शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

प्लॅस्टिकबंदी : ठाण्यात पहिल्याच दिवशी लाखो रुपयांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 02:08 IST

प्लॅस्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ््या महापालिकांमधील कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारुन हजारो रुपयांचा दंड वसूल केला.

ठाणे : प्लॅस्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ््या महापालिकांमधील कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारुन हजारो रुपयांचा दंड वसूल केला. पहिल्या दिवशी प्लॅस्टिक वस्तूंची विक्री करणाºया दुकानदारांना धारेवर धरताना ग्राहकांना केवळ समज देऊन सोडून देण्यात आले. मात्र सोमवारपासून सर्वसामान्यांचीही गय केली जाणार नाही, असे महापालिकांनी स्पष्ट केले. ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर येथे कारवाई करुन दंड वसूल केल्याने दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या विशेष पथकाने प्लॅस्टिकचा वापर करणाºयांच्या विरोधात कारवाई केली. प्रदूषण विभागाच्या प्रमुख मनिषा प्रधान यांच्या नेतृत्वाखालील ५० जणांच्या पथकाने ठाणे रेल्वे स्थानक, पोखरण रोड, मुख्य बाजारपेठ, भाजी मार्केट, गावंदेवी आदी ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. भाजी मार्केटमधून ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. संपूर्ण शहरात १०० पेक्षा जास्त आस्थापनांवर कारवाई करुन ९५ हजारांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला. २५०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे.ठाणे महापालिकेने १० प्रभाग समिती निहाय १० पथकांची स्थापना केली असून या प्रत्येक टीममध्ये स्वच्छता निरीक्षकाचा समावेश आहे. ठाणे रेल्वे स्थानक आणि मार्केट परिसरावर बारीक लक्ष असणार आहे, असे प्रधान यांनी सांगितले.मार्केटमधील ज्या दुकानांवर धाडी घातल्या त्यांच्याकडे अडीच ते तीन किलोपेक्षा जास्त प्लॅस्टिक मिळाले. तीन दुकानदारांकडून प्रत्येकी ५ हजारांप्रमाणे १५ हजार रु पये दंड वसूल करण्यात आला. नौपाडा, गावंदेवी या परिसरातील जवळपास सर्वच छोटी मोठी दुकाने आणि फेरीवाल्यांची तपासणी करण्यात आली. रविवारपासून शहरातील सर्वच दुकानदार आणि विक्रेत्यांकडून दंड आकाराला जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली.कारवाईची वार्ता पसरताच पिशव्या लपवल्याअंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेने प्लॅस्टिक विक्री करणाºया १० दुकानदारांवर कारवाई करुन ५० हजारांची दंड वसुली केली.पोलीस स्टेशन समोरील राहुल मार्टमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याने उपमुख्याधिकारी दीपक चव्हाण आणि आरोग्य विभागाचे अधिकारी सुहास सावंत यांच्या उपस्थितीत दंडात्मक कारवाई करण्यात आली.त्यानंतर शहरातील इतर दुकानांवरही कारवाई करण्यात आली.