बदलापूर : एसएसटी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी राहटोलीच्या डोंगरावर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत त्यांनी डोंगरावर ५०० वृक्षांचे रोपण केले.
वनविभाग तसेच राहटोली ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने हे वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या ३० विद्यार्थ्यांसह उपप्राचार्य व जिल्हा समन्वयक जीवन विचारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रोग्राम ऑफिसर अनिल तेलिंगे, मयूर माथुर, नेहा तेलानी, प्रा. सुनील शाह आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला. केवळ वृक्षारोपण न करता भविष्यात या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रयत्न करणार असल्याचे जीवन विचारे यांनी सांगितले. याप्रसंगी वनविभागाचे सखाराम राठोड व त्यांचे सहकारी तसेच राहटोली ग्रामपंचायत सरपंच साक्षी करंदुले, उपसरपंच चेतन बनकर व ग्रामस्थ उपस्थित होते.