शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

ग्राहकांच्या हाती पुन्हा प्लास्टिक पिशव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:30 IST

प्लास्टिक पिशव्यांच्या वाढत्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी राज्य शासनाने मार्च २०१८ मध्ये कायदा केला होता. त्यानंतर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर ...

प्लास्टिक पिशव्यांच्या वाढत्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी राज्य शासनाने मार्च २०१८ मध्ये कायदा केला होता. त्यानंतर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीमही राबवली होती. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर शासकीय संस्थांवर जबाबदारी दिली होती. मात्र, दोन वर्षांच्या काळात सर्वच शासकीय संस्थांना प्लास्टिक बंदीची मोहीम राबवण्यात अपयश आले. बाजारात फेरीवाले, दुकानदार तसेच इतर साहित्य विक्रेत्यांकडून बंदी असलेल्या आणि कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात पालिका आणि इतर शासकीय संस्था कोरोनाच्या कामात व्यस्त असल्याने प्लास्टिकच्या पिशव्यांच्या गोदामातून सर्रासपणे विक्री केली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर अशा शहरांत, स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात असलेले फेरीवाले, भाजी विक्रेते यांच्यासह दुकानदारांकडूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे. याबाबत अंबरनाथ नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी सुरेश पाटील यांना विचारले असता प्लास्टिक पिशव्यांवर धडक कारवाई होत नसली तरी किरकोळ कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

...........................