शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:05 IST

अतिवृष्टी, पुरामुळे उभे पीक वाहून गेले, तर अवकाळी पावसाने नष्ट केले.

सुरेश लोखंडे ठाणे : अतिवृष्टी, पुरामुळे उभे पीक वाहून गेले, तर अवकाळी पावसाने नष्ट केले. यामुळे यंदाचा खरीप हंगाम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानदायक ठरला. मात्र, यावर मात करून रब्बी हंगाम लाभदायक ठरवण्यासाठी एक हजार ४४४ हेक्टर रब्बी पिकांची लागवड होत आहे. तर, सात हजार ५०० हेक्टर शेतात परदेशात निर्यात होणारी भेंडी, ढोबळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.भाजीपाला या नगदी पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी सात हजार ५०० हेक्टरवर तो घेतला जात आहे. याशिवाय, आदिवासी शेतकºयांच्या ७५० एकरांवर ढोबळी मिरची, भेंडीलागवड करण्याचे नियोजन आहे. यापैकी शहापूर तालुक्यात ४५० एकर व मुरबाड तालुक्यात ३०० एकर क्षेत्रावर आदिवासींकडून भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचे नियोजन आहे. या उत्पादनासह गळीत धान्यदेखील यंदा जिल्ह्यातील शेतकरी घेणार आहेत. त्यासाठी कृषी विभागाने दूर दृष्टिकोन ठेवून भाताच्या जमिनीत एसबी-एक्सआय या वाणाचा भुईमूगदेखील १३७ हेक्टरवर पेरला जाणार आहे. यासाठी ८२.२० क्विंटल बियाण्यांची मागणी महाबीजकडे केली आहे. याशिवाय, राहुरी कृषी विद्यापीठाकडे २०५.५० लीटर द्रवरूप रायझोबियनची मागणी नोंदवली आहे. जिल्ह्यातील २५० हेक्टर शेतजमिनीत भुईमूग घेण्यासाठी १२८ क्विंटल बियाणे शेतकºयांना मोफत दिले जात आहे. तर, हरभºयाच्या उत्पादनासाठी एक हजार ४४४ हेक्टर शेतजमिनीवर पेरणी होणार आहे. त्यासाठी लागणाºया ८६६.४० क्विंटल बियाण्यांचे वाटप शेतकºयांना मोफत दिले जात आहे.>जैविक खतासह बियाण्यांचे वाटप सुरूअतिवृष्टी, पूर आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या या ७७ हजार शेतकºयांना भुईमूग, हरभरा बियाण्यांसह बीजप्रक्रिया करण्यासाठी द्रवरूप रायझोबियम हे जैविक खत १०० टक्के मोफत दिले जात आहे. राष्टÑीय अन्नसुरक्षा अभियानाद्वारे कडधान्य ५१५ हेक्टरवर घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ३०९ क्ंिवटल बियाण्यांचे वाटप आहे. भात पडच्या ४१७ हेक्टर शेतातील पेरणीसाठी २५० क्ंिवटल आणि भातबियाणे साखळी विकसित करणे, हरभरा या योजनेतून ५१२ हेक्टरसाठी ३०७ क्ंिवटल हरभरा बियाणेवाटप करण्याचे नियोजन आहे. कृषी विभागाकडून तीन लाख रुपयांच्या निधीसह जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून दोन लाख आणि जिल्हा नियोजनकडून एक लाख आदी सहा लाख रुपयांच्या निधीतून मका बियाण्यांची खरेदी करून मोफत दिले जात आहे. यातून पाच हजार ५८० टन जनावरांचा चारा तयार होणार आहे.>यंदा रब्बीसाठी पोषक हवामानजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १४६.६० टक्के पाऊस पडला आहे. यामुळे रब्बी व उन्हाळी पीक घेण्यास सध्याचे हवामान सुयोग्य आहे. मुबलक पाणी आहे. याशिवाय यंदा थंडी मोठ्या प्रमाणात पडणार असल्यामुळे रब्बी हंगामासाठी वातावरण पोषक आहे. कृषी व महसूल विभागाद्वारेएक हजार २० वनराई बंधारे बांधले जाणार आहे. तर, जिल्हा परिषदेने साडेचार हजार बंधारे बांधण्यास प्रारंभही केला आहे. यामुळे नदी, नाल्याच्या पाण्याचे संवर्धन रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरत आहे. यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन जोमाने होण्यास वातावरणाची साथ लाभणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी लोकमतला सांगितले.