भाजीपाला या नगदी पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी सात हजार ५०० हेक्टरवर तो घेतला जात आहे. याशिवाय, आदिवासी शेतकºयांच्या ७५० एकरांवर ढोबळी मिरची, भेंडीलागवड करण्याचे नियोजन आहे. यापैकी शहापूर तालुक्यात ४५० एकर व मुरबाड तालुक्यात ३०० एकर क्षेत्रावर आदिवासींकडून भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचे नियोजन आहे. या उत्पादनासह गळीत धान्यदेखील यंदा जिल्ह्यातील शेतकरी घेणार आहेत. त्यासाठी कृषी विभागाने दूर दृष्टिकोन ठेवून भाताच्या जमिनीत एसबी-एक्सआय या वाणाचा भुईमूगदेखील १३७ हेक्टरवर पेरला जाणार आहे. यासाठी ८२.२० क्विंटल बियाण्यांची मागणी महाबीजकडे केली आहे. याशिवाय, राहुरी कृषी विद्यापीठाकडे २०५.५० लीटर द्रवरूप रायझोबियनची मागणी नोंदवली आहे. जिल्ह्यातील २५० हेक्टर शेतजमिनीत भुईमूग घेण्यासाठी १२८ क्विंटल बियाणे शेतकºयांना मोफत दिले जात आहे. तर, हरभºयाच्या उत्पादनासाठी एक हजार ४४४ हेक्टर शेतजमिनीवर पेरणी होणार आहे. त्यासाठी लागणाºया ८६६.४० क्विंटल बियाण्यांचे वाटप शेतकºयांना मोफत दिले जात आहे.>जैविक खतासह बियाण्यांचे वाटप सुरूअतिवृष्टी, पूर आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या या ७७ हजार शेतकºयांना भुईमूग, हरभरा बियाण्यांसह बीजप्रक्रिया करण्यासाठी द्रवरूप रायझोबियम हे जैविक खत १०० टक्के मोफत दिले जात आहे. राष्टÑीय अन्नसुरक्षा अभियानाद्वारे कडधान्य ५१५ हेक्टरवर घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ३०९ क्ंिवटल बियाण्यांचे वाटप आहे. भात पडच्या ४१७ हेक्टर शेतातील पेरणीसाठी २५० क्ंिवटल आणि भातबियाणे साखळी विकसित करणे, हरभरा या योजनेतून ५१२ हेक्टरसाठी ३०७ क्ंिवटल हरभरा बियाणेवाटप करण्याचे नियोजन आहे. कृषी विभागाकडून तीन लाख रुपयांच्या निधीसह जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून दोन लाख आणि जिल्हा नियोजनकडून एक लाख आदी सहा लाख रुपयांच्या निधीतून मका बियाण्यांची खरेदी करून मोफत दिले जात आहे. यातून पाच हजार ५८० टन जनावरांचा चारा तयार होणार आहे.>यंदा रब्बीसाठी पोषक हवामानजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १४६.६० टक्के पाऊस पडला आहे. यामुळे रब्बी व उन्हाळी पीक घेण्यास सध्याचे हवामान सुयोग्य आहे. मुबलक पाणी आहे. याशिवाय यंदा थंडी मोठ्या प्रमाणात पडणार असल्यामुळे रब्बी हंगामासाठी वातावरण पोषक आहे. कृषी व महसूल विभागाद्वारेएक हजार २० वनराई बंधारे बांधले जाणार आहे. तर, जिल्हा परिषदेने साडेचार हजार बंधारे बांधण्यास प्रारंभही केला आहे. यामुळे नदी, नाल्याच्या पाण्याचे संवर्धन रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरत आहे. यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन जोमाने होण्यास वातावरणाची साथ लाभणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी लोकमतला सांगितले.